शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

ऑनलाईन पीक नोंदणीमुळे शेतकरी हैराण;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:36 IST

नंदुरबार : ई-पीक पाहणीचा शेतकऱ्यांमागील जाच संपता संपत नसल्याची स्थिती आहे. ई-पीकपेरा नोंदणी करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी अंतिम मुदत ...

नंदुरबार : ई-पीक पाहणीचा शेतकऱ्यांमागील जाच संपता संपत नसल्याची स्थिती आहे. ई-पीकपेरा नोंदणी करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी अंतिम मुदत आहे. परंतु त्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी होणार नसल्याची स्थिती आहे. अनेकांना ओटीपी लक्षात राहत नाही, काहींच्या शेतात इंटरनेटची रेंजच नाही, तर काहींना संबंधित ॲपच उमजत नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकरी वर्ग हैराण असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. महिनाभरापूर्वी कृषी विभागाने अध्यादेश काढून, यंदापासून शेतकऱ्यांनी स्वत:च पीक पेरा नोंदणी करण्याचे फर्मान काढले. त्यासाठी ऑनलाईन ॲपही विकसित करण्यात आले. एकाच वेळी पीक नोंदणी व त्यासाठीचे प्रशिक्षण अर्थात जनजागृती करण्यात आली. एकीकडे शेतकऱ्यांची खरीप हंगामातील शेतीकामांची लगबग, तर दुसरीकडे या ॲपची डोकेदुखी अशी स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांचा ई-पीकपेरा नोंद झालीच नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

काय आहेत अडचणी...

नंदुरबार जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती पाहिली, तर ४० टक्के भाग हा दऱ्याखोऱ्यांमधील शेतीचा आहे. अशा भागात अगदी अर्धा एकर ते दोन एकर शेती नावावर असलेेले शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल असेलच असे नाही. शासनाच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडील स्मार्ट मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे ही पीक नोंदणी करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही, त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

इंटरनेट रेंजची अडचण

जिल्ह्यातील अनेक भागात इंटरनेट रेंजची अडचण आहे. त्यामुळे ओटीपी येणे, इतर सर्व माहिती भरणे ही प्रक्रिया करण्यासाठी अनेक ठिकाणी किमान दोन तास, तर जास्तीत जास्त आठ तासांचा कालावधी लागतो आहे. काही ठिकाणी शेतकरी कंटाळून अर्ध्यातूनच ते सोडून देत आहेत. पिकासोबतचा शेतकऱ्याचा फोटो देखील त्यात आवश्यक असल्याने फोटो इमेज रिझोलेशन जास्त असल्यास तो डाऊनलोड होण्यास अडथळे येत आहेत. अनेक शेतकऱ्यांना तर आलेला ओटीपीच लक्षात राहिला नसल्याची स्थिती आहे. काही शेतकऱ्यांच्या नावावर नोंद असलेली जमीन व प्रत्यक्षातील जमीन यात काही गुंठ्याचा फरक असल्याने ती तांत्रिक अडचण दर्शवून ॲप ते देखील स्वीकारत नसल्याचे सांगण्यात आले. दिलेला हेल्पलाईन नंबर देखील वेळेवर लागेलच व तिकडून सांगितलेल्या सूचना समजतीलच असे नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.