शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन पीक नोंदणीमुळे शेतकरी हैराण;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:36 IST

नंदुरबार : ई-पीक पाहणीचा शेतकऱ्यांमागील जाच संपता संपत नसल्याची स्थिती आहे. ई-पीकपेरा नोंदणी करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी अंतिम मुदत ...

नंदुरबार : ई-पीक पाहणीचा शेतकऱ्यांमागील जाच संपता संपत नसल्याची स्थिती आहे. ई-पीकपेरा नोंदणी करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी अंतिम मुदत आहे. परंतु त्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी होणार नसल्याची स्थिती आहे. अनेकांना ओटीपी लक्षात राहत नाही, काहींच्या शेतात इंटरनेटची रेंजच नाही, तर काहींना संबंधित ॲपच उमजत नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकरी वर्ग हैराण असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. महिनाभरापूर्वी कृषी विभागाने अध्यादेश काढून, यंदापासून शेतकऱ्यांनी स्वत:च पीक पेरा नोंदणी करण्याचे फर्मान काढले. त्यासाठी ऑनलाईन ॲपही विकसित करण्यात आले. एकाच वेळी पीक नोंदणी व त्यासाठीचे प्रशिक्षण अर्थात जनजागृती करण्यात आली. एकीकडे शेतकऱ्यांची खरीप हंगामातील शेतीकामांची लगबग, तर दुसरीकडे या ॲपची डोकेदुखी अशी स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांचा ई-पीकपेरा नोंद झालीच नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

काय आहेत अडचणी...

नंदुरबार जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती पाहिली, तर ४० टक्के भाग हा दऱ्याखोऱ्यांमधील शेतीचा आहे. अशा भागात अगदी अर्धा एकर ते दोन एकर शेती नावावर असलेेले शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल असेलच असे नाही. शासनाच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडील स्मार्ट मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे ही पीक नोंदणी करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही, त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

इंटरनेट रेंजची अडचण

जिल्ह्यातील अनेक भागात इंटरनेट रेंजची अडचण आहे. त्यामुळे ओटीपी येणे, इतर सर्व माहिती भरणे ही प्रक्रिया करण्यासाठी अनेक ठिकाणी किमान दोन तास, तर जास्तीत जास्त आठ तासांचा कालावधी लागतो आहे. काही ठिकाणी शेतकरी कंटाळून अर्ध्यातूनच ते सोडून देत आहेत. पिकासोबतचा शेतकऱ्याचा फोटो देखील त्यात आवश्यक असल्याने फोटो इमेज रिझोलेशन जास्त असल्यास तो डाऊनलोड होण्यास अडथळे येत आहेत. अनेक शेतकऱ्यांना तर आलेला ओटीपीच लक्षात राहिला नसल्याची स्थिती आहे. काही शेतकऱ्यांच्या नावावर नोंद असलेली जमीन व प्रत्यक्षातील जमीन यात काही गुंठ्याचा फरक असल्याने ती तांत्रिक अडचण दर्शवून ॲप ते देखील स्वीकारत नसल्याचे सांगण्यात आले. दिलेला हेल्पलाईन नंबर देखील वेळेवर लागेलच व तिकडून सांगितलेल्या सूचना समजतीलच असे नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.