शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

फेसरिडींगद्वारे शिक्षकांच्या उपस्थितीवर राहणार लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती तपासणीसाठी आता अशा ठिकाणी बायोमेट्रीक व फेसरिडींग हजेरी घेतली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती तपासणीसाठी आता अशा ठिकाणी बायोमेट्रीक व फेसरिडींग हजेरी घेतली जाणार आहे. अशा शाळा या जीपीएसद्वारे मुख्यालयाला जोडल्या जाणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे दुर्गम भागातील शाळा नियमित सुरू राहणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान, दुर्गम भागात कनेक्टीव्हिटीची अडचण लक्षात घेता हा उपक्रम कितपत यशस्वी होईल हा प्रश्नच आहे.नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती व शाळा नियमित भरण्यासंदर्भात नेहमीच ओरड होत असते. त्यामुळे शिक्षकांच्या नियमित उपस्थिती बाबत नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा फारसा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. आता त्यावर आणखी एक उपाय म्हणून बायोमेट्रीक व फेसरिडींग सुरू करण्यात येणार आहे.वाढत्या तक्रारींची दखलदुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत नेहमीच तक्रारी होत आहेत. जिल्हा परिषदांच्या सभांमध्ये देखील याबाबत सदस्यांकडून प्रश्न उपस्थित होत असतो. त्याला उत्तर देतांना अधिकारीही संभ्रमात असतात. ही समस्या कायम स्वरूपी मिटावी, तक्रारी कमी व्हाव्या, शिक्षक नियमित शाळांवर उपस्थित राहावेत यासाठी आता तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे.यासाठी प्रत्येक शाळेवर बायोमेट्रीक किंवा फेसरिडींग उपकरण बसविले जाणार आहे. त्याद्वारे हजेरी नोंदविण्यात येणार आहे. हे उपकरण जीपीएस सिस्टिमद्वारे थेट मुख्यालयाला किंवा तालुका गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला जोडले जाणार आहे. त्याद्वारे शिक्षकांची हजेरी तपासली जाणार आहे. या उपक्रमाला सुरुवात होण्यास पुढील शैक्षणिक वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. त्यासाठी मात्र आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे.कनेक्टिीव्हटीची समस्यादुर्गम भागात साध्या मोबाईलची रेंज राहत नाही अशा ठिकाणी जीपीएस सिस्टिम कशी काम करणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी शिक्षण विभागाकडे काय उपाययोजना आहेत याबाबत मात्र अनभिज्ञता कायम आहे.अशा प्रकारचा प्रयोग यापूर्वी आश्रमशाळांमध्ये करण्यात आला होता. परंतु अवघ्या महिनाभरात आश्रम शाळांमधील बायोमेट्रीक उपकरण बंद पडले होते. ते कसे बंद पडले हा त्यावेळी संशोधनाचा विषय ठरला होता. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये बसविण्यात येणारे बायोमेट्रीक व फेसरिडींग मशीन देखील किती दिवस चालतील याबाबतची उत्सूकता देखील कायम आहेच.दुर्गम भागातील अनेक शाळांना इमारती नाहीत, वीज पुरवठा नाही अशा ठिकाणी फेसरिडींग व बायोमेट्रीक यंत्र कसे काम करेल हा मोठा प्रश्न आहे. शिवाय मोबाईल टॉवर दोन ते तीन दिवस बंद असतात. त्यामुळे जीपीएस सिस्टिम कसे काम करेल ही शंकाच आहे.शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, जीपीएस सिस्टिमसाठी कनेक्टिीव्हीटी गजर राहणार नाही. संबधीत शिक्षक संबधीत वेळेत त्या क्षेत्राच्या बाहेर गेला तर त्याची गैरहजेरी नोंदविली जाणार आहे. परंतु ही यंत्रणा कशी काम करेल हे शिक्षण विभागाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.