शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

लॉकडाऊन काळातही जगाचा पोशिंदा अनलॉकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

मागील १४ महिन्यांपासून जगावर कोरोना महामारीचे संकट जाता जात नाही. सुरुवातीला एक दिवस जनता कर्फ्यूनंतर टप्प्याटप्प्याने शासनाने लॉकडाऊन ...

मागील १४ महिन्यांपासून जगावर कोरोना महामारीचे संकट जाता जात नाही. सुरुवातीला एक दिवस जनता कर्फ्यूनंतर टप्प्याटप्प्याने शासनाने लॉकडाऊन केल्याने सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र, जगाचा पोशिंदा शेतकरी राजा स्वतःवर कितीही संकट आले तरी आपली कामे सुरळीतपणे चालू ठेवत आपल्या अन्नधान्यावर अवलंबून राहणाऱ्यांसाठी आपले कर्तव्य पार पाडीत आहे.

गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळाला होता. एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च करून लोकांनी पपई व केळीचे पीक घेतले होते. मात्र, त्यावेळेस खर्चही निघाला नव्हता. तसेच ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस, डिसेंबरमध्येही अवकाळी पाऊस, तसेच मार्च महिन्यात गारपीट अशा अनेक संकटामुळे शेतकरी राजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. मात्र, तरीही या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आपण लावलेल्या मालाला भाव मिळेल की नाही? लॉकडाऊन काळात उत्पन्न निघाले तर तो माल विकला जाईल की नाही? यासारख्या असंख्य प्रश्नांचा शेतकरी विचार न करता आपले कर्तव्य पार पाडीत आहे.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यासह सगळीकडे जोरदार पाऊस झालेला आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही विहिरी, तसेच कूपनलिकांना मुबलक पाणी आहे. सध्या लॉकडाऊन काळातही जयनगरसह परिसरातील कोंढावळ, वडाळी, धांद्रे, निंभोरे, बोराळे या गावांमधील बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतामध्ये पपई, केळी, ऊस यासारखी पिके लावण्यावर भर देत आहेत.

लॉकडाऊन काळात सर्व उद्योगधंदे बंद पडले तरी शेती हा असा व्यवसाय आहे की, तो कधीही बंद पडत नाही. मागीलवर्षी आमच्या केळी, पपई पिकाला अपेक्षित भाव मिळाला नसला तरी आम्ही सध्या लॉकडाऊन काळातही या पिकांची लागवड करीत आहोत.

- वैभव राजू पाटील, शेतकरी, जयनगर, ता. शहादा.