शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोध ग्रामपंचायती होणार मालामाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 13:22 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू आहे. एकूण ८७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम ...

रमाकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू आहे. एकूण ८७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, अर्ज भरणे व छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सर्वांचे लक्ष माघारीकडे लागले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे टोकाचे राजकारणाचे अड्डे. या निवडणुकीतूनच शेजारीपाजारी, भाऊबंदकीही अनेकवेळा तुटते. त्यामुळे गावातील शांतताही बिघडते. पाच वर्षांतून एकदा येणारी निवडणूक पुढे एकमेकांच्या मनातील वैमनस्याची धग पाच वर्ष धगधगत असतो. या परिस्थितीतून सावरण्यासाठी यंदा काही राजकीय नेत्यांनी पक्षीय अट न ठेवता बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी विकासकामांसाठी बक्षिसे देण्याची योजना जाहीर केली आहे.ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्यात नंदुरबार जिल्हा चर्चेत आला तो खाेंडामळी ग्रामपंचायतीच्या अनोख्या लिलाव पद्धतीने. या गावातील लोकांनी गावात मंदिर बांधकामासाठी जो जास्त निधी देईल त्या गटाकडे ग्रामपंचायतीची सत्ता देण्याचा निर्णय घेतला. अर्थातच ग्रामस्थांनी सामूहिक बैठकीतून हा निर्णय जाहीरपणे घेतला. त्याबाबत संपूर्ण राज्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहे. विशेष म्हणजे खोंडामळीनंतर राज्यातही काही गावांमध्ये अशी प्रक्रिया झाल्याचे वृत्त आले. असे निर्णय वाईट की चांगले हा वादातीत मुद्दा असू शकतो. लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेला महत्त्व आहे. त्यामुळे गावात अशा बोली जरी लागल्या तरी तेथील नागरिकांना निवडणूक प्रक्रियेतून जावेच लागणार आहे. या पार्श्वभूमीवर बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी काही लोकप्रतिनिधींनी जाहीर केलेली बक्षिसे खरोखरच गावासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पंचायतराज कायद्यात ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार दिले आहेत. गावातील विकासाचे निर्णय ठरविण्याचे अधिकार ग्रामसभेला देण्यात आले आहे. त्यामुळे गावात एकता टिकून राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी सर्वप्रथम आपल्या मतदारसंघातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी आमदार निधीतून ११ लाख रुपये विकासकामांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. अर्थातच त्यांची ही भूमिका पक्षविरहित आहे. गावात कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असो फक्त त्यांनी एकत्र बसून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला तर गावात शांतता व एकता नांदेल यासाठी ही भूमिका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या निधीतून गावातील रस्ते, गटारींचे प्रश्न सुटू शकतील. विकासाला तेवढीच चालना मिळेल. त्यांच्या भूमिकेनंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनीदेखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनसुविधा योजनेंतर्गत बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी १५ लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले आहे. चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र ॲड. राम रघुवंशी हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात चंद्रकांत रघुवंशी यांना मोठा अनुभव व अभ्यासही आहे. धुळे-नंदुरबार जिल्हा एकत्रित असताना धुळे जिल्हा परिषदेचे ते दोन वेळा अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनी जाहीर केलेली ही योजनादेखील गाव विकासाला चालना देणारी व गावात एकता राखणारी आहे. त्यांनीदेखील बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी पक्षीय अट ठेवलेली नाही. कुठल्याही पक्षाची ग्रामपंचायत असो, जर ती बिनविरोध झाली तर त्याला योजनेचा लाभ मिळेल असे त्यांनी जाहीर केले आहे.एकूणच गावातील राजकारण तापवून व एकमेकांच्या विरोधातून गावातील शांतता भंग करण्यापेक्षा एकत्र बसून ग्रामपंचायत बिनविरोध करून गावाचा विकास साधावा हा साधा मंत्र रघुवंशी व आमदार पाडवी यांनी दिला आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी अनेक ग्रामपंचायती पुढे येतील, असे चित्र असून, सर्वांसाठी ते हिताचेही ठरणार आहे.