शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक अक्राणी महाल शासकीय अनास्थेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST

महाराणा प्रताप यांच्या भगिनी अक्काराणी यांच्या वास्तव्याचे दाखले देण्यात येणाऱ्या अक्राणी महालाची निर्मिती १७ व्या शतकात काठीचे संस्थानिक राणा ...

महाराणा प्रताप यांच्या भगिनी अक्काराणी यांच्या वास्तव्याचे दाखले देण्यात येणाऱ्या अक्राणी महालाची निर्मिती १७ व्या शतकात काठीचे संस्थानिक राणा गुमानसिंग यांनी हा किल्ला बांधला असल्याचे मत इतिहासकारांचे आहे. राजस्थानातून १७ व्या शतकात आश्रयास आलेल्या राजपूत योद्धांनी हा किल्ला बांधला असल्याचा दावा ब्रिटिश इतिहासकारांनी केला आहे. अनेकविध दावे आणि प्रतिदावे असले तरीही राजस्थानी बनावट असलेला हा किल्ला बांधकामाचा अजोड असा नमुना आहे. सातपुड्याच्या डोंगरामध्ये संपूर्ण विटांनी केलेले बांधकाम लक्षवेधी आणि प्रगत अशा विचारांचे आहे. तीन दिशेला भिंती आणि भक्कम अशा तटबंदी यातून शत्रूची बांधबंदिस्ती करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. पुरातन बारव आणि दगडात कोरलेले एक राणीकाजल मातेचे मंदिरही येथे आहे. या किल्ल्याच्या आजूबाजूला केलिपाणी, बेडवाई (विहिरीमाळ) ही गावे आहेत.

ऐतिहासिक महत्त्व

१६३४ मध्ये शहाजहानने अक्राणी महाल हे संस्थान म्हणून घोषित केल्याची नोंद धुळे गॅझेटमध्ये आहे.

महाराणा प्रताप यांच्या भगिनी अक्करानी यांचे येथे वास्तव्य राहिल्याचे दाखले दिले जातात यामुळे या परिसराला अक्राणी असे नाव पडले.

या परिसरात इतिहासाच्या खाणाखुणा,नाणी सापडत आहेत.

येथील राणी काजल माता राजस्थान व महाराष्ट्रातील राजपूत समाज बांधवांची कुलदैवत असल्याचे सांगण्यात येते.

डागडुजी व दुरुस्तीची आजवर प्रतीक्षा

संपूर्ण विटांचे बांधकाम असलेल्या महालांच्या भिंती दिवसेंदिवस अधिक जीर्ण होत आहेत. किल्ल्याचे संवर्धन न झाल्यास लवकरच या भिंती नष्ट होणार आहेत. पर्यटक म्हणून येणारे सोबतचा कचराही येथेच टाकत असल्याने वास्तू खराब होत आहे. प्रशासनाने लक्ष दिल्यास हा ऐतिहासिक ठेवा जपला जाणार आहे.

पुरातत्त्व विभागाला विसर

सातपुड्याच्या डोंगराळ भागात निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या अक्राणी महाल किल्ल्याचा पुरातत्त्व विभागाला विसर पडला आहे असे दिसून येत आहे. येथे आजवर कोणत्याच अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

या किल्ल्याचे पुरातत्त्व विभागाने जतन करणे आवश्यक आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक येथे लावण्याची अत्यंत गरज आहे. किल्ल्यात समाधी आहेत त्यांचे संवर्धन होण्याची गरज असल्याची माहिती बेडवाई, ता. तळोदा येथील राकेश पटले यांनी दिली.