शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

घरपोच मिळतोय पोषण आहार, शाळेत शिजवलेला आहार नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST

नंदुरबार : शाळा बंद झाल्यापासून विद्यार्थ्यांना घरीच पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. लॅाकडाऊनच्या काळातदेखील शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ...

नंदुरबार : शाळा बंद झाल्यापासून विद्यार्थ्यांना घरीच पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. लॅाकडाऊनच्या काळातदेखील शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना घरपोच पोषण आहार वाटप केला. आता देखील शाळा सुरू झाल्या असल्या तरी शाळेत शिजवलेला पोषण आहार वाटप न करता विद्यार्थ्यांना घरीच तांदूळ, दाळ व कडधान्य दिले जात आहे. दरम्यान, दुर्गम भागातील शाळांमध्ये नियमित वाटप होत नसल्याच्या तक्रारी काही शाळांबाबत झाल्या आहेत.

जिल्ह्यात जवळपास १८०० पेक्षा अधिक प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप केला जातो. कोरोनाच्या आधी शाळांमध्ये शिजवलेला पोषण आहार दिला जात होता. परंतु लॅाकडाऊन आणि कोरोनानंतर शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना तांदूळ, दाळ व कडधान्याच्या स्वरूपात पोषण आहार घरीच वाटप केला जातो.

फक्त तांदूळच नव्हे दाळ व कडधान्यही...

n जिल्ह्यात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना तांदूळच नव्हे तर दाळ व एक कडधान्य त्यांच्या उपस्थितीच्या सरासरीनुसार वाटप केले जात आहे. काही भागात केवळ तांदूळच दिला जात असल्याच्या तक्रारी होत्या. विशेषत: दुर्गम भागातील शाळांमध्ये नियमित वाटप होत नसल्याच्या तक्रारी होत्या, परंतु त्या तक्रारींमध्ये चौकशीअंती तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.

विद्यार्थी संख्येच्या सरासरीने वाटप...

जिल्हा केंद्रातून त्या त्या शाळांना विद्यार्थी संख्येनुसार पोषण आहार पुरविला जातो. शाळांमध्ये मिळालेले धान्य, कडधान्य व डाळ सरासरीनुसार वाटप होते.

यासाठी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना बोलावून किंवा घरपोच वाटप करावा लागतो. तर शहरी भागात पालकांच्या मोबाइलवर मेेसेज टाकून घेण्यासाठी बोलवतात.

आता शाळा सुरू झाल्या तरी कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता शिजवलेला आहार न देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे अद्यापही शाळांमध्ये शिजवलेला आहार दिला जात नाही.

आहार शिजविण्यासाठी लागणारे इंधन, स्वयंपाकी मदतनीस यांचे मानधन यासह मसाले व इतर वस्तूंचा खर्च वाचत आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांची बचत होत आहे. शिवाय मिळणारा शिधा हा कुटुंबालादेखील लाभदायी ठरत असल्याचे चित्र आहे.

शाळांना विद्यार्थी संख्येनुसार मिळणारा पोषण आहार व विद्यार्थ्यांना दर महिन्याला वाटप केला जात आहे. लॅाकडाऊनमध्येही तो वाटप केला गेला होता. त्यामुळे अनेक संकट काळात कुटुंबांना आधार मिळाला होता.

-जि.प. शाळा शिक्षक.