शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

दरवर्षी आरटीईचा कोटा राहतोय रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:52 IST

प्राधान्यक्रमाचा अडथळा : २०१३ ते २०१५ दरम्यान सर्वाधिक अल्प प्रतिसाद

नंदुरबार : शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या गरिब व मागास वर्गातील विद्यार्थ्यांनाही खाजगी अनुदानित, विनाअनुदानीत शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेता यावे यासाठी शासनाकडून संबंधित शाळेत अशा विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के कोटा रिक्त ठेवण्यात येत असतो़ परंतु जिल्ह्यात याबाबत जनजागृृतीबाबत निरुत्साह असल्याने साहजिकच वर्षानुवर्षे आरटीईच्या जागा रिक्तच राहत असल्याची स्थिती आहे़साधारणत: २०१३ पासून २५ टक्के कोट्यांतर्गत आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली़ याला इतर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असला तरी नंदुरबारात मात्र २०१३ ते २०१५ दरम्यान या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे़ त्यामुळेच की काय शिक्षण विभागाकडेसुध्दा २०१३ ते २०१५ दरम्यान जिल्ह्याला आरटीईअंतर्गत किती जागांचा कोटा देण्यात आला होता, याबाबत माहिती नाहीये़आरटीई कशाशी खातात हेच येथील पालकांना माहिती नसल्याने साहजिकच यांतर्गत प्रवेश घेण्यासाठी उदासिनता दिसून आली़ साधारणत: २०१७-२०१८ पासून आरटीईबाबत थोडीफार माहिती मिळाल्यानंतर काही पालकांकडून यासाठी प्रवेश अर्ज दाखल करण्यात आले होते़ २०१७-२०१८ मध्ये जिल्ह्यात एकूण ४० शाळांमार्फत आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती़ यासाठी जिल्ह्याला ४५२ जागांचा कोटा ठरविण्यात आला होेता़ परंतु यापैकी केवळ ११२ विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्ष प्रवेश घेतला होता़ त्यामुळे ३४० जागा रिक्त राहिल्या होत्या़ २०१८-२०१९ मध्ये तीन शाळांमध्ये वाढ करण्यात आली होेती़ एकूण ४३ शाळांमार्फत ४५३ जागांसाठी आरटीई प्रवेश परीक्षा राबविण्यात आली़ परंतु त्याही वेळी केवळ १३७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला होता़ त्या वेळी तब्बल ३१६ आरटीई जागा रिक्त झालेल्या होत्या़यंदाही रिक्त जागांची डोकेदुखीदरम्यान, या वर्षीदेखील आरटीईअंतर्गत जास्तीत जास्त प्रवेश करवून घेण्यासाठी शिक्षण विभागाला चांगलीच कंबर कसावी लागत आहे़ परंतु तरीदेखील पालकांचा याला प्रतिसाद मिळत नसल्याने या वर्षीसुध्दा आरटीईचा कोटा रिक्तच राहतोय की काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे़ यंदा जिल्ह्यातील एकूण ४७ शाळांमार्फत ४७० जागांसाठी आरटीई प्रवेश परीक्षा राबविण्यात येत आहे़ यासाठी जिल्ह्यातून एकूण ५७३ अर्ज दाखल करण्यात आलेले आहे़ ८ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या पहिल्या आॅनलाईन सोडतीमध्ये जिल्ह्यातील एकूण १४० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले होते़ परंतु त्यापैकी आतापर्यंत केवळ ७८ विद्यार्थ्यांचीच प्रवेश निश्चिती झालेली आहे़ अद्याप दुसरी व तिसरी प्रवेश फेरी बाकी आहे़ परंतु पालकांचा पहिल्या प्रवेश फेरीला मिळालेला अल्प प्रतिसाद बघता पुढील फेऱ्यांमध्येही समाधानकारक प्रवेश होतील याची आशा धुसरच आहे़ त्यामुळे यंदाही तीनशेहून अधिक जागाचा कोटा रिक्तच राहणार असा अंदाज वर्तविण्यात येत आहे़शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पालकांकडून प्रवेश अर्ज सादर करताना शाळांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येत असतो़ परंतु प्रत्यक्षात त्यांना दुसरीच शाळा मिळाल्यावर ते प्रसंगी पैसे भरुन मनपसंत शाळेत प्रवेश घेतात़