शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंप व केबलच्या चोरीने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:30 IST

तालुक्यात शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात आठ ते दहा शेतकऱ्यांच्या वीज मोटरी, तसेच ...

तालुक्यात शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात आठ ते दहा शेतकऱ्यांच्या वीज मोटरी, तसेच १० ते १२ शेतकऱ्यांच्या वायरिंग (केबल) चोरी झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. अगोदरच शेतीमालाला भाव नाही, उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले आहे. अतिवृष्टीमुळे तर शेतकरी पुरता कोलमडला आहे. सुरळीत वीजपुरवठा नसल्याने पिकांना पाणी देणे जिकिरीचे जाते. अशा परिस्थितीत विद्युत मोटर व केबल यांच्या चोरीच्या घटनेने शेतकरी हतबल झालेला आहे. पोलीस प्रशासनाकडे तक्रार देऊनदेखील चोरीच्या घटनांचा तपास लागत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशात गेल्या १८ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत होऊन व्यापार-व्यवसाय स्तब्ध झाले. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. शेतीसाठी लागणारे अवजारे, कृषीपंप, बी-बियाणे, खते यांच्या किमती मात्र गगनाला पोहोचल्या आहेत. शेतीतील उत्पन्न बाहेर निघाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत होता. शेतकरी आपली कोरडवाहू शेती कूपनलिकेच्या साहाय्याने बागायती करू लागला. नांदरखेडा परिसरात शेतकऱ्यांनी २०-२५ हजार रुपये खर्च करून विद्युत मोटारी बसविल्या. मात्र, चोरट्यांनी त्याच्यावर डल्ला मारून त्या चोरून नेल्या. नांदरखेडा परिसरातील सुभाष पाटील, जीवन रामजी पाटील, हेमंत पाटील यांच्यासह सहा ते सात शेतकऱ्यांच्या वीज मोटारी, तसेच समीर पाटील, कैलास सुदाम पाटील यांच्यासह आठ ते दहा शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारीच्या वायरिंग असा सुमारे लाखो रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार करून चोरट्यांना अटक करण्याची व शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत चोरटे सापडले नाही. मात्र चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, शेतकऱ्यांनी आता जीवन कसे जगावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा व हे चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.