शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस, रोजंदारीने जाणाऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

कोरोनामुळे कराव्या लागणाऱ्या लॉकडाऊनने अगोदरच बहुतांश नागरिकांचे उत्पन्न कमी झाले. त्यात अनेक जण तर बेरोजगार झाले. आता त्यांच्यावर महागाईने ...

कोरोनामुळे कराव्या लागणाऱ्या लॉकडाऊनने अगोदरच बहुतांश नागरिकांचे उत्पन्न कमी झाले. त्यात अनेक जण तर बेरोजगार झाले. आता त्यांच्यावर महागाईने घाला घातला आहे. यात सर्वाधिक कोंडी झाली ती शेतकऱ्यांची. त्यांच्या मालाला अल्पभाव मिळत आहे. पेट्रोलचे भाव प्रतिलिटर शंभरच्याही पुढे गेले आहेत. डिझेलचाही भाव शंभर रुपयांच्या जवळपास झाले आहे.

डिझेल आणि पेट्रोलच्या भाववाढीची जणू काय स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोरोना काळात कमाईपेक्षा खर्च जास्त होत असल्याने नागरिकांना व्याजाने पैसे घेऊन उदरनिर्वाह करावा लागत आहे. शिवाय त्यात मोबाइल बिलाचीही भर पडली आहे. मुलांच्या ऑनलाइन शाळांसाठी मोबाइल आवश्यक झाला आहे. त्यामुळे खर्चही वाढला आहे. परिणामी केंद्र सरकारप्रती रोष व्यक्त केला जात आहे.

मजुरी २०० रुपये अन् पेट्रोल शंभरचे

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसत आहे. रोजगारासाठी आपल्या गावाहून शहरामध्ये जाणाऱ्या कामगारांना वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने मोटारसायकलने रोजगारासाठी शहर गाठावे लागत असते. परंतु पेट्रोलचे भाव अधिक असल्याने दिवसाला मजुरी २०० रुपये अन्‌ पेट्रोल १०० रुपयांचे अशी गत झाल्याने संसाराचा गाडा कसा चालावावा? अशा भावनिक प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटत आहेत.

मोटारसायकलला आधी ब्राह्मणपुरीहून शहादा येऊन-जाऊन ५० रुपयांचे पेट्रोल लागायचे. परंतु सध्या पेट्रोलचे दर अधिक वाढल्याने आता शहादा येथे येऊन-जाऊन १०० रुपयांचे पेट्रोल लागत आहे. त्यामुळे मजुरी कमी अन् पेट्रोलचा खर्च जास्त यामुळे संसाराचा ताळमेळ बसत नाही.

-मनोज गिरासे, कामगार, ब्राह्मणपुरी, ता.शहादा

कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय बंद होता. परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले असून रिक्षा व्यवसाय सुरू झाला आहे. परंतु रिक्षामध्ये मोजके प्रवासी बसविण्याबाबत निर्बंध असल्याने अल्प प्रवासी बसवतो. परंतु डिझेलचे भाव वाढल्याने डिझेल खर्चदेखील निघत नसल्याने गाडीचे हप्ते भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर घरदेखील चालवावे लागत आहे.

-गणेश चतुर मराठे, रिक्षाचालक, ब्राह्मणपुरी, ता.शहादा