शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

पूरग्रस्तांना मिळणार 1 कोटी रुपयांचा तातडीचा मदतनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतीवृष्टी आणि पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले असून येत्या चार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतीवृष्टी आणि पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले असून येत्या चार दिवसात त्यांच्या खात्यावर 1 कोटी रुपयांचा मदतनिधी वर्ग करण्याची तयारी सुरु केली आह़े अंशत: बाधित, पूर्णपणे जमिनदोस्त घरे, जनवारे व मयत व्यक्तींच्या वारसांना ही मदत देण्यात येणार आह़े      नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांना अतीवृष्टीचा फटका बसला होता़ यातून नदी-नाल्यांना पूर येऊन घरांची पडझड तसेच गुरांची मृत्यू झाला होता़ जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने तसेच अतीवृष्टीमुळे भिंती पडल्याने सात जणांना जीव गमावावा लागला आह़े या सर्व स्थितीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर सुरु केले होत़े रविवारी रात्री उशिरा पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर सोमवारी सकाळी तालुकानिहाय अहवाल तयार करुन तो प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता़ जिल्हा प्रशासनाला अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोषागार विभागाकडे देण्यात येणा:या निधीच्या मागणीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ त्यानुसार मंगळवारी सकाळी निधीची मागणी करुन तातडीने बाधितांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती आह़े 

्रप्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 7 मयतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्यात आले आहेत़ भिमसिंग वळवी (धानोरा), शेख चांद (नवापुर), पवन पवार (असलोद), सुकराम ठाकरे (पाडळदा), लिलाबाई पाडवी (मौलीपाडा), कांताबाई भिल (रायखेड) व गणेश पाडवी (आमखेडीपाडा) यांचा अतीवृष्टीदरम्यान मृत्यू झाला आह़े पुराच्या पाण्यात 6 मोठी जनवारे वाहून गेली होती़ त्यांच्या मालकांना प्रत्येकी 30 हजार, 78 लहान जनावरांच्या मालकांना प्रत्येकी 3 हजार, 4 बैलांच्या मालकांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आह़े सर्व सहा तालुक्यात 2 हजार 372 घरांची अंशत: पडझड झाली होती़ या लाभार्थीना प्रत्येकी 3 हजार 200 रुपयांची मदत दिली जाणार आह़े तर 57 घरे पूर्णपणे कोसळल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाल्याने त्यांना प्रत्येकी 95 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आह़े पंचनाम्यांदरम्यान तलाठी व मंडळाधिका:यांनी बँक खात्यांची माहिती घेतल्याने आठवडाभरात त्यांच्या खात्यावर मदतनिधी जमा होणार आह़े 

शासनाने काही महिन्यांपूर्वी काढलेल्या अध्यादेशानुसार अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी साधारण 11 हजार रुपयांचा मदतनिधी प्रस्तावित आह़े यात 6 हजार रुपये घराची दुरुस्ती, प्रत्येकी अडीच हजार रुपये घरातील भांडी व कपडय़ांसाठी वितरीत करण्याचे निश्चित करण्यात आले आह़े अशात जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येकी 3 हजार 200 रुपयांर्पयत देण्याचे नियोजन करण्यात आल्याने लाभार्थीकडून नाराजी व्यक्त होत आह़े प्रशासनाकडून शेतजमिनींचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ या पंचनाम्यांचे अहवाल शासनाकडे देण्यात येणार आहेत़ त्यानुसार शासन येत्या काळात मदतनिधी जाहिर करणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े शेतक:यांची जमिन खरडली गेल्याने त्यांना किमान हेक्टरी 1 लाख रुपयार्पयत मदत मिळण्याची अपेक्षा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े