शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

पूर रेषेचा सव्र्हे ठरला कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 17 वर्षापूर्वी जिल्ह्यातील पूर रेषेतील गावांचा सव्र्हे करण्यात आला. त्यावेळी नदी काठांवरील 29 गावांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 17 वर्षापूर्वी जिल्ह्यातील पूर रेषेतील गावांचा सव्र्हे करण्यात आला. त्यावेळी नदी काठांवरील 29 गावांचा पूर रेषेत समावेश करण्यात आला.  त्या नंतर कुठलीही सुधारणा झाली नाही किंवा फेर सव्र्हेक्षण देखील करण्यात आले नाही. यामुळे यंदा दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीत अनेक गावे पुन्हा पाण्याखाली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, 17 वर्षात अनेक बदल झाले. लोकसंख्या वाढली. त्यामुळे नव्याने सव्र्हेक्षण करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात यंदा दोन वेळा अतिवृष्टी झाली. सलग दहा दिवस पावसाची संततधार होती. दोन महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत 48 टक्के जादा पाऊस झाला. परिणामी धरणांमधील पाणी साठा सोडण्यात आला. नदी, नाल्यांना पूर आले. त्यात अनेक गावे आणि वसाहती पाण्याखाली गेल्या. यात जवळपास हजार घरांचे तर आठ हजार   हेक्टरपेक्षा अधीक शेतीचे नुकसान झाले. याला कारण पूर रेषेचे नव्याने सव्र्हेक्षण न करणे. 17 वर्षापूर्वीच्या सव्र्हेक्षणाच्या आधारेच केवळ कागदावर उपाययोजना केल्या जातात. दरवर्षाची तीच स्थिती    आहे. यंदाच्या अतीवृष्टीत ही बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे.    हजारो नागरिकांना फटका बसला. 29 गावांचा सव्र्हे..जिल्ह्यात पूर रेषेतील 29 गावे प्रशासनाने निश्चित केली आहेत. नदी काठावरील अशा गावांना दोन प्रकारात विभागले जाते. एक रेड लाईनची गावे व दुसरी स्काय लाईनची गावे. स्काय लाईनच्या गावांमध्ये नदीला थोडाजरी पूर आला तरी नदीचे पाणी थेट गावात किंवा गावातील नदीकाठच्या वस्तीत घुसते. तर रेड लाईनच्या गावांमध्ये नदी किंवा नाल्याला अती पूर आला तर ते पाणी थेट गावात घुसते व गावाचा संपर्क तुटतो.अशी आहेत गावेरेड लाईन अर्थात लाल पट्टय़ातील गावांमध्ये विशेष लक्ष देण्यात येते. या गावांची संख्या 29 असून त्यात शहादा तालुक्यातील 18 तर नंदुरबार तालुक्यातील 11 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये शहादा तालुक्यातील जावदे, तोरखेडा, दोंदवाडे, खैरवे, भडगाव, टेंभे, कामखेडा, सारंगखेडा, खरवड, कौठळ, बामखेडा, बिलाडी, ससदे, शेल्टी, पळासखेडा, नांदरखेडा, प्रकाशा या गावांचा समावेश आहे. तर नंदुरबार तालुक्यातील सावळदे, कोरीट, सुजालपूर, बोराळे, नाशिंदे, हाटमोहिदा, आमळथे, ओसर्ली, खापरखेडा, ओसर्ली आणि कोपर्ली  या गावांचा समावेश आहे. अती पूर आला तरच या गावांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते असे प्रशासनाचे म्हणने आहे. तोर्पयत प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्यास वेळ मिळत असतो असेही सांगण्यात आले.नव्याने सव्र्हे व्हावासध्या नदी, नाल्यांवरील अतिक्रमणामुळे ते शेतीसाठी बुजविण्यात आल्यामुळे त्यांची अवस्था बदलली आहे. काही ठिकाणी नदी व नाल्यांचा प्रवाहात बदल देखील झाला आहे. तापी व इतर नद्यांमधून होणारा वाळूचा बेसुमार उपसांमुळे काठावरील गावांना    आधीच पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे नदी,   नाल्याला थोडाजरी पूर आला तरी मोठा धोका निर्माण होण्याचा संभव असतो. ही बाब यंदाच्या अतिवृष्टीत अधोरेखीत झाली आहे. 

रेड लाईनची निश्चित केलेल्या गावांच्या भौगोलिक परिस्थितीवर नजर टाकल्यास सर्वच गावे ही केवळ तापी नदी काठावरील निवडण्यात आली आहेत. परिणामी शहादा व नंदुरबार तालुक्यातीलच गावांचा त्यात समावेश झाला   आहे. जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या हद्दीतून जाणा:या नद्यांमध्ये तापी व्यतिरिक्त नर्मदा ही मोठी नदी तर गोमाई, रंगावली, शिवण, देहली, उदय, सुसरी, खर्डा आदी लहान नद्या देखील आहेत. या नद्यांच्या काठावर देखील मोठय़ा प्रमाणावर गावे आहेत. या नद्यांना अतिवृष्टी झाल्यास मोठा पूर देखील येतो. त्याचे पाणी गावालगतच्या वस्तीत शिरते. काही गावांचा संपर्क देखील तुटतो. असे असतांना या नदी काठांवरील गावांचा समावेशच पूर रेषेतील गावांमध्ये करण्यात आलेला नाही हे विशेष.