शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

नंदुरबार : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव रेल्वे मार्गावरील प्रवासी गाड्या गेल्या दीड वर्षात वेळाेवेळी बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. केवळ ...

नंदुरबार : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव रेल्वे मार्गावरील प्रवासी गाड्या गेल्या दीड वर्षात वेळाेवेळी बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. केवळ गरजेच्या गाड्या वगळता लांब पल्ल्याच्या काही विशेष प्रवासी रेल्वे गाड्या मार्गावर सध्या सुरू आहेत; परंतु या विशेष गाड्या प्रवाशांची लूट करणाऱ्या ठरत असून प्रवाशांना जवळच्या शहरांसाठी आरक्षण करून जादा भाडे द्यावे लागत आहे.

एप्रिल २०२० मध्ये शिरकाव करणाऱ्या कोरोनामुळे प्रथमच देशाची जीवनवाहिनी असलेली रेल्वे बंद पडली होती. उधना ते जळगाव मार्गावर नंदुरबार रेल्वेस्थानकातून दरदिवशी साधारण ५२ प्रवासी गाड्या धावत होत्या. या गाड्या कोरोनामुळे पूर्णपणे थांबवून कोविड विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या. गुजरात, उत्तर भारत, पूर्वोत्तर राज्य आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या या गाड्यांमधून जळगाव, भुसावळ, सुरत, बारडोली आदी शहरात जाण्यासाठी रिझर्व्हेशन करावे लागत असल्याने प्रवासीही हैराण झाले आहेत. आरक्षणानंतरही जागा मिळण्याबाबत अडचणी असल्याने या गाड्यांपेक्षा प्रवासी खाजगी वाहने किंवा एसटीने प्रवास करतात.

विशेष प्रवासी रेल्वे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पहाटेच्या पॅसेंजर गाड्या बंद केल्या आहेत. मात्र पुरी-अजमेर, हिसार-सिकंदराबाद यासह आणखी दोन विशेष गाड्या सुरू ठेवल्या आहेत. या गाड्यांना अन्य एक्स्प्रेसपेक्षा भाडे जास्त आकारले जात आहे. अहमदाबाद-बरोनी या विशेष रेल्वे गाडीला नंदुरबार स्थानकात थांबा आहे; परंतु तिचे तिकीट दर महाग असल्याने प्रवाशांना अडचणी येतात. नंदुरबार येथून आरक्षण होत नाही.

तिकिटात फरक किती?

पॅसेंजरने नंदुरबार ते जळगाव भाडे ३७ रु., तर नवजीवन व हावडा या गाड्यांचे तिकीट हे ७८ रुपये आहे. या विशेष गाड्यांना ७५ ते ८० रुपये जादा लागत आहेत. हे वाढीव दर कमी करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी

सद्य:स्थितीत पॅसेंजर व मेमो गाड्यांना आरक्षणाची गरज नाही; परंतु नवजीवन एक्स्प्रेस, अहमदाबाद हावडा, अजमेरपुरी, ताप्ती-गंगा, खान्देश, बरोनी एक्स्प्रेस आदी गाड्यांना आरक्षण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. जनरल डबा नसल्याने सर्वसामान्य प्रवाशाला जादा पैसे द्यावे लागतात. सुरत शहराकडे जातानाही आरक्षण करण्याची सक्ती केली जात आहे. आरक्षणानंतरही जागा मिळत नसल्याचे प्रवासी सांगत आहेत.

कोरोनात गर्दी आटोक्यात येण्यासाठी आरक्षण महत्त्वाचे होते; पण कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने आरक्षण अट रद्द करणे आवश्यक ठरत आहे.

लांब पल्ल्याच्या सर्वच प्रवासी गाड्यांना आरक्षण अत्यावश्यक आहे. त्याशिवाय गाडीत प्रवेश मिळत नाही. भुसावळ-सुरत-भुसावळ रेल्वेलाइनवरील नंदुरबार रेल्वेस्थानकावर आजघडीस लांब पल्ल्याच्या ४२ गाड्या आठवडाभरातून चालत आहेत. यातील चार गाड्या ह्या दैनंदिन तर उर्वरित गाड्या ह्या साप्ताहिक आहेत. सर्वच गाड्यांना नंदुरबार येथे थांबा आहे; परंतु काही गाड्यांचे आरक्षण मात्र सुरत किंवा बडोदा या स्थानकांचे अंतर दर्शवून काढावे लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. यातून २०० ते २५० रुपयांचा जादा खर्च करावा लागत असल्याची माहिती आहे. दरम्यान, आरक्षणही मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.

सुरत-अमरावती पॅसेंजर गाडी सुरू करण्यासह नियमित पॅसेंजर गाड्या सुरू केल्या पाहिजेत. रात्री व पहाटेची पॅसेंजर गाड्यांची एक फेरी वाढवली पाहिजे. नवजीवन व हावडा यासारख्या गाड्यांचे आरक्षण रद्द करून जनरल बोगी लावून प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी संधी देणे गरजेचे आहे. गुजरातमध्ये प्रवास होत असल्याने तिकिटासाठी धावपळ होते.

-संदेश पाटील, प्रवासी

नंदुरबार हे मोठे स्थानक आहे. सुविधा निर्माण झाल्या आहेत. कोरोनामुळे रेल्वे प्रवास करण्यासाठी अनेक अटी लागू करण्यात आल्या आहेत. या अटी शिथिल कराव्यात, विशेष रेल्वे गाड्यांचे दर कमी करावेत, अकोल्यापर्यंतचे रिझर्व्हेशन करण्यासाठी अडचणी येतात. जळगावसाठी रिझर्व्हेशन सक्ती केली जाते. हे थांबवण्याची आवश्यकता आहे. याकडे लक्ष दिले पाहिजे.

-योगेश चाैधरी, प्रवासी