शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

महिलेच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : लोकसंघर्ष मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:31 IST

लोकसंघर्ष मोर्चाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चांदसैली येथील सिदलीबाई पाडवी या आजारी असल्याने त्यांचे पती आदल्या पाडवी ...

लोकसंघर्ष मोर्चाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चांदसैली येथील सिदलीबाई पाडवी या आजारी असल्याने त्यांचे पती आदल्या पाडवी हे त्यांना तळोद्याकडे घेऊन जात होते. दुर्दैवाने चांदसैली घाटात दरड कोसळल्याने आदल्या पाडवी हे त्यांना चालवत तळोद्याकडे आणत होते. परंतु रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. दोनच दिवसांपूर्वी दिवशी केलीपानी (ता. तळोदा) या गावातून एका गर्भवती मातेला झोळी करून आणावे लागले होते. चांदसैली येथील उपकेंद्र येथे डॉक्टर हजर राहत नाहीत व उपकेंद्र बंद असते. याठिकाणी कोणत्याही मोबाईल कंपनीचे टॉवर नसल्याने रेंज नाही. आरोग्य विभागाची १०८ ही गाडी मागवता येत नाही. तसेच मागील तीन वर्षांपासून चांदसैली घाटाच्या कठड्यांची व दरड कोसळेल याबाबतची लेखी तक्रार लोकसंघर्ष मोर्चामार्फत शासनाला करूनही कार्यवाही झालेली नाही. नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून यासाठी विशेष निधी येतो. पंतप्रधान सडक योजनेची अनेक कामे अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत. याबाबत नवसंजीवनीच्या बैठकीत तक्रार मांडूनही काहीही फरक पडत नाही. आदिवासी विकासासाठी स्वतंत्र निधी असूनही दैना संपत नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून लोकसंघर्ष मोर्चा या सर्व प्रकाराची निंदा करत आहे. या घटनेला जबाबदार आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून आदल्या पाडवी यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, कथा वसावे, रमेश नाईक, दिलवर पाडवी, जिलाबाई वसावे यांनी हे निवेदन दिले आहे.