शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन झाल्यास भरघोस उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 11:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मिरची पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. ढोबळ पद्धतीने खत व्यवस्थापन होत असल्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मिरची पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. ढोबळ पद्धतीने खत व्यवस्थापन होत असल्यामुळे उत्पादन कमी होत असल्याचेही छत्तीसगढचे मिरची तज्ज्ञ नवीन पेडीयार यांनी सांगितले. डॉ.हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र कोळदा येथे मिरची पिकावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यात छत्तीसगढ मधील प्रख्यात मिरची तज्ञ नवीन पेडीयार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृष्णदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्ह्यातील प्रमुख मिरची उत्पादकांची उपस्थिती लाभली. मागील हंगामात लाल व हिरव्या मिरचीला मिळालेला दर व सध्याच्या हंगामात लांबलेल्या पावसामुळे ब:याच शेतक:यांचा कल मिरची पिकाकडे दिसू लागला आहे. या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्राद्वारे कृषक मंडळात मिरची पिकावर एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले होते.असंतुलित ढोबळ पद्धतीने खत व्यवस्थापन केल्यामुळे मिरचीच्या मुळांच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात क्षार वाढत असतात व याचा फटका मिरची पिकाच्या कायिक वाढीवर आणि  उत्पादनावर होत असल्याचे प्रतिपादन नवीन यांनी केले.कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आर.एम. पाटील यांनी मिरची पिकाची जिल्ह्यातील सद्य:स्थिती शेतक:यांसमोर मांडली. मिरची उत्पादकांना आपल्या अडचणींच्या निरसनासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला मिरची उत्पादकाच्या शेतात एकत्रित येण्याचे पाटील यांनी सूचित केले. दरम्यान, जिल्ह्यातील मिरची उत्पादकांसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला असून, जिल्ह्यातील समस्त मिरची उत्पादकांनी यासाठी आपले नंबर देण्याचे, ही आवाहन करण्यात आले.कृष्णदास पाटील यांनी शेतक:यांना कृषी विज्ञान केंद्राच्या सानिध्यात राहून केंद्राद्वारे वेळोवेळी विविध पिकांवर होत असलेले मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात लाल व हिरव्या मिरचीचे शहादा तालुक्यात 39 टन प्रति एकर विक्रमी उत्पादन घेणारे औरंगपूर येथील विक्की पटेल तसेच नंदुरबार तालुक्यात 45 टन प्रति एकर विक्री उत्पादन घेणारे सावळदा येथील रामेश्वर पटेल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रगतीशिल शेतकरी योगेश पटेल, आशिष पटेल, प्रविण पाटील यांनीही अनुभव मांडले. सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ पी.सी. कुंदे यांनी केले. जयंत उत्तरवार, उमेश पाटील, आरती देशमुख, राजेश भावसार, विजय बागल, डॉ.महेश गणापुरे, गीता कदम, राहुल नवले, कल्याण पाटील, रजेसिंग राजपूत, किरण मराठे, कैलास सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

या प्रशिक्षणात मिरची तज्ञ नवीन पेडीयार यांनी शेतक:यांना मिरचीच्या रोप निर्मितीपासून तर मिरची पिकातील फटीर्गेशन, रोग, कीड नियंत्रणावर विस्तृत मार्गदर्शन केले. मिरची पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्वाचे असून, यासाठी फटीर्गेशन रोपांच्या लागवडीनंतर आठवडय़ाभरात प्रारंभ करणे महत्वाचे आहे.