शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

रब्बीबाबत शेतक:यांच्या आशा उंचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क असलोद :  दुधखेडा ता.शहादा येथील धरणात यंदा पूर्ण क्षमतेने जलसाठा झाला असून ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कअसलोद :  दुधखेडा ता.शहादा येथील धरणात यंदा पूर्ण क्षमतेने जलसाठा झाला असून ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. त्याचबरोबर  परिसरातील लहान-मोठे तलावही पूर्ण भरले आहेत. त्यामुळे शेतक:यांच्या रब्बी हंगामाबाबत आशा उंचावल्या आहेत.यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने दुधखेडासह परिसरातील सर्वच तलाव व धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. त्यामुळे परिसरातील शेत शिवारासह मंदाणे, असलोद, न्यू असलोद येथील कोरडवाहू शेतक:यांच्या जमिनीस संजीवनी मिळाली आहे. दुधखेडा धरणाच्या पाण्यातून खरीप व रब्बी हंगाम मिळून एक हजार एकरपेक्षा जास्त जमीन बागायत केली जाते. या पाण्याचा वापर शेतीसाठी करता येणार असल्याने रब्बी हंगाम यंदा चांगला येईल, अशी आशा शेतक:यांकडून व्यक्त केली जात   आहे.दुधखेडा धरणातील पाण्याचा पुरेपूर उपयोग शेती सिंचनासाठी होण्यासाठी साठलेल्या पाण्याच्या वापरासंदर्भात नियोजन करण्यात यावे, अशी अपेक्षाही शेतक:यांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने गांभीर्याने दखल घेऊन शेतक:यांना लाभ मिळवून देण्याची गरज आहे. यंदाच्या खरीप हंगामात उशिरा का होईना परंतु पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी-नाल्यांसह विहिरी व कुपनलिकांच्या जलसाठय़ातही वाढ झाली आहे. तसेच लोंढरे लघुप्रकल्पासह शहाणा, लंगडी, लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. या पाण्यामुळे परिसरातील शेतशिवार बागायत होणार आहे. त्यामुळे या धरणातील जलसाठय़ाचे पाणी वापरासंदर्भात योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

शहादा तालुक्यातील दुधखेडा येथील धरणात यंदा पाण्याचा साठा पूर्ण क्षमतेने झाला असून शेतक:यांच्या रब्बी हंगामाबाबत अपेक्षा उंचावल्या आहेत. धरणातील पाणीसाठय़ामुळे या परिसरातील विहिरी व कुपनलिकांची पाण्याची पातळीही वाढली आहे. या धरणातून शेती सिंचनासाठी पाणी देण्यासाठी पाटचा:या तयार केल्या आहेत. मात्र सद्यस्थितीत या पाटचा:यांची दूरवस्था झाली आहे. खरीप हंगाम संपल्यानंतर धरणातील पाण्यामुळे शेतकरी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करतील. त्यामुळे या धरणातील लाभक्षेत्रातील रब्बीतील पिकांना वेळेवर पाणी मिळण्यासाठी या धरणाच्या पाटचा:यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.