शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

फेसरिडींगद्वारे शिक्षकांच्या उपस्थितीवर राहणार लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती तपासणीसाठी आता अशा ठिकाणी बायोमेट्रीक व फेसरिडींग हजेरी घेतली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती तपासणीसाठी आता अशा ठिकाणी बायोमेट्रीक व फेसरिडींग हजेरी घेतली जाणार आहे. अशा शाळा या जीपीएसद्वारे मुख्यालयाला जोडल्या जाणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे दुर्गम भागातील शाळा नियमित सुरू राहणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान, दुर्गम भागात कनेक्टीव्हिटीची अडचण लक्षात घेता हा उपक्रम कितपत यशस्वी होईल हा प्रश्नच आहे.नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती व शाळा नियमित भरण्यासंदर्भात नेहमीच ओरड होत असते. त्यामुळे शिक्षकांच्या नियमित उपस्थिती बाबत नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा फारसा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. आता त्यावर आणखी एक उपाय म्हणून बायोमेट्रीक व फेसरिडींग सुरू करण्यात येणार आहे.वाढत्या तक्रारींची दखलदुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत नेहमीच तक्रारी होत आहेत. जिल्हा परिषदांच्या सभांमध्ये देखील याबाबत सदस्यांकडून प्रश्न उपस्थित होत असतो. त्याला उत्तर देतांना अधिकारीही संभ्रमात असतात. ही समस्या कायम स्वरूपी मिटावी, तक्रारी कमी व्हाव्या, शिक्षक नियमित शाळांवर उपस्थित राहावेत यासाठी आता तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे.यासाठी प्रत्येक शाळेवर बायोमेट्रीक किंवा फेसरिडींग उपकरण बसविले जाणार आहे. त्याद्वारे हजेरी नोंदविण्यात येणार आहे. हे उपकरण जीपीएस सिस्टिमद्वारे थेट मुख्यालयाला किंवा तालुका गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला जोडले जाणार आहे. त्याद्वारे शिक्षकांची हजेरी तपासली जाणार आहे. या उपक्रमाला सुरुवात होण्यास पुढील शैक्षणिक वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. त्यासाठी मात्र आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे.कनेक्टिीव्हटीची समस्यादुर्गम भागात साध्या मोबाईलची रेंज राहत नाही अशा ठिकाणी जीपीएस सिस्टिम कशी काम करणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी शिक्षण विभागाकडे काय उपाययोजना आहेत याबाबत मात्र अनभिज्ञता कायम आहे.अशा प्रकारचा प्रयोग यापूर्वी आश्रमशाळांमध्ये करण्यात आला होता. परंतु अवघ्या महिनाभरात आश्रम शाळांमधील बायोमेट्रीक उपकरण बंद पडले होते. ते कसे बंद पडले हा त्यावेळी संशोधनाचा विषय ठरला होता. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये बसविण्यात येणारे बायोमेट्रीक व फेसरिडींग मशीन देखील किती दिवस चालतील याबाबतची उत्सूकता देखील कायम आहेच.दुर्गम भागातील अनेक शाळांना इमारती नाहीत, वीज पुरवठा नाही अशा ठिकाणी फेसरिडींग व बायोमेट्रीक यंत्र कसे काम करेल हा मोठा प्रश्न आहे. शिवाय मोबाईल टॉवर दोन ते तीन दिवस बंद असतात. त्यामुळे जीपीएस सिस्टिम कसे काम करेल ही शंकाच आहे.शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, जीपीएस सिस्टिमसाठी कनेक्टिीव्हीटी गजर राहणार नाही. संबधीत शिक्षक संबधीत वेळेत त्या क्षेत्राच्या बाहेर गेला तर त्याची गैरहजेरी नोंदविली जाणार आहे. परंतु ही यंत्रणा कशी काम करेल हे शिक्षण विभागाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.