शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी फिरतात मोबाईल धारकाच्यामागे, ई-पीक नोंदणीच्या कटकटीने उडवली शेतकऱ्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST

तोरखेडा : शासनाच्या महसूल विभागाच्या अधिनस्त असलेल्या पीक पाहणी मोहिमेचा सर्वत्र गाजावाजा झाला असला, तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉईड स्मार्ट ...

तोरखेडा : शासनाच्या महसूल विभागाच्या अधिनस्त असलेल्या पीक पाहणी मोहिमेचा सर्वत्र गाजावाजा झाला असला, तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉईड स्मार्ट मोबाईल नाही. त्यामुळे ई-पीक नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीच्या हंगामाची कामे सोडून त्यांना ई-पीक नोंदणी करून देण्याची विनंती करत गावातील स्मार्ट मोबाईलधारकांच्या मागे-मागे फिरावे लागत आहे.

यापूर्वी तलाठ्यांकडून पिकांची नोंद केली जात होती. पण आता हे काम शेतकऱ्याला मोबाईल ॲपच्या माध्यमातून करावे लागत आहे. ग्रामीण भागात ९० टक्के शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाही. बहुतांश शेतकरी अशिक्षित असल्याने त्यांना मोबाईलचे ज्ञानही नाही. ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करायचे कोठून? हा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे आहे. केवळ १० टक्के लोकांच्या घरात मोबाईल असला, तरी पाच टक्के लोक त्याच्या वापराबद्दल बऱ्याच प्रमाणात अनभिज्ञ आहेत. ई-पीक पाहणीद्वारे शेतातील पिकाची शेतकऱ्यांना स्वत: शेतात जाऊन नोंदणी करायची आहे. तसे न केल्यास सातबारामधील पीक पेरा कोरा राहील, असे सांगण्यात आले. यामुळे कोणतीही शासकीय मदत, पीक विमा, पीक कर्ज, धान्य खरेदी केंद्रावर धान्य विकता येणार नाही तसेच अनुदानही प्राप्त होणार नाही. वन्य प्राण्यांनी पिकाचे नुकसान केले, तरी ई-पीक नोंदणी नसेल तर ती जागा पडीक आहे, असे समजले जाईल आणि शेतकरी भरपाईपासून वंचित राहतील. हे सर्व टाळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी करणे गरजेचे असून, त्यासाठी स्मार्टफोनची आवश्यकता आहे. त्यामुळे ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करायचे कोठून आणि कसे? हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यांना कामे सोडून गावातील अँड्रॉईड मोबाईलधारकांच्या मागे यासाठी फिरावे लागत आहे.

स्मार्टफोन घेतला तरी इंटरनेटच नाही

ऐन हंगामातच शासनाने १५ ऑगस्ट रोजी या ॲपचा शुभारंभ केला. यानिमित्ताने शेतकऱ्याच्या मुलाला वडिलांकडे अँड्रॉईड मोबाईल मागण्याची संधी मिळाली आहे. स्मार्टफोन असल्याशिवाय आता काही करता येणार नाही, असे अनेक शेतकरी पुत्र आपल्या वडिलांना समजावून सांगत आहेत. मात्र, फोन घेतला तरी ग्रामीण भागात इंटरनेट कव्हरेजचा अभाव आहे. ऑनलाईन पीक नोंदणीत हजारो शेतकरी गुंतले असल्याने त्यांचे शेतातील निंदणी, खुरपणीच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. धान्य पिकावर गाद खोडकिडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पण तिकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर १५ सप्टेंबरपासून धान्य विक्रीसाठी नावनोंदणी करायची असल्याने त्यासाठी शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्याचे सातबारे हवे आहेत. त्यासाठी तलाठ्याकडे बसून राहावे लागत आहे.