शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

अवजड वाहनांमुळे तळोद्यातील मुख्य रस्त्यांवर होते वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 13:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  अवजड वाहन चालक आपले वाहन शहरातील मुख्य बाजारपेठेकडूनच नेत असल्यामुळे सातत्याने वाहतुकीच्या कोंडीत भर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  अवजड वाहन चालक आपले वाहन शहरातील मुख्य बाजारपेठेकडूनच नेत असल्यामुळे सातत्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असून, वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेनेदेखील याकडे साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाने तरी वाहतुकीच्या कोंडीबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.                           ट्रक, डंपर व उसाने भरलेला ट्रॅक्टर अशी अवजड वाहने चालक सर्रासपणे शहरातून नेत असतात. हे वाहन चालक मुख्यतः बस स्थानक, मेन रोड, हातोडा रोड अशा वर्दळीच्या प्रमुख मार्गावरून नेत असतात. त्यामुळे येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. कधी कधी १५ ते २० मिनिटापर्यंत कोंडी सुटत नाही. काही वाहनचालक जोर जोराने वाहनांचे कर्कश  हॉर्न वाजवत असतात. साहजिकच यामुळे नागरिकांना ध्वनिप्रदूषणास तोंड द्यावे लागते. त्यातही अवजड वाहनांमधून पुढे मार्गक्रमण करताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागते, अशी व्यथा काही पादाचारीनी बोलून दाखवली आहे. आधीच व्यावसायिकांचे पक्के अतिक्रमण व त्यातच गाड्या मनमानीपणे रस्त्याच्या मधोमध उभ्या केल्या जात असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यात अवजड वाहनांनी भर टाकली आहे. वास्तविक रोजच वाहतुकीच्या कोंडीचे चित्र तळोदेकरांना पहावयास मिळत असताना ते पोलिसांना दिसत नसल्याने शहरवासीयांनी सखेद आशचर्य व्यक्त केले आहे. वाहतुकीची ही डोकेदुखी केव्हा मिटणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. निदान नूतन पोलीस निरीक्षकांनी तरी या प्रकरणी सुयोग्य नियोजन करावे अशी तमाम तळोदाकरांची रास्त अपेक्षा आहे.

मोकाट गुरांच्या प्रश्न मार्गी लावावा.    मोकाट गुरांमुळे सर्वच जण प्रचंड वैतागले आहेत. मात्र पालिका आणि पोलीस या दोन्ही यंत्रणांनी त्याकडे साफ कानाडोळा केला आहे. तसेच पशुपालकांवर ठोस कार्यवाही केली जात नसल्यामुळे त्यांची मनमानी अधिकच वाढली आहे. शहरवासीयांनीदेखील सोशिक भूमिका घेतल्याने पालिकेने सुध्दा गिळमिळीत धोरण घेतले आहे.   परिणामी मोकाट गुरेही शहरवासीयांच्या पिच्छा सोडत नसल्याचे विदारक चित्र आहे

वाहतूक शाखेला केवळ डायव्हर्शनकडेच इंटरेस्ट. शहरातील वाहतुकीची कोंडी होऊ नये, ती सुरळीत रहावी याची जबाबदारीदेखील वाहतूक शाखेची असते. परंतु याचे भान पोलीस विसरले की, काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कारण केवळ मारोती मंदिर वगळता इतरत्र वाहतुकीचे नियंत्रण करताना पोलीस दिसतच नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हातगाड्याधारक व वाहन चालक यांचे फावले आहे. अगदी कुठेही रस्त्याच्या कडेला वाहने लावतात आणि वाहतुकीची कोंडी करीत असतात. शुक्रवार हा बाजाराच्या दिवस असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे समजू शकतो. परंतु ही कोंडी आता कायमचीच झाली आहे. वास्तविक निदान बस स्थानक रोड, मेन रोड या दोन प्रमुख मार्गांवर तरी सुरळीत वाहतुकीसाठी एखादा कर्मचारी कायम स्वरुपी नेमणे आवश्यक आहे. तथापि पोलिसांना डायव्हर्शन रस्त्यातच अधिक इंटरेस्ट असल्याचा नागरिकांच्या आरोप आहे. अधिकाऱ्यांनी ही याबाबीकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून नाराजीच्या सूर व्यक्त केला जात आहे. शहरवासीयांना सतत डोकेदुखी ठरणारी वाहतुकीच्या कोंडीविषयी वरिष्ठांनी दखल घ्यावी, अशी मागणी आहे.