शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

प्रकाशा ते शहादा मार्गावरील अपूर्ण काम अजून किती बळी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 12:30 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  कोळदा ते सेंधवा मार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यात प्रकाशा ते शहादा दरम्यानच्या मार्गाचे ...

 लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :  कोळदा ते सेंधवा मार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यात प्रकाशा ते शहादा दरम्यानच्या मार्गाचे काम सुरू आहे. मात्र ज्याठिकाणी काम अपूर्ण आहे त्याठिकाणी खड्डे पडले आहेत. तयार झालेला रस्ता आणि राहिलेले काम यात अंतर जास्त असल्याने वाहने चढ-उतार करताना स्लीप होत आहेत. कच्च्या रस्त्यावर पाणी  शिंपडले जात नसल्याने उडणारी धूळ अपघातांना कारणीभूत ठरत आहे. या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत असून गुरुवारी डामरखेडा गावाजवळ अशाच स्थितीमुळे एका शिक्षकाचा अपघात होऊन त्यांना प्राण गमवावा लागल्याची घटना घडली.सविस्तर वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा दरम्यान चार वर्षापासून काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. याच मार्गावर अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग येतो. मात्र हे काम करत असताना काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी रस्त्याच्या कामात जात असल्याने काही ठिकाणी हा विषय न्यायप्रविष्ठ आहे म्हणून पाच ते सहा ठिकाणी  काम अपूर्ण आहे.  परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. नंदुरबारकडून येताना समशेरपूर ते कोरीट फाटा या दरम्यान काम अपूर्ण आहे.  कोरीट फाटा ते तापीनदी पुलापर्यंत रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तापी नदी पुलावर खड्डे पडले आहेत. तापी नदी पूल ते तळोदा चौफुलीपर्यंतचा मार्ग अद्याप झालेला नाही. प्रकाशा बसस्थानकाच्या वळणावरही काम अपूर्ण आहे. प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान कोकणी माता मंदिरापासून काम अपूर्ण आहे. परिणामी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मातीने खड्डे भरल्यामुळे वाहन गेल्यानंतर धूळ उडते. सायंकाळच्या वेळेला या धुळीमुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने     अपघात होत आहेत.  नवीन रस्ता व जुना रस्ता या दोघांना जोडताना संबंधित ठेकेदाराने कोणतीच काळजी घेतली नाही म्हणून नवीन रस्त्यावरुन जुन्या रस्त्यावर ये-जा करताना वाहने स्लीप होऊन अपघात होतात. रस्त्याच्या अशाच स्थितीमुळे गुरुवारी डामरखेडा गावाजवळ एका शिक्षकाच्या मोटारसायकलल अपघात होऊन    त्यांना प्राण गमवावे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा शिक्षक डामरखेडाकडून प्रकाशाकडे येताना गोमाई नदीवरील पुलाजवळ नवा काँक्रीट रस्ता व जुना रस्ता यांच्यामध्ये मोठे अंतर आहे. नवीन कॉक्रीटवरून जुन्यावर येताना मोटारसायकल आदळून स्लीप झाली. त्याचवेळी समोरुन वाळूने भरलेल्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने या शिक्षकाचा चिरडून मृत्यू झाला. जर रस्ता चांगला राहिला असता तर शिक्षकाला आपले प्राण गमवावे लागले नसते, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. आतापर्यंत या मार्गावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला  आहे.अपघाताच्या घटनांमुळे नागरिक संतप्त असून हा मार्ग अजून किती जणांचा जीव घेणार? असा संतप्त सवाल करीत आहेत. संबंधित ठेकेदार व त्यावर निरीक्षण करणारे रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे. म्हणून येत्या दोन       दिवसात प्रकाशा गावातील शेतकरी व ग्रामस्थ रस्ता रोको करणार आहेत व संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा     गुन्हा दाखल करू, असे बोलले जात आहे.

साखर कारखाने सुरू झाल्याने वाहतूक वाढलीप्रकाशा-शहादा रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे.  समशेरपूर व सातपुडा साखर कारखाना सुरू झाल्याने ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक यांची ये-जादेखील वाढलली आहे. तसेच पपई घेऊन जाणारे मालट्रक आदींसह अवजड वाहन यांची संख्या वाढली आहे. वाढत्या वाहतुकीचा विचार करून संबंधित ठेकेदाराने नियोजन करणे गरजेचे आहे. ज्याठिकाणी अपूर्ण काम आहे ते त्वरित करणे आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी काम पूर्ण व अपूर्ण आहे अशा ठिकाणी रस्ता वाहतूकयोग्य करण्याची गरज आहे. रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेली झाडेझुडपे काढणे आवश्यक आहे. कच्च्या रस्त्यामुळे उडणाऱ्या धुळीने पिके खराब होत असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान व गोमाई नदीवरील पूल शेवटची घटका मोजत तग धरुन आहे. या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून संरक्षक कठड्यांना तडे जाऊन लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. हा पूल केव्हाही कोसळू शकतो, अशी स्थिती झाली आहे.