शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वारस दाखला व जन्म-मृत्यू नोंद दंडाधिकाऱ्यांमार्फत मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST

निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील जनजाती आदिवासी समाजातील बहुल वस्ती असलेले धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, नवापूर व शहादा तालुक्यात ...

निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील जनजाती आदिवासी समाजातील बहुल वस्ती असलेले धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, नवापूर व शहादा तालुक्यात सामान्य जनतेला घरातील कुटुंबीय मृत झाल्यास त्यासाठी त्याला स्थावर मिळकत कामासाठी न्यायालयातून वारस दाखला आणावा, असे महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे सामान्य आदिवासी गरीब जनतेला न्यायालयाचा खर्च व वेळ न परवडणारा आहे. ती प्रक्रियाही जाचक असल्याने कायद्यातील तरतुदींचा अवलंब करून महसूल विभागातील तालुका दंडाधिकारी यांना वारस दाखला देण्याचे आदेश निर्गमित करावे. न्यायालयही वारस दाखला देताना महसूल विभागाचाच आधार घेत आहे. त्यामुळे सामान्य जनतेस कोणत्याही प्रकारच्या अधिकचा खर्च व वेळ वाचविण्यासाठी वारस दाखला हा संबंधित तहसीलदारांना देण्याचे निर्देश करावे.

जन्म-मृत्यू नोंदीबाबतही अशीच अवस्था आहे. आदिवासी समाज हा अशिक्षित असल्याने त्यांच्याकडून कुठलीही नोंद राहून गेली असल्यास तीसुद्धा न्यायालयातील प्रक्रियेनंतर करावी लागत आहे. त्यासाठीही वेळ व पैसा खर्च होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासीबांधवांसह गरीब जनतेचा वेळ वाचावा, खर्च वाचावा यासाठी आपण जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना लिखित स्वरूपात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व तत्सम कायदे व त्यातील तरतुदींचा आधार घेत वारस दाखला व जन्म नोंद करून देण्याबाबतचे आदेश पारित करावे. त्यामुळे जनतेचा वेळ व पैसा वाचणार असल्याचे निवेदनात नागेश पाडवी यांनी म्हटले आहे.