शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शेतकरी फिरतात मोबाईल धारकाच्यामागे, ई-पीक नोंदणीच्या कटकटीने उडवली शेतकऱ्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST

तोरखेडा : शासनाच्या महसूल विभागाच्या अधिनस्त असलेल्या पीक पाहणी मोहिमेचा सर्वत्र गाजावाजा झाला असला, तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉईड स्मार्ट ...

तोरखेडा : शासनाच्या महसूल विभागाच्या अधिनस्त असलेल्या पीक पाहणी मोहिमेचा सर्वत्र गाजावाजा झाला असला, तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉईड स्मार्ट मोबाईल नाही. त्यामुळे ई-पीक नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीच्या हंगामाची कामे सोडून त्यांना ई-पीक नोंदणी करून देण्याची विनंती करत गावातील स्मार्ट मोबाईलधारकांच्या मागे-मागे फिरावे लागत आहे.

यापूर्वी तलाठ्यांकडून पिकांची नोंद केली जात होती. पण आता हे काम शेतकऱ्याला मोबाईल ॲपच्या माध्यमातून करावे लागत आहे. ग्रामीण भागात ९० टक्के शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाही. बहुतांश शेतकरी अशिक्षित असल्याने त्यांना मोबाईलचे ज्ञानही नाही. ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करायचे कोठून? हा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे आहे. केवळ १० टक्के लोकांच्या घरात मोबाईल असला, तरी पाच टक्के लोक त्याच्या वापराबद्दल बऱ्याच प्रमाणात अनभिज्ञ आहेत. ई-पीक पाहणीद्वारे शेतातील पिकाची शेतकऱ्यांना स्वत: शेतात जाऊन नोंदणी करायची आहे. तसे न केल्यास सातबारामधील पीक पेरा कोरा राहील, असे सांगण्यात आले. यामुळे कोणतीही शासकीय मदत, पीक विमा, पीक कर्ज, धान्य खरेदी केंद्रावर धान्य विकता येणार नाही तसेच अनुदानही प्राप्त होणार नाही. वन्य प्राण्यांनी पिकाचे नुकसान केले, तरी ई-पीक नोंदणी नसेल तर ती जागा पडीक आहे, असे समजले जाईल आणि शेतकरी भरपाईपासून वंचित राहतील. हे सर्व टाळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी करणे गरजेचे असून, त्यासाठी स्मार्टफोनची आवश्यकता आहे. त्यामुळे ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करायचे कोठून आणि कसे? हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यांना कामे सोडून गावातील अँड्रॉईड मोबाईलधारकांच्या मागे यासाठी फिरावे लागत आहे.

स्मार्टफोन घेतला तरी इंटरनेटच नाही

ऐन हंगामातच शासनाने १५ ऑगस्ट रोजी या ॲपचा शुभारंभ केला. यानिमित्ताने शेतकऱ्याच्या मुलाला वडिलांकडे अँड्रॉईड मोबाईल मागण्याची संधी मिळाली आहे. स्मार्टफोन असल्याशिवाय आता काही करता येणार नाही, असे अनेक शेतकरी पुत्र आपल्या वडिलांना समजावून सांगत आहेत. मात्र, फोन घेतला तरी ग्रामीण भागात इंटरनेट कव्हरेजचा अभाव आहे. ऑनलाईन पीक नोंदणीत हजारो शेतकरी गुंतले असल्याने त्यांचे शेतातील निंदणी, खुरपणीच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. धान्य पिकावर गाद खोडकिडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पण तिकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर १५ सप्टेंबरपासून धान्य विक्रीसाठी नावनोंदणी करायची असल्याने त्यासाठी शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्याचे सातबारे हवे आहेत. त्यासाठी तलाठ्याकडे बसून राहावे लागत आहे.