शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना को हराना’चे उद्दीष्ट येऊ लागले हळूहळू दृष्टीपथात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:00 IST

मनोज शेलार। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘कोरोना को हराना’ या कोरोनाच्या टॅगलार्ईनप्रमाणे जिल्ह्यात कोरोनाला हळूहळू हरविणाची तयारी सुरू ...

मनोज शेलार।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘कोरोना को हराना’ या कोरोनाच्या टॅगलार्ईनप्रमाणे जिल्ह्यात कोरोनाला हळूहळू हरविणाची तयारी सुरू झाल्याचे गेल्या आठ दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. रुग्ण संख्येचा वाढीचा दर हा ३० ते ४० टक्यांनी कमी झाला आहे. मृत्यूदर देखील कमी झाला असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी वाढली आहे. याला विविध कारणे दिली जात आहे. वास्तविक सर्व व्यवहार सुरळीत सुरू झालेले असतांना हे शुभचित्र समोर येत असल्यामुळे लोकांच्या मनातील भितीही कमी होऊ लागली आहे.नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी आढळून आल्यापासून लोकांच्या मनातील भिती प्रचंड वाढली ती आतापर्यंत टिकून होती. शासन, प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या, लोकांमध्ये जागृती आणली तरी भिती दूर होत नव्हती. अनेकांना तर केवळ लक्षणे आढळल्याच्या धक्यानेच त्यांचा जीव गेल्याचेही उदाहरणे आहेत. असा हा कोरोना आता आपली वेग कमी करू लागल्याची चिन्हे आहेत. आॅक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून ते चित्र दिसून येऊ लागले आहे.विविध कारणेजिल्ह्यात कोरोना कमी होण्याची विविध कारणे असल्याचे चर्चिले जात आहे. त्यात मुख्यत्वे नागरिकांमधील जनजागृती व घेतली जाणारी काळजी, लोकांमधील वाढलेली ह्युमिनीटी, कोरोना विषाणुचा कमी झालेला प्रभाव आणि स्वॅब देणाऱ्यांची कमी झालेली संख्या हे कारणे असल्याचे चर्चिले जात आहे.आॅगस्टमध्ये वाढले दुप्पट मृत्यूआॅगस्ट महिन्यात मृत्यूची संख्या दुप्पट झाली होती. जुलै अखेरीस ३१ मृत्यूसंख्या असतांना आॅगस्ट अखेर ती ७४ झाली होती. तर सप्टेंबर अखेर १२४ वर गेली होती. त्यापूर्वी अर्थात एप्रिल महिन्यात एक, मे महिन्यात दोन, जून महिन्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता.धोका टळलेला नाहीकोरोनाचा धोका मात्र अद्यापही टळलेला नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ आणि प्रशासनाचे म्हणने आहे. वातावरणातील बदल आणि त्यामुळे विषाणूवर झालेला परिणाम हे सद्य स्थितीत कारण असले तरी हिवाळा सुरू होताच पुन्हा कोरोना डोके वर काढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने दक्ष राहणे आवश्यक आहे. सद्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, हॉटेल, मॉल्स उघडले आहेत. त्यामुळे संपर्क वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भिती असल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे.जिल्ह्यात कोरोनाचे पहिले तीन महिने वेग कमी होता. अर्थात चाचण्या कमी झाल्याने हा वेगही मर्यादीत होता. जुलैपासून मात्र त्यात काही प्रमाणात वाढ झाली. आॅगस्टच्या दुसºया आठवड्यापासून स्थानिक ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्या सुरू झाल्या आणि रुग्ण वाढीचा वेग कमालीचा वाढला. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात केवळ १८ रुग्ण होते. मे महिन्यात त्यात १६ ची वाढहोऊन ते ३४ झाले. जून महिन्यात मात्र रुग्णसंख्या चार पटीने वाढून ती १६३ वर पोहचली. जुलै महिन्यात पुन्हा साडेतीन पटीने वाढून रुग्णसंख्या ५४७ पर्यंत गेली. आॅगस्ट महिन्यात पाच पटीने वाढून रुग्णसंख्या ही दोन हजार ६०५ पर्यंत पोहचली. तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हीच संख्या दुप्पट वाढून पाच हजाराचा आकडा पार करून गेली. सद्य स्थितीत साडेपाच हजाराचा टप्पा पार करून गेली आहे.