शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पोलीस भरती तुर्तास रद्द झाल्याने इच्छुकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोलीस भरतीबाबत मोठी आशा लावून बसलेल्या इच्छुक युवकांचा हिरमोड झाला आहे. शासनाने भरतीचा आदेश ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पोलीस भरतीबाबत मोठी आशा लावून बसलेल्या इच्छुक युवकांचा हिरमोड झाला आहे. शासनाने भरतीचा आदेश तात्पुरता स्थगित केला आहे. आता कधी ही भरती होईल याकडे युवकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, काही युवक वयोमर्यादा निघून जाण्याची स्थिती असून त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस दलात भरती होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्यादृष्टीने अनेक युवकांनी तयारी सुरू केली होती. अभ्यास आणि शाररिक कसरत याला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने भरती संदर्भात आदेश देखील काढला होता. परंतु तो लागलीच रद्द करण्यात आला. त्यामुळे तयारी केलेल्या युवकांचा हिरमोड झाला आहे. शासनाने लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा या युवकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, युवकांनी आपली तयारी सुरूच ठेवली असून  भरती होईल अशी अपेक्षा आहे.

सहा हजार लोकांमागे एक पोलीसजिल्ह्यात पोलीस दलातील कर्मचारी संख्या १५०० पर्यंत आहे. तर जिल्ह्यातील एकुण लोकसंख्या ही १६ लाखापेक्षा अधीक आहे. याचा विचार करता साधारणत: सहा हजार लोकांमागे एक पोलीस कर्मचारी असल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्ह्यात पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचारी यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. 

 

गेल्या तीन वर्षांपासून पोलीस भरती प्रलंबित असून अहोरात्र मेहनत उमेदवार घेत आहेत. परंतु शासनाकडून भरतीची निश्चित तारीख व पदे भरत भरले जात नाहीत. प्रत्येक वर्षी फक्त आश्वासन मिळत असल्याने पोलीस भरती करणारे उमेदवार निरा होताना दिसत आहे. ते संभ्रमात आहेत म्हनून शासनाने योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर मेगा भरती काढावी.                 - विक्की साळवे, नंदुरबार.

 राज्यसरकार पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यावरून उमेदवारामध्ये सभ्रम निर्माण करत   आहे. पोलीस भरती बाबत प्रक्रीया बाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी, शासनाने आधिक वेळ उमेदवारांना आशेवर न ठेवता पोलीस भरती जाहीर करून प्रकिया राबवावी, जेणे करून भरती करणाऱ्या तरूणामध्ये उत्साह वाढेल.                  -अमोल शेवाळे, नंदुरबार.

 

पोलीस भरती करणारे उमेदवार दिवसभर अभ्यास करून सांयकाळी मैदाणी सराव करत आहे. मात्र सरकार आश्वासन देत असून भरती प्रकिया बाबत निर्णय घेत नसल्याने फक्त आशेवर ठेवले आहे. त्यामुळे एक वर्षानी वय बाद होणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होणार आहे. शासनाने दिलासादायक निर्णय घ्यावा.       -रवींद्र चव्हाण, नंदुरबार.