शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अपनेही घर में हम कैसे हुए पराये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

नंदुरबार : राजकारणात निष्ठेला महत्त्व असते, असे नेहमी सांगितले जाते. मात्र, अलीकडे सत्ताकेंद्रित राजकारणात निष्ठेला मात्र फारसे महत्त्व राहिले ...

नंदुरबार : राजकारणात निष्ठेला महत्त्व असते, असे नेहमी सांगितले जाते. मात्र, अलीकडे सत्ताकेंद्रित राजकारणात निष्ठेला मात्र फारसे महत्त्व राहिले नाही. व्यक्तीचे ‘वजन’ लक्षात घेऊन त्याचे राजकारणातील स्थान निश्चित केले जाते. असेच काहीसे चित्र नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणातही पाहायला मिळत आहे. विशेषत: काँग्रेस पक्षात अलीकडेच जिल्हा परिषदेच्या चार सदस्यांना बजावलेल्या नोटिसींचे पडसाद उमटू लागले असून, त्यातून ज्या सदस्यांना नोटिसी बजावल्या त्यांचे ‘अपनेही घर में हम कैसे हुए पराये...’ असा सूर उमटू लागला आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेत ११ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत वित्त आयोगाच्या निधी सर्व सदस्यांना समान वाटप करावा यासंदर्भातील निवेदनावर सही केल्याच्या कारणावरून काँग्रेसचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांचे पुत्र अजित सुरूपसिंग नाईक, मधुकर सुरूपसिंग नाईक, देवमन पवार व शरद वसावे या चार सदस्यांना काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी नोटीस बजावली. या नोटिसीवर काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद पाहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील चित्र पाहिल्यास जिल्ह्यात सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत काँग्रेस पक्षातच आजवर वाटचाल करणारे व पक्षाशी निष्ठा बाळगणारे एकमेव नेते म्हणजे माजी मंत्री सुरूपसिंग नाईक हे एकमेव आहेत. आज काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व ज्येष्ठ नेते असले तरी त्यांचा प्रवास कुठल्या ना कुठल्या पक्षात झाला आहे. ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आदिवासी विकासमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांची सुरुवात जनता दलापासून आहे. त्यानंतर काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवून विजय मिळविला होता व पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनीदेखील एक वेळ गवळी सेनेकडून निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरी त्यांचे पुत्र भरत गावित यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. स्व. बटेसिंग रघुवंशी व त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र चंद्रकांत रघुवंशी हेदेखील अनेक वर्षे काँग्रेसवासी होते. मात्र, दीड वर्षापूर्वीच त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे केवळ अपवाद आता ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक हेच राहिले आहेत. १९६० पासून त्यांची काँग्रेस पक्षात वाटचाल सुरू आहे. या काळात स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी आणि त्यानंतर सोनिया गांधी यांचे ते निकटवर्ती राहिले आहेत. वयोमानाने ते निवडणुकीपासून अलिप्त असले तरी त्यांचे पुत्र शिरीष नाईक हे काँग्रेसचे आमदार आहेत, तसेच त्यांचे दोन्ही पुत्र व स्नुषा यादेखील काँग्रेसच्याच राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे निष्ठावान घराणे म्हणजे नाईक घराणे हे ओळखले जाते. याच घराण्यातील दोन जिल्हा परिषद सदस्यांना व त्यांच्याच गटातील इतर दोन सदस्यांना पक्षाने नोटीस बजावल्याने राजकीय पडसाद उमटणे स्वाभाविकच आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अद्याप नियुक्त झालेले नाहीत. त्यामुळे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी ही नोटीस बजावली आहे. नाईक हे आज मंत्री के.सी. पाडवी यांचे निकटवर्ती मानले जातात. ते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांनीच नाईक घराण्यातील सदस्यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याची नोटीस बजावली आहे. त्यावर संबंधितांनी आपण कुठलीही पक्षशिस्त मोडलेली नाही, विकासकामांबाबत सार्वजनिक भूमिका घेतली आहे. ती पक्षाच्या शिस्तीत मोडत नाही. पक्षाचीही विकासाबाबत सर्वसमान भूमिका असल्याने तीच भूमिका आपण घेतली; पण त्याचे कारण पुढे करून नोटीस बजावणे निश्चितच भेद निर्माण करणारी भूमिका असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. जे पक्षात निष्ठावान आहेत त्यांनाच आता बाहेरील पक्षातून येऊन लोक नोटिसा बजावत आहेत, अशी राजकीय चर्चा सध्या यानिमित्ताने सुरू झाल्याने तो सर्वच पक्षांसाठी विचार करायला भाग पाडणारा विषय ठरला आहे. काँग्रेसच्या चार जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा कार्याध्यक्षांची नोटीस बजावण्यामागील भूमिका काय होती, तो विषय वेगळा असला तरी त्यानिमित्ताने काँग्रेसअंतर्गत मोठे राजकारण शिजत असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात काँग्रेसचेच कार्यकर्ते करत आहेत.