शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी कापणी प्रयोग आले अंतीम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पिक विमा योजनेत सहभाग देणा:या 9 हजार शेतक:यांना यंदा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत़ पीक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पिक विमा योजनेत सहभाग देणा:या 9 हजार शेतक:यांना यंदा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत़ पीक विमा योजनेंतर्गत कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात आले असून यंदा पीक कापणी प्रयोगांचा अहवाल ऑनलाईन  सादर केला जाणार आह़े यातून भरपाईही 2020 मध्येच मिळण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती आह़े             जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग  घेऊनही शेतक:यांना भरपाई मिळत नसल्याने मोजक्याच शेतक:यांनी योजनेत सहभाग घेण्याबाबत यंदा उदासिन भूमिका घेतली होती़ यातून या योजनेला मुदतवाढ मिळूनही केवळ 9 हजार शेतकरी पिक विमा योजनेच्या कक्षेत येऊ शकले होत़े सलग  निर्माण झालेले दुष्काळ आणि त्यानंतर आलेली नापिकी यानंतरही शेतक:यांना भरपाई  मिळालेली नव्हती़ यंदाही पीक विमा शेतक:यांनी याकडे पाठ फिरवली होती़ परंतू काही शेतक:यांनी तयारी दर्शवून पिक विमा करवून घेतला होता़ यात जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेली अतीवृष्टी आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे शेतीउत्पादनांची मोठी हानी झाली होती़ या पाश्र्वभूमीवर कृषी विभाग आणि विम्याचा करार करण्यात आलेली कंपनी यांच्याकडून खरीप हंगामानंतर जानेवारी महिन्यात केले जाणारे पिक कापणी प्रयोग यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरु करण्यात आले होत़े जिल्ह्यातील एकूण 36 मंडळात सुरु असलेले हे प्रयोग आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या 10 दिवसात हे प्रयोग पूर्ण होणार असल्याची माहिती आह़े यातही कापूस आणि तूर पीक अद्यापही शेतशिवारात शिल्लक असल्याने प्रयोगांना विलंब होत असल्याची माहिती आह़े यंदा करण्यात येणा:या प्रयोगात पाच वर्षाची उत्पादनक्षमता ही ऑनलाईन पडताळणी करण्यात येत असल्याने नुकसान आहे किंवा नाही, याची पडताळणी जागच्याजागीच होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आह़े 

नंदुरबार जिल्ह्यात 2019-20 या वर्षात जुलै अखेर्पयतच्या अंतिम मुदतीत 2 हजार 694 कजर्दार तर 3 हजार 784 बिगर कजर्दार शेतक:यांनी पिकविमा करवून घेतला होता़ एकूण 6 हजार 482 शेतक:यांनी 1 कोटी 19 लाख 80 हजार 328 रुपयांचा भरणा केला होता़ यातून 7 हजार 46 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होत़े शासनाने तातडीने दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा नव्याने 3 हजार 313 शेतक:यांनी पीक विमा करुन घेतला होता़ यामुळे जिल्ह्यात आजअखेरीस नंदुरबार जिल्ह्यात 4 हजार 411 कजर्दार तर 5 हजार 385 बिगर कजर्दार शेतक:यांनी खरीप पिकांचा विमा करुन घेतला आह़े एकूण 9 हजार 796 शेतक:यांकडून 1 कोटी 67 लाख 38 हजार 520 रुपयांची रक्कम विम्यापोटी जमा झाली आह़े 10 हजार 306 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आह़े शासनाने 8 कोटी 12 लाख 53 हजार रुपये अनुदान देत विमा कंपनीकडे 36 कोटी 82 लाख रुपयांचा भरणा झाला होता़ 4जिल्ह्यात 36 मंडळात विविध खरीप पिकांची काढणी केल्यानंतर विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषी विभाग यांच्या समन्वयाने 1 हजार 835 पीक कापणी प्रयोग केले जातात़ आजअखेरीस 1 हजार 400 प्रयोग पूर्ण झाले असून त्यांचा ऑनलाईन अहवाल कृषी आयुक्तालयात वर्ग करण्यात आला आह़े 

जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात 13 हजार 101 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले होत़े यातून 19 हजार शेतकरी बाधित झाले होत़े यासाठी शासनाकडे 42 कोटी 43 लाख 53 हजार रुपयांच्या भरपाईचा मागणीचा प्रस्ताव देण्यात आला आह़े या प्रस्तावामुळे विमा भरपाईवर परिणाम होण्याची चर्चा सुरु होती़ परंतू प्रत्यक्षात या दोन्ही बाबी पूर्णपणे वेगळ्या असल्याचे सांगण्यात आले आह़े पीक कापणी प्रयोगादरम्यान मंडळानिहाय झालेले नुकसान आणि आलेले उत्पादन यांचा लेखाजोखा गोळा करण्यात येणार आह़े यातून एका मंडळात अधिक नुकसान होऊन उत्पादकता घटली असल्याचे समोर आल्यानंतर तेथील शेतकरी पिक विम्याच्या 100 टक्के परताव्याला पात्र ठरणार असल्याचे कामकाजातून समोर आले आह़े