शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

भीती कमी होईना अन् सगेसोयरे भेटीला येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST

वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. त्यामुळे सर्वांनीच मोठा धसका घेतला होता. आता परिस्थितीत सुधारणा ...

वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. त्यामुळे सर्वांनीच मोठा धसका घेतला होता. आता परिस्थितीत सुधारणा झाली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने अनेकांच्या मनात मोठी धास्ती आहे. त्यामुळे दूरचे सोडाच अगदी जवळचे नातेवाईकही दुर्मीळ झाल्याची खंत व्यक्त होत आहे. श्रावण महिना म्हटला की, अनेकांकडे पूजाअर्चा सुरू असतात. या काळात सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. या पूजेसाठी व प्रसादासाठी आसपास राहणाऱ्यांसह जवळच्या नातेवाइकांनीही आमंत्रित केले जाते. मात्र, संसर्गाच्या भीतीने अनेक जण प्रसाद घेण्यासाठी जाणे टाळत असल्याचे काही कुटुंबीयांनी सांगितले. ग्रामीण भागासह शहरातही कोरोनाची धास्ती अद्यापही कमी झालेली नाही, हे वास्तव आहे.

उपवासकरूही बनले दुर्मीळ

हिंदू धर्मात एखाद्याचे निधन झाल्यावर तिथीनुसार दर महिन्याला उपवास करून जेवायला बोलविले जाते. हा विधी साधारण अकरा महिने चालतो. त्यानंतर साडेअकरा महिन्याला वर्षश्राद्ध विधी केला जातो. या विधीला नातेवाईक आदरांजली वाहण्यासाठी संबंधितांच्या घरी जातात. जेणेकरून त्यांचे दुःख कमी व्हावे; परंतु आता वर्षश्राद्धालाही मोजकीच मंडळी उपस्थित असते. इतकेच नव्हे तर निधन झालेल्या व्यक्तीच्या महिन्यालाही उपवासकरू मिळणे दुर्मीळ झाल्याचे अनेकांनी सांगितले.

केवळ मोबाइलवरच संभाषण

शहरात राहणाऱ्या बहुसंख्य नागरिकांचे मूळ खेड्यापाड्यात आहे. कोरोना उद्रेकापूर्वी संबंधितांचे एकमेकांकडे मोठ्या प्रमाणावर येणे-जाणे होते. मात्र, दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांसह तरुणांचा मृत्यू झाला. यात काही घरांतील कर्तेपुरुष, तर काही घरांतील एकुलत्या एक अपत्यांना जीव गमवावा लागला. ही धास्ती अजूनही कायम आहे. आता स्थिती पूर्वपदावर येऊनही कोणाकडे जाऊन आफत ओढवून घेण्यापेक्षा मोबाइलवर संभाषण करून ख्यालीखुशाली जाणून घेण्याकडे कल वाढला आहे.