शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

लॉकडाऊन काळातही जगाचा पोशिंदा अनलॉकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

मागील १४ महिन्यांपासून जगावर कोरोना महामारीचे संकट जाता जात नाही. सुरुवातीला एक दिवस जनता कर्फ्यूनंतर टप्प्याटप्प्याने शासनाने लॉकडाऊन ...

मागील १४ महिन्यांपासून जगावर कोरोना महामारीचे संकट जाता जात नाही. सुरुवातीला एक दिवस जनता कर्फ्यूनंतर टप्प्याटप्प्याने शासनाने लॉकडाऊन केल्याने सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र, जगाचा पोशिंदा शेतकरी राजा स्वतःवर कितीही संकट आले तरी आपली कामे सुरळीतपणे चालू ठेवत आपल्या अन्नधान्यावर अवलंबून राहणाऱ्यांसाठी आपले कर्तव्य पार पाडीत आहे.

गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळाला होता. एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च करून लोकांनी पपई व केळीचे पीक घेतले होते. मात्र, त्यावेळेस खर्चही निघाला नव्हता. तसेच ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस, डिसेंबरमध्येही अवकाळी पाऊस, तसेच मार्च महिन्यात गारपीट अशा अनेक संकटामुळे शेतकरी राजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. मात्र, तरीही या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आपण लावलेल्या मालाला भाव मिळेल की नाही? लॉकडाऊन काळात उत्पन्न निघाले तर तो माल विकला जाईल की नाही? यासारख्या असंख्य प्रश्नांचा शेतकरी विचार न करता आपले कर्तव्य पार पाडीत आहे.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यासह सगळीकडे जोरदार पाऊस झालेला आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही विहिरी, तसेच कूपनलिकांना मुबलक पाणी आहे. सध्या लॉकडाऊन काळातही जयनगरसह परिसरातील कोंढावळ, वडाळी, धांद्रे, निंभोरे, बोराळे या गावांमधील बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतामध्ये पपई, केळी, ऊस यासारखी पिके लावण्यावर भर देत आहेत.

लॉकडाऊन काळात सर्व उद्योगधंदे बंद पडले तरी शेती हा असा व्यवसाय आहे की, तो कधीही बंद पडत नाही. मागीलवर्षी आमच्या केळी, पपई पिकाला अपेक्षित भाव मिळाला नसला तरी आम्ही सध्या लॉकडाऊन काळातही या पिकांची लागवड करीत आहोत.

- वैभव राजू पाटील, शेतकरी, जयनगर, ता. शहादा.