शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

एक रुपयाही मानधन न घेता शेकडो विद्यार्थी घडविणारे गोसावी मास्तर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विनाअनुदानित तत्त्वाच्या शासनाच्या धोरणाने शेकडो शिक्षकांना वेठबिगारी ठरविले आहे. या शिक्षकांच्या व्यथा आणि वेदना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : विनाअनुदानित तत्त्वाच्या शासनाच्या धोरणाने शेकडो शिक्षकांना वेठबिगारी ठरविले आहे. या शिक्षकांच्या व्यथा आणि वेदना त्या शिक्षकांनाच ठाऊक. पण वेतन मिळाले नाही म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविणे थांबवित नाहीत. त्याचा प्रत्यय गोसावी मास्तरांनी घडविला आहे. तब्बल १७ वर्षे विना अनुदानित तत्त्वावरील शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवा करून सेवानिवृत्त झाले. एक रुपयाही वेतन त्यांना सेवा काळात मिळाले नाही. त्याबाबत कुठलीही तक्रार न करता आपण शेकडो विद्यार्थी घडविले यातच ते आनंद मानतात.

घोटाणे, ता.नंदुरबार येथील अरविंद रघुनाथ गोसावी या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची ही कहाणी आहे. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न अर्ध्यावरच सोडून ते शिक्षक झाले. त्यांचे शिक्षण एम.ए. बी.एड्.पर्यंत झाले असून, पदवी घेतल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी नोकरीचा प्रयत्न केला. अखेर गावातच जनता माध्यमिक विद्यालयात त्यांना नोकरीची संधी मिळाली. अर्थातच ही शाळा विनाअनुदानित तत्त्वावर असल्याने तेथे ते सुरुवातीला प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नोकरीला लागले. २००३ मध्ये त्यांना अधिकृत मुख्याध्यापक म्हणून मान्यताही मिळाली. शाळा नवीनच असल्याने एकीकडे शाळेचे उभारणीचे कामही त्यांनी सुरू केले आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना अध्यापनासाठीही पुढाकार घेतला. सरांचा इंग्रजी विषय असल्याने अगदी पाचवीपासून ते १० वीपर्यंत ते विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवित होते. याशिवाय हिंदी आणि भूगोल हा विषयही त्यांनी शिकविला. शाळेत तब्बल ३०० विद्यार्थी संख्या होती. आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल या आशेवर त्यांनी तब्बल १७ वर्षे सेवा केली. वयोमानानुसार ३० नोव्हेंबर २०१६ ला ते सेवानिवृत्त झाले. तोपर्यंत शाळा विनाअनुदानितच असल्याने त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत एक रुपयाही वेतन मिळाले नाही.

अर्थात वेतन मिळाले नसले तरी गोसावी मास्तर मात्र आपल्या कामाने समाधानी आहेत. किमान विद्यार्थ्यांना शिकविण्याची आणि घडविण्याची संधी आपल्याला मिळाली ही आपल्या आयुष्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब असल्याचे ते सांगतात. आपण १७ वर्षाच्या सेवेत अनेक विद्यार्थी घडविलेत. त्यामुळे जे केले त्यात मोबदला नसला तरी मनाचे समाधान मोठे आहे, असे ते सांगतात.

१७ वर्षांच्या शिक्षक म्हणून दिलेल्या सेवेने आपण खूप समाधानी आहोत. या काळात आपल्याला एक रुपयाही मानधन मिळाले नसले तरी शिक्षक म्हणून विद्यार्थी घडविण्याचे आणि त्यांंना मार्ग दाखविण्याचे पुण्य मिळविता आले ती खरी आपल्या आयुष्याची कमाई आहे. आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकविले त्यातील अनेक जण आज इंजिनिअर, एसआरपीत अधिकारी, शिक्षक आहेत. ही मंडळी समाज आणि देश सेवेच्या कार्यात काम करीत आहे. वेतन न मिळाल्याने संसारात अडचणी खूप आल्या. पण कुटुंबाची ही साथ मिळाली. आपण ज्या शाळेचे रोपटे लावले होते ते आज वटवृक्ष होत आहे. शेकडो विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. भावी पिढी चांगली घडावी हीच अपेक्षा आहे.

- अरविंद रघुनाथ गोसावी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक