शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

सण आला दारी, वीज नाही घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:35 IST

किमान सणासुदीत तरी नागरिकांना अखंडित वीज मिळणे अपेक्षित आहे. मात्र सुलतानपूर वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या ब्राम्हणपुरी, सुलवाडे, सुलतानपूर, रायखेड, खेडदिगर, ...

किमान सणासुदीत तरी नागरिकांना अखंडित वीज मिळणे अपेक्षित आहे. मात्र सुलतानपूर वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या ब्राम्हणपुरी, सुलवाडे, सुलतानपूर, रायखेड, खेडदिगर, मुबारकपूर, आडगाव, बहिरपूर आदी गावांमध्ये अचानक वीजपुरवठा खंडित होणे हे नित्याचेच बनले आहे. कधी दुरुस्तीच्या नावाखाली, कधी बिघाडामुळे, तर कधी देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली वीज गुल होत आहे. सुलतानपूर वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या भागातील वीजपुरवठा गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे मंगळवारी मध्यरात्री शहादाहून येणाऱ्या ३३ के.व्ही. या वाहिनीत बिघाड झाल्याने खंडित झाला होता. बुधवारी देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे ३२ तास वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. ग्रामीण भागात शुक्रवारी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. यापुढे नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी असे सणांचे दिवस आहेत. पावसाळ्यात गवत वाढले असून सर्प, विंचू व कीटकांच्या भीतीने अंधारात घराबाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. डासांच्या उपद्रवाने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच व्यावसायिकांचेही आर्थिक नुकसान होत आहे. वीज वितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांनी येथील वीज समस्या कायमस्वरूपी संपविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्यावा, अशी माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

वसुली जोरात, मग खबरदारीही घ्या...

थकीत वीज बिल वसुलीची मोहीम सध्या जोरात सुरू आहे. पण वसुलीबरोबरच अखंडित वीज पुरवठ्यासाठीही महावितरणने खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वीजपुरवठ्याची यंत्रणा जुनाट

पावसाळ्यात कुठे तारा तुटणे, झाडांच्या फांद्या वीजवाहिनीवर पडणे अशा अनेक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होतो. हा प्रकार घडू नये म्हणून महावितरण प्रशासनातर्फे मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. पण थोडा जरी पाऊस पडला तरी, वीज गेलीच समजा, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वीज पुरवठ्याची यंत्रणा जुनाट झाली आहे.

परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुख्यालयी कोणी वायरमन राहत नसल्याने रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित झाल्यास सकाळी वीज पुरवठा सुरळीत केला जातो. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीज कधी येईल याची विचारणा केली, तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. जर तक्रार केली, तर त्याच्या घरी छापा टाकून कारवाई केली जाते.

- अनिल सुभाष पाटील, ग्राहक, सुलवाडे, ता. शहादा

संबंधित अभियंत्याला सूचना देतो

वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या माहितीसाठी संबंधित उपकार्यकारी अभियंता वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित सहायक अभियंता यांना वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना देतो.