नंदुरबार : पूर्वी लँडलाईन नंबर असताना मोजक्याच लोकांकडे फोन असायचे. त्यामुळे साहजिकच ते नंबर लक्षात राहत असत; परंतु आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याने व मोबाईलमध्येच नंबर सेव्ह राहत असल्याने ते लक्षात ठेवण्याची तसदी कुणी घेत नाही. त्यामुळेच अनेक जवळच्या व्यक्तींचे नंबर लक्षात राहत नसल्याची स्थिती आहे. यासंदर्भात केेलेल्या रियॅलिटी चेकमध्ये अनेक रोचक बाबी समोर आल्या.
प्रत्येकाच्या हातात अँड्रॉईड मोबाईल आलेला आहे. त्याची क्षमतादेखील बऱ्यापैकी असल्याने मोबाईल नंबर सेव्ह करायला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. परिणामी, शेकडो मोबाईल नंबर त्या एकाच मोबाईलमध्ये समाविष्ट होत असल्यामुळे कोणीही मोबाईल नंबर पाठ करीत नाही़ हीच बाब प्रकर्षाने सर्वेक्षणाच्या माध्यमातून दिसून आली. ज्यांच्याशी कायम संपर्क असतो त्यांचा मोबाईल नंबर मात्र पाठ असतो.
लोकमत @ सुभाष चौक
n सुभाष चौकात याबाबत काहींना छेडले असता अनेकांना आपल्या पत्नीचा नंबर देखील पाठ नव्हता. काहींनी सांगितला; परंतु तो पुन्हा पुन्हा दुरुस्त केला गेला.
n ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या बॉसचा नंबर काहीजणांना पाठ होता. घरातील मुलांचा व पत्नीचा नंबर सांगता आला नाही.
n सुरुवातीला तर अनेकांनी आपल्याला कोणाचे नंबर माहिती आहे हे आठवण्याचा प्रयत्न केला. जे सुरुवातीचे नंबर होते तेच पाठ होते.
n मोबाईल नंबरची विचारणा केली असता सुरुवातीला अनेकांनी स्पष्टपणे नकार दर्शविला.