लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : मजुरांअभावी रासायनिक खतांच्या वाहतुकीसाठी उत्पादन कंपन्यांना प्रचंड अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांपुढेदेखील खत टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यातही सद्या युरिया खताची टंचाई भासत आहे. त्यासाठी शेजारील गुजरातमधून चढ्या दराने आणावे लागत असल्याची व्यथाही शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. प्रशासनाने याप्रकरणी दखल घेऊन निदान युरीया तरी उपलब्ध करून द्यावे, अशी शेतकºयांची मागणी आहे.शेतकºयांचा खरीप हंगाम लक्षात घेऊन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकºयांसाठी साधारण २२ हजार ३० मेट्रीक टन खतांची मागणी विविध उत्पादक कंपन्यांकडे केली होती. तथापि कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे खत निर्मिती करणाºया रासायनिक कंपन्यांच बंद झाल्यामुळे रासायनिक खतांचा पुरवठादेखील रखडला होता. त्याचबरोबर तेथे काम करणारे परराज्यातील मजूरही गावाकडे परतले आहेत. आता शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर कंपन्यांनी देखील रासायनिक खतांचे उत्पादन सुरू केले आहे.कृषी विभागाने मुंबई, हाजिरा, रायगड येथील रासायनिक कंपन्यांकडे खतांची मागणी केली आहे. परंतु मागणी केलेल्या रासायनिक खतांपैकी केवळ ११ हजार मेट्रीक टनच खते उपलब्ध झाली आहेत. कृषी विभागाने त्याचे दोन दिवसापासून जिल्ह्यातील कृषी दुकानांमध्ये शेतकºयांना खत टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातही युरीया खतांची संपूर्ण तालुक्यातच टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकरी प्रचंड हैराण झाला आहे. नाईलाजास्तव शेजारच्या गुजरातमधून चढ्या दराने आणावे लागत असल्याचे शेतकरी सांगतात. तेही पुरेसे मिळत नसल्याचेही म्हणतात. वास्तविक सद्या शेतकºयांनी कापूस लागवड केली आहे. बहुसंख्य शेतकºयांनी मे महिन्याच्या दुसºया-तिसºया आठवड्यात लागवड केली आहे. त्यामुळे आता कापसाला खते देण्याचे नियोजन शेतकºयांनी केले आहे. त्याचबरोबर उसालादेखील खत देण्याचे नियोजन आहे. मात्र युरियाच मिळत नसल्याने खतांचा डोस रखडला आहे. त्यामुळे या पिकांची वाढ सुद्धा खुंटली आहे. पिकांच्या वाढीसाठी शेतकरी मुख्यता युरीयाचा वापर करत असतो. मात्र नेमका त्याचाच तुटवडा भासत असल्यामुळे शेतकरी अक्षरश: हैराण झाले आहे. युरीयाच्या तुटवड्याबाबत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाºयांकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, संबंधीत रासायनिक कंपन्यांकडे खतांच्या मागणीबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहे. परंतु कंपन्यांमधील मजुरांचे स्थलांतर झाल्यामुळे वाहतुकीबाबत त्यांच्यापुढे प्रचंड समस्या निर्माण झाल्या आहेत. खतांची चढ-उतार करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे मजूर वर्ग नसलल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात खतांचा तुडवडा भासत असल्याने त्यांंनीही मान्य केले आहे. पुढच्या आठ दिवसात मागणी केलेले सर्व रासायनिक खते उपलब्ध होतील, असे असले तरी निदान शेतकºयांना पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले युरीया खत उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने मार्ग काढावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.नंदुरबार जिल्ह्यासाठी खतांचा रॅक दोंडाईचा येथे लागत असतो. तेथेच धुळे जिल्ह्याचाही लागत असतो. तथापि खतांच्या वितरणाबाबत मोठा दुजाभाव केला जात असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे. कारण धुळे जिल्ह्याला ६० टक्के पुरवठा केला जातो तर नंदुरबार जिल्ह्याचा वाट्याला केवळ ४० टक्केच हिस्सा मिळत असल्याचे व्यावसायीकही सांगतात. त्यामुळे वितरणाच्या या दुजाभावामुळे पुरेसे खते उपलब्ध होत नाही. त्यातच दोंडाईच्याला रेल्वेचा रॅक लागत असल्यामुळे तेथून पुन्हा स्थानिक ठिकाणी आणण्यासाठी नाहक भाडे मोजावे लागत असते. नंदुरबारात खतांचा हा स्वतंत्र रॅक झाला तर शेतकºयांना पुरेसे खत मिळेल. त्याचबरोबर वाहतुकीची कटकटदेखील मिटेल व भाड्यापोटी शेतकºयांना द्यावा लागणारा आर्थिक भुर्दंड सुद्धा वाचेल. नंदुरबारातील स्वतंत्र रॅकला केंद्र शासनाने प्रासकीय मान्यता दिल्याचे खासदारांनी सांगितले असले तरी संबंधीत प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. सद्या खतांचा रॅक दोंडाईचा येथे लागला असला तरी गोडाऊन परिसरात कोरोनाचे पॉझिटीव्ह रूग्ण निघाल्यामुळे तो परिसर शासनाने लॉक केला आहे. शिवाय तेथे काम करणाºया बाहेरील मजुरांनादेखील बंदी केली आहे. त्यामुळे खते केव्हा उपलब्ध होतील याबाबत शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत प्रशासनाने तोडगा काढण्याची अपेक्षा शेतकºयांनी केली आहे.
मजुरांअभावी निर्माण झाली खतटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:28 IST