शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

प्रकाशा ते शहादा मार्गावरील अपूर्ण काम अजून किती बळी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 12:30 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  कोळदा ते सेंधवा मार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यात प्रकाशा ते शहादा दरम्यानच्या मार्गाचे ...

 लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :  कोळदा ते सेंधवा मार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यात प्रकाशा ते शहादा दरम्यानच्या मार्गाचे काम सुरू आहे. मात्र ज्याठिकाणी काम अपूर्ण आहे त्याठिकाणी खड्डे पडले आहेत. तयार झालेला रस्ता आणि राहिलेले काम यात अंतर जास्त असल्याने वाहने चढ-उतार करताना स्लीप होत आहेत. कच्च्या रस्त्यावर पाणी  शिंपडले जात नसल्याने उडणारी धूळ अपघातांना कारणीभूत ठरत आहे. या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत असून गुरुवारी डामरखेडा गावाजवळ अशाच स्थितीमुळे एका शिक्षकाचा अपघात होऊन त्यांना प्राण गमवावा लागल्याची घटना घडली.सविस्तर वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा दरम्यान चार वर्षापासून काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. याच मार्गावर अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग येतो. मात्र हे काम करत असताना काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी रस्त्याच्या कामात जात असल्याने काही ठिकाणी हा विषय न्यायप्रविष्ठ आहे म्हणून पाच ते सहा ठिकाणी  काम अपूर्ण आहे.  परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. नंदुरबारकडून येताना समशेरपूर ते कोरीट फाटा या दरम्यान काम अपूर्ण आहे.  कोरीट फाटा ते तापीनदी पुलापर्यंत रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तापी नदी पुलावर खड्डे पडले आहेत. तापी नदी पूल ते तळोदा चौफुलीपर्यंतचा मार्ग अद्याप झालेला नाही. प्रकाशा बसस्थानकाच्या वळणावरही काम अपूर्ण आहे. प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान कोकणी माता मंदिरापासून काम अपूर्ण आहे. परिणामी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मातीने खड्डे भरल्यामुळे वाहन गेल्यानंतर धूळ उडते. सायंकाळच्या वेळेला या धुळीमुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने     अपघात होत आहेत.  नवीन रस्ता व जुना रस्ता या दोघांना जोडताना संबंधित ठेकेदाराने कोणतीच काळजी घेतली नाही म्हणून नवीन रस्त्यावरुन जुन्या रस्त्यावर ये-जा करताना वाहने स्लीप होऊन अपघात होतात. रस्त्याच्या अशाच स्थितीमुळे गुरुवारी डामरखेडा गावाजवळ एका शिक्षकाच्या मोटारसायकलल अपघात होऊन    त्यांना प्राण गमवावे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा शिक्षक डामरखेडाकडून प्रकाशाकडे येताना गोमाई नदीवरील पुलाजवळ नवा काँक्रीट रस्ता व जुना रस्ता यांच्यामध्ये मोठे अंतर आहे. नवीन कॉक्रीटवरून जुन्यावर येताना मोटारसायकल आदळून स्लीप झाली. त्याचवेळी समोरुन वाळूने भरलेल्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने या शिक्षकाचा चिरडून मृत्यू झाला. जर रस्ता चांगला राहिला असता तर शिक्षकाला आपले प्राण गमवावे लागले नसते, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. आतापर्यंत या मार्गावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला  आहे.अपघाताच्या घटनांमुळे नागरिक संतप्त असून हा मार्ग अजून किती जणांचा जीव घेणार? असा संतप्त सवाल करीत आहेत. संबंधित ठेकेदार व त्यावर निरीक्षण करणारे रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे. म्हणून येत्या दोन       दिवसात प्रकाशा गावातील शेतकरी व ग्रामस्थ रस्ता रोको करणार आहेत व संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा     गुन्हा दाखल करू, असे बोलले जात आहे.

साखर कारखाने सुरू झाल्याने वाहतूक वाढलीप्रकाशा-शहादा रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे.  समशेरपूर व सातपुडा साखर कारखाना सुरू झाल्याने ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक यांची ये-जादेखील वाढलली आहे. तसेच पपई घेऊन जाणारे मालट्रक आदींसह अवजड वाहन यांची संख्या वाढली आहे. वाढत्या वाहतुकीचा विचार करून संबंधित ठेकेदाराने नियोजन करणे गरजेचे आहे. ज्याठिकाणी अपूर्ण काम आहे ते त्वरित करणे आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी काम पूर्ण व अपूर्ण आहे अशा ठिकाणी रस्ता वाहतूकयोग्य करण्याची गरज आहे. रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेली झाडेझुडपे काढणे आवश्यक आहे. कच्च्या रस्त्यामुळे उडणाऱ्या धुळीने पिके खराब होत असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान व गोमाई नदीवरील पूल शेवटची घटका मोजत तग धरुन आहे. या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून संरक्षक कठड्यांना तडे जाऊन लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. हा पूल केव्हाही कोसळू शकतो, अशी स्थिती झाली आहे.