शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

कृषी पंप व केबलच्या चोरीने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:30 IST

तालुक्यात शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात आठ ते दहा शेतकऱ्यांच्या वीज मोटरी, तसेच ...

तालुक्यात शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात आठ ते दहा शेतकऱ्यांच्या वीज मोटरी, तसेच १० ते १२ शेतकऱ्यांच्या वायरिंग (केबल) चोरी झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. अगोदरच शेतीमालाला भाव नाही, उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले आहे. अतिवृष्टीमुळे तर शेतकरी पुरता कोलमडला आहे. सुरळीत वीजपुरवठा नसल्याने पिकांना पाणी देणे जिकिरीचे जाते. अशा परिस्थितीत विद्युत मोटर व केबल यांच्या चोरीच्या घटनेने शेतकरी हतबल झालेला आहे. पोलीस प्रशासनाकडे तक्रार देऊनदेखील चोरीच्या घटनांचा तपास लागत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशात गेल्या १८ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत होऊन व्यापार-व्यवसाय स्तब्ध झाले. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. शेतीसाठी लागणारे अवजारे, कृषीपंप, बी-बियाणे, खते यांच्या किमती मात्र गगनाला पोहोचल्या आहेत. शेतीतील उत्पन्न बाहेर निघाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत होता. शेतकरी आपली कोरडवाहू शेती कूपनलिकेच्या साहाय्याने बागायती करू लागला. नांदरखेडा परिसरात शेतकऱ्यांनी २०-२५ हजार रुपये खर्च करून विद्युत मोटारी बसविल्या. मात्र, चोरट्यांनी त्याच्यावर डल्ला मारून त्या चोरून नेल्या. नांदरखेडा परिसरातील सुभाष पाटील, जीवन रामजी पाटील, हेमंत पाटील यांच्यासह सहा ते सात शेतकऱ्यांच्या वीज मोटारी, तसेच समीर पाटील, कैलास सुदाम पाटील यांच्यासह आठ ते दहा शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारीच्या वायरिंग असा सुमारे लाखो रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार करून चोरट्यांना अटक करण्याची व शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत चोरटे सापडले नाही. मात्र चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, शेतकऱ्यांनी आता जीवन कसे जगावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा व हे चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.