शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
3
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
4
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
5
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
6
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
7
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
8
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
9
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
10
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
11
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
12
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
13
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
14
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
15
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
16
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
17
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
18
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
19
"सर, ब्रेकअप झालंय" Gen Z कर्मचाऱ्यानं बॉसला पाठवला ईमेल; लगेच १० दिवसांची सुट्टी मंजूर, कारण..
20
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?

अर्ज भरताना शेतक:यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 11:49 IST

43 हजार अर्ज दाखल : ग्रामीण भागात एजंटांचा सुळसुळाट, कारवाईची मागणी कजर्माफी

ठळक मुद्दे15 सप्टेंबर शेवटची मुदत.. कजर्माफीचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत ही 15 सप्टेंबर आहे. त्यामुळे अवघे सहा दिवस त्यासाठी उरले आहेत. शासकीय सुटीच्या दिवशी देखील महाईसेवा केंद्र, आपले सरकार व सीएससी केंद्र सुरू राहणार आहेत. कजर्माफी अर्ज दाखल केलेल्

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतकरी कजर्माफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतक:यांची प्रचंड दमछाक होत आहे. सव्र्हर डाऊनच्या समस्येचा फायदा उचलत काही केंद्र चालकांनी कमाई सुरू केली आहे. जिल्ह्यात 100 पेक्षा अधीक केंद्रांमध्ये हे फॉर्म भरले जात आहेत. दरम्यान, आतार्पयत जिल्ह्यातील 50 हजार शेतक:यांनी नोंदणी केली असून 43 हजार ऑनलाईन अर्ज सादर करण्यात आले आहेत.शेतकरी कजर्माफीसाठी जिल्ह्यातील महाईसेवा केंद्राच्या 42 पैकी 39 केंद्रांवर तर आपले सरकार अंतर्गत ग्रामपंचायतींच्या 60 पेक्षा अधीक केंद्रावर आणि कॉमन सव्र्हीस सेंटर अर्थात सीएससी केंद्रावर ही सोय करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज निशुल्क भरण्याचे प्राविधान आहे. परंतु सव्र्हर डाऊनच्या नावाखाली शेतक:यांची फिरवाफिरव सुरू आहे. अनेक वेळा बायोमेट्रीक अंगठा घेण्यास अडचण येत आहे. परिणामी शेतकरी हैराण होत आहेत. ही संधी साधून काही केंद्र चालकांनी कमाई सुरू केली असून शेतक:यांकडून 100 ते दीडशे रुपये घेतले जात आहेत. अनेकांची दुकानदारीग्रामिण भागात अनेकांनी दुकानदारी सुरू केली आहे. फॉर्म घरबसल्या भरून देण्याच्या नावाखाली किमान दीडशे रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. घरीच अर्ज भरून घेतले जातात. ते अर्ज ऑनलाईन अपलोड करून केवळ शेतक:यांचे अगंठे घेण्यासाठी त्यांना केंद्रात बोलविण्यात येते. जे शेतकरी पैसे देत नाहीत त्यांना दोन ते तीन दिवस फिरवाफिरव केली जाते. यामुळे शेतकरी हैराण होत आहेत. याबाबत अनेक शेतक:यांनी संबधीत अधिका:यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.अंगठा घेण्यातही अडचणीआधार कार्ड नोंदणीच्या वेळी बायोमेट्रीकद्वारे घेतलेला अंगठा आता दोन ते तीन वर्षानंतर मॅच होत नसल्यामुळे अनेक शेतक:यांना ती अडचण देखील सहन करावी लागत आहे. शेती कामात नेहमीच राबणा:या शेतक:यांना या अडचणींना मोठय़ा प्रमाणावर सामोरे जावे लागत आहे. त्याचाही उपयोग काही केंद्रचालक करून घेत आहेत. 43 हजार अजर्जिल्ह्यात एकुण पात्र लाभार्थी शेतक:यांपैकी 50 हजार शेतक:यांनी अर्जाची नोंदणी केली आहे. त्यापैकी जवळपास 43 हजार शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. महाऑनलाईन केंद्र, आपले सरकार अर्थात संग्राम केंद्र व कॉमन सव्र्हीस सेंटर अर्थात सीएससी या केंद्रांवर निशुल्क अर्ज भरले जात असून 15 सप्टेंबरच्या आत शेतक:यांनी अर्ज भरून देणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील दुर्गम भागात अडचणी येत आहे. दुर्गम भागात इंटरनेट सेवेची सर्वाधिक अडचण आहे. याशिवाय वीज नसणे, पावसामुळे शेतक:यांना संबधीत ठिकाणी जाण्यास अडचणी येत आहेत. सध्या शेती कामांचे दिवस असतांना ते सोडून अर्ज दाखल करण्यासाठी पती-प}ी यांना सोबत जावे लागत आहे. परिणामी शेती कामांवरही परिणाम दिसून येत     आहे. रांगा कायमअर्ज दाखल करण्याच्या केंद्राबाहेर शेतक:यांच्या रांगा कायम आहेत. त्यामुळे सकाळी सात वाजेपासूनच अशा केंद्रांबाहेर मोठय़ा प्रमाणावर रांगा लागत असल्याचे  चित्र आहे. केंद्राबाहेर ऊन किंवा पावसापासून संरक्षणासाठी कुठलीही सोय नसल्यामुळे या अडचणींना     तोंड देत शेतक:यांना केंद्राबाहेर   बसावे लागत असल्याची स्थिती  आहे. यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.