शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन पीक नोंदणीमुळे शेतकरी हैराण;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:36 IST

नंदुरबार : ई-पीक पाहणीचा शेतकऱ्यांमागील जाच संपता संपत नसल्याची स्थिती आहे. ई-पीकपेरा नोंदणी करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी अंतिम मुदत ...

नंदुरबार : ई-पीक पाहणीचा शेतकऱ्यांमागील जाच संपता संपत नसल्याची स्थिती आहे. ई-पीकपेरा नोंदणी करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी अंतिम मुदत आहे. परंतु त्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी होणार नसल्याची स्थिती आहे. अनेकांना ओटीपी लक्षात राहत नाही, काहींच्या शेतात इंटरनेटची रेंजच नाही, तर काहींना संबंधित ॲपच उमजत नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकरी वर्ग हैराण असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. महिनाभरापूर्वी कृषी विभागाने अध्यादेश काढून, यंदापासून शेतकऱ्यांनी स्वत:च पीक पेरा नोंदणी करण्याचे फर्मान काढले. त्यासाठी ऑनलाईन ॲपही विकसित करण्यात आले. एकाच वेळी पीक नोंदणी व त्यासाठीचे प्रशिक्षण अर्थात जनजागृती करण्यात आली. एकीकडे शेतकऱ्यांची खरीप हंगामातील शेतीकामांची लगबग, तर दुसरीकडे या ॲपची डोकेदुखी अशी स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांचा ई-पीकपेरा नोंद झालीच नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

काय आहेत अडचणी...

नंदुरबार जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती पाहिली, तर ४० टक्के भाग हा दऱ्याखोऱ्यांमधील शेतीचा आहे. अशा भागात अगदी अर्धा एकर ते दोन एकर शेती नावावर असलेेले शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल असेलच असे नाही. शासनाच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडील स्मार्ट मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे ही पीक नोंदणी करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही, त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

इंटरनेट रेंजची अडचण

जिल्ह्यातील अनेक भागात इंटरनेट रेंजची अडचण आहे. त्यामुळे ओटीपी येणे, इतर सर्व माहिती भरणे ही प्रक्रिया करण्यासाठी अनेक ठिकाणी किमान दोन तास, तर जास्तीत जास्त आठ तासांचा कालावधी लागतो आहे. काही ठिकाणी शेतकरी कंटाळून अर्ध्यातूनच ते सोडून देत आहेत. पिकासोबतचा शेतकऱ्याचा फोटो देखील त्यात आवश्यक असल्याने फोटो इमेज रिझोलेशन जास्त असल्यास तो डाऊनलोड होण्यास अडथळे येत आहेत. अनेक शेतकऱ्यांना तर आलेला ओटीपीच लक्षात राहिला नसल्याची स्थिती आहे. काही शेतकऱ्यांच्या नावावर नोंद असलेली जमीन व प्रत्यक्षातील जमीन यात काही गुंठ्याचा फरक असल्याने ती तांत्रिक अडचण दर्शवून ॲप ते देखील स्वीकारत नसल्याचे सांगण्यात आले. दिलेला हेल्पलाईन नंबर देखील वेळेवर लागेलच व तिकडून सांगितलेल्या सूचना समजतीलच असे नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.