शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस, रोजंदारीने जाणाऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

कोरोनामुळे कराव्या लागणाऱ्या लॉकडाऊनने अगोदरच बहुतांश नागरिकांचे उत्पन्न कमी झाले. त्यात अनेक जण तर बेरोजगार झाले. आता त्यांच्यावर महागाईने ...

कोरोनामुळे कराव्या लागणाऱ्या लॉकडाऊनने अगोदरच बहुतांश नागरिकांचे उत्पन्न कमी झाले. त्यात अनेक जण तर बेरोजगार झाले. आता त्यांच्यावर महागाईने घाला घातला आहे. यात सर्वाधिक कोंडी झाली ती शेतकऱ्यांची. त्यांच्या मालाला अल्पभाव मिळत आहे. पेट्रोलचे भाव प्रतिलिटर शंभरच्याही पुढे गेले आहेत. डिझेलचाही भाव शंभर रुपयांच्या जवळपास झाले आहे.

डिझेल आणि पेट्रोलच्या भाववाढीची जणू काय स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोरोना काळात कमाईपेक्षा खर्च जास्त होत असल्याने नागरिकांना व्याजाने पैसे घेऊन उदरनिर्वाह करावा लागत आहे. शिवाय त्यात मोबाइल बिलाचीही भर पडली आहे. मुलांच्या ऑनलाइन शाळांसाठी मोबाइल आवश्यक झाला आहे. त्यामुळे खर्चही वाढला आहे. परिणामी केंद्र सरकारप्रती रोष व्यक्त केला जात आहे.

मजुरी २०० रुपये अन् पेट्रोल शंभरचे

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसत आहे. रोजगारासाठी आपल्या गावाहून शहरामध्ये जाणाऱ्या कामगारांना वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने मोटारसायकलने रोजगारासाठी शहर गाठावे लागत असते. परंतु पेट्रोलचे भाव अधिक असल्याने दिवसाला मजुरी २०० रुपये अन्‌ पेट्रोल १०० रुपयांचे अशी गत झाल्याने संसाराचा गाडा कसा चालावावा? अशा भावनिक प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटत आहेत.

मोटारसायकलला आधी ब्राह्मणपुरीहून शहादा येऊन-जाऊन ५० रुपयांचे पेट्रोल लागायचे. परंतु सध्या पेट्रोलचे दर अधिक वाढल्याने आता शहादा येथे येऊन-जाऊन १०० रुपयांचे पेट्रोल लागत आहे. त्यामुळे मजुरी कमी अन् पेट्रोलचा खर्च जास्त यामुळे संसाराचा ताळमेळ बसत नाही.

-मनोज गिरासे, कामगार, ब्राह्मणपुरी, ता.शहादा

कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय बंद होता. परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले असून रिक्षा व्यवसाय सुरू झाला आहे. परंतु रिक्षामध्ये मोजके प्रवासी बसविण्याबाबत निर्बंध असल्याने अल्प प्रवासी बसवतो. परंतु डिझेलचे भाव वाढल्याने डिझेल खर्चदेखील निघत नसल्याने गाडीचे हप्ते भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर घरदेखील चालवावे लागत आहे.

-गणेश चतुर मराठे, रिक्षाचालक, ब्राह्मणपुरी, ता.शहादा