शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उद्याचे विद्यार्थी घडणार कसे? आता गुरुजी होणे झाले नकोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:36 IST

नंदुरबार : जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी डी. एड. काॅलेजचे अक्षरश: पीक आले होते. तब्बल ३२ काॅलेज सुरू झाली होती. आजच्या ...

नंदुरबार : जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी डी. एड. काॅलेजचे अक्षरश: पीक आले होते. तब्बल ३२ काॅलेज सुरू झाली होती. आजच्या स्थितीत १९ काॅलेज बंद पडून केवळ १३ सुरू आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत दरवर्षी निम्मे विद्यार्थीही प्रवेश घेत नसल्यामुळे अनेक ठिकाणी शुकशुकाट आहे. त्याला विविध कारणे असली तरी सध्याच्या परिस्थितीत डी.एड.कडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. एकूण जागांच्या तुलनेत अवघे ३० टक्के प्रवेश अर्ज आले आहेत.

काही वर्षांपूर्वी डीएड प्रवेशासाठी अर्ज करूनही यादीत नाव येते की नाही, याची प्रतीक्षा करावी लागायची. मात्र, शिक्षक घडविणाऱ्या महाविद्यालयांच्या वाट्याला आता वनवास आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १३ कॉलेजमध्ये ८५० जागांसाठी केवळ २०१ अर्ज आले आहेत. त्यामुळे डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी शिक्षक बनतात. मात्र, नंतर नोकरी मिळविण्यासाठी पुन्हा टीईटी देणे अनिवार्य असते. दरम्यान, टीईटी देऊनही नोकरीसाठी वेटिंगच करावी लागत असल्याने डीएडला प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास पसंती देत आहेत.

परिणामी, विद्यार्थ्यांचे प्रवेशच होत नसल्याने काही डीएड कॉलेज बंद करण्याची वेळ संस्थाचालकांवर आली असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

आणखी किमान १०० प्रवेशअर्ज गृहीत धरले तरी एकूण जागांच्या निम्म्या जागाही होणार असल्याचे चित्र आहे.

नोकरीची हमी नाही

डीएड केल्यानंतर नोकरीसाठी पैशांची मागणी होते. अनेकांची परिस्थिती नाजूक असल्याने नोकरीसाठी प्रतीक्षा करावी लागते.

भरती बंद असल्याने अनेक जणांना शाळेवर कंत्राटी तत्त्वावर काम करावे लागते. अल्प मानधन मिळते.

सद्यस्थितीत भरती नाही, नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविली आहे.

शासन निर्णयानुसार लवकरच शिक्षकांच्या जवळपास ४० हजार जागा भरल्या जाणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने युवक नोकरीला लागले तर आपोआप डी.एड.ला पुन्हा पूर्वीची मागणी होणार आहे. डी.एड.नंतर टीईटी द्यावीच लागते. त्यामुळे देखील काही विद्यार्थ्यांचा कल आता कमी झाला असल्याचे डी.एड.महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी बोलतांना सांगितले.

प्राथमिक शिक्षकांची पदे गेल्या काही वर्षांत भरली गेली नाहीत. त्यातच डी.एड.करून अनेक युवक बेरोजगार आहेत. त्यातच सीईटी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण देखील कमी आहे. परिणामी डी.एड.करून नोकरीची हमी नाही. त्यामुळे आपण अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.

-गबा खैरनार, विद्यार्थी.

इतर अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास किमान रोजगाराची संधी असते. डी.एड.झाल्यानंतरही नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे मी व माझ्या बहिणीने डी.एड.चा पर्याय निवडला नाही. सद्य स्थितीत टीईटी उत्तीर्णतेचे प्रमाण अगदीच अल्प आहे.

-सूर्यकांत जाधव, विद्यार्थी.