शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

उद्याचे विद्यार्थी घडणार कसे? आता गुरुजी होणे झाले नकोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:36 IST

नंदुरबार : जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी डी. एड. काॅलेजचे अक्षरश: पीक आले होते. तब्बल ३२ काॅलेज सुरू झाली होती. आजच्या ...

नंदुरबार : जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी डी. एड. काॅलेजचे अक्षरश: पीक आले होते. तब्बल ३२ काॅलेज सुरू झाली होती. आजच्या स्थितीत १९ काॅलेज बंद पडून केवळ १३ सुरू आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत दरवर्षी निम्मे विद्यार्थीही प्रवेश घेत नसल्यामुळे अनेक ठिकाणी शुकशुकाट आहे. त्याला विविध कारणे असली तरी सध्याच्या परिस्थितीत डी.एड.कडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. एकूण जागांच्या तुलनेत अवघे ३० टक्के प्रवेश अर्ज आले आहेत.

काही वर्षांपूर्वी डीएड प्रवेशासाठी अर्ज करूनही यादीत नाव येते की नाही, याची प्रतीक्षा करावी लागायची. मात्र, शिक्षक घडविणाऱ्या महाविद्यालयांच्या वाट्याला आता वनवास आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १३ कॉलेजमध्ये ८५० जागांसाठी केवळ २०१ अर्ज आले आहेत. त्यामुळे डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी शिक्षक बनतात. मात्र, नंतर नोकरी मिळविण्यासाठी पुन्हा टीईटी देणे अनिवार्य असते. दरम्यान, टीईटी देऊनही नोकरीसाठी वेटिंगच करावी लागत असल्याने डीएडला प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास पसंती देत आहेत.

परिणामी, विद्यार्थ्यांचे प्रवेशच होत नसल्याने काही डीएड कॉलेज बंद करण्याची वेळ संस्थाचालकांवर आली असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

आणखी किमान १०० प्रवेशअर्ज गृहीत धरले तरी एकूण जागांच्या निम्म्या जागाही होणार असल्याचे चित्र आहे.

नोकरीची हमी नाही

डीएड केल्यानंतर नोकरीसाठी पैशांची मागणी होते. अनेकांची परिस्थिती नाजूक असल्याने नोकरीसाठी प्रतीक्षा करावी लागते.

भरती बंद असल्याने अनेक जणांना शाळेवर कंत्राटी तत्त्वावर काम करावे लागते. अल्प मानधन मिळते.

सद्यस्थितीत भरती नाही, नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविली आहे.

शासन निर्णयानुसार लवकरच शिक्षकांच्या जवळपास ४० हजार जागा भरल्या जाणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने युवक नोकरीला लागले तर आपोआप डी.एड.ला पुन्हा पूर्वीची मागणी होणार आहे. डी.एड.नंतर टीईटी द्यावीच लागते. त्यामुळे देखील काही विद्यार्थ्यांचा कल आता कमी झाला असल्याचे डी.एड.महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी बोलतांना सांगितले.

प्राथमिक शिक्षकांची पदे गेल्या काही वर्षांत भरली गेली नाहीत. त्यातच डी.एड.करून अनेक युवक बेरोजगार आहेत. त्यातच सीईटी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण देखील कमी आहे. परिणामी डी.एड.करून नोकरीची हमी नाही. त्यामुळे आपण अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.

-गबा खैरनार, विद्यार्थी.

इतर अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास किमान रोजगाराची संधी असते. डी.एड.झाल्यानंतरही नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे मी व माझ्या बहिणीने डी.एड.चा पर्याय निवडला नाही. सद्य स्थितीत टीईटी उत्तीर्णतेचे प्रमाण अगदीच अल्प आहे.

-सूर्यकांत जाधव, विद्यार्थी.