शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

नंदुरबार : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव रेल्वे मार्गावरील प्रवासी गाड्या गेल्या दीड वर्षात वेळाेवेळी बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. केवळ ...

नंदुरबार : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव रेल्वे मार्गावरील प्रवासी गाड्या गेल्या दीड वर्षात वेळाेवेळी बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. केवळ गरजेच्या गाड्या वगळता लांब पल्ल्याच्या काही विशेष प्रवासी रेल्वे गाड्या मार्गावर सध्या सुरू आहेत; परंतु या विशेष गाड्या प्रवाशांची लूट करणाऱ्या ठरत असून प्रवाशांना जवळच्या शहरांसाठी आरक्षण करून जादा भाडे द्यावे लागत आहे.

एप्रिल २०२० मध्ये शिरकाव करणाऱ्या कोरोनामुळे प्रथमच देशाची जीवनवाहिनी असलेली रेल्वे बंद पडली होती. उधना ते जळगाव मार्गावर नंदुरबार रेल्वेस्थानकातून दरदिवशी साधारण ५२ प्रवासी गाड्या धावत होत्या. या गाड्या कोरोनामुळे पूर्णपणे थांबवून कोविड विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या. गुजरात, उत्तर भारत, पूर्वोत्तर राज्य आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या या गाड्यांमधून जळगाव, भुसावळ, सुरत, बारडोली आदी शहरात जाण्यासाठी रिझर्व्हेशन करावे लागत असल्याने प्रवासीही हैराण झाले आहेत. आरक्षणानंतरही जागा मिळण्याबाबत अडचणी असल्याने या गाड्यांपेक्षा प्रवासी खाजगी वाहने किंवा एसटीने प्रवास करतात.

विशेष प्रवासी रेल्वे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पहाटेच्या पॅसेंजर गाड्या बंद केल्या आहेत. मात्र पुरी-अजमेर, हिसार-सिकंदराबाद यासह आणखी दोन विशेष गाड्या सुरू ठेवल्या आहेत. या गाड्यांना अन्य एक्स्प्रेसपेक्षा भाडे जास्त आकारले जात आहे. अहमदाबाद-बरोनी या विशेष रेल्वे गाडीला नंदुरबार स्थानकात थांबा आहे; परंतु तिचे तिकीट दर महाग असल्याने प्रवाशांना अडचणी येतात. नंदुरबार येथून आरक्षण होत नाही.

तिकिटात फरक किती?

पॅसेंजरने नंदुरबार ते जळगाव भाडे ३७ रु., तर नवजीवन व हावडा या गाड्यांचे तिकीट हे ७८ रुपये आहे. या विशेष गाड्यांना ७५ ते ८० रुपये जादा लागत आहेत. हे वाढीव दर कमी करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी

सद्य:स्थितीत पॅसेंजर व मेमो गाड्यांना आरक्षणाची गरज नाही; परंतु नवजीवन एक्स्प्रेस, अहमदाबाद हावडा, अजमेरपुरी, ताप्ती-गंगा, खान्देश, बरोनी एक्स्प्रेस आदी गाड्यांना आरक्षण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. जनरल डबा नसल्याने सर्वसामान्य प्रवाशाला जादा पैसे द्यावे लागतात. सुरत शहराकडे जातानाही आरक्षण करण्याची सक्ती केली जात आहे. आरक्षणानंतरही जागा मिळत नसल्याचे प्रवासी सांगत आहेत.

कोरोनात गर्दी आटोक्यात येण्यासाठी आरक्षण महत्त्वाचे होते; पण कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने आरक्षण अट रद्द करणे आवश्यक ठरत आहे.

लांब पल्ल्याच्या सर्वच प्रवासी गाड्यांना आरक्षण अत्यावश्यक आहे. त्याशिवाय गाडीत प्रवेश मिळत नाही. भुसावळ-सुरत-भुसावळ रेल्वेलाइनवरील नंदुरबार रेल्वेस्थानकावर आजघडीस लांब पल्ल्याच्या ४२ गाड्या आठवडाभरातून चालत आहेत. यातील चार गाड्या ह्या दैनंदिन तर उर्वरित गाड्या ह्या साप्ताहिक आहेत. सर्वच गाड्यांना नंदुरबार येथे थांबा आहे; परंतु काही गाड्यांचे आरक्षण मात्र सुरत किंवा बडोदा या स्थानकांचे अंतर दर्शवून काढावे लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. यातून २०० ते २५० रुपयांचा जादा खर्च करावा लागत असल्याची माहिती आहे. दरम्यान, आरक्षणही मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.

सुरत-अमरावती पॅसेंजर गाडी सुरू करण्यासह नियमित पॅसेंजर गाड्या सुरू केल्या पाहिजेत. रात्री व पहाटेची पॅसेंजर गाड्यांची एक फेरी वाढवली पाहिजे. नवजीवन व हावडा यासारख्या गाड्यांचे आरक्षण रद्द करून जनरल बोगी लावून प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी संधी देणे गरजेचे आहे. गुजरातमध्ये प्रवास होत असल्याने तिकिटासाठी धावपळ होते.

-संदेश पाटील, प्रवासी

नंदुरबार हे मोठे स्थानक आहे. सुविधा निर्माण झाल्या आहेत. कोरोनामुळे रेल्वे प्रवास करण्यासाठी अनेक अटी लागू करण्यात आल्या आहेत. या अटी शिथिल कराव्यात, विशेष रेल्वे गाड्यांचे दर कमी करावेत, अकोल्यापर्यंतचे रिझर्व्हेशन करण्यासाठी अडचणी येतात. जळगावसाठी रिझर्व्हेशन सक्ती केली जाते. हे थांबवण्याची आवश्यकता आहे. याकडे लक्ष दिले पाहिजे.

-योगेश चाैधरी, प्रवासी