शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

दोन महिने उलटूनही अद्यापपावेतो दमदार पाऊस नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, जमिनीच्या उदरातून निघालेले पीक अपुऱ्या पावसामुळे कोमेजली आहेत. त्यामुळे शेतीतील ...

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, जमिनीच्या उदरातून निघालेले पीक अपुऱ्या पावसामुळे कोमेजली आहेत. त्यामुळे शेतीतील पिकांची स्थिती नाजूकच झाली आहे. अशीच अवस्था बागायत शेतकऱ्यांचीही असल्याने विहिरीतील पाणी तळाला गेले आहे. साहजिकच शेतकरी चिंतित सापडलेला आहे.

जिल्ह्यात एकदाही जोरदार पाऊस झालेला नाही. नद्या, नाले, तलाव कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे विहिरींचा व बोरवेलचा पाण्याचा स्त्रोत आटत चालला आहे. त्यामुळे जिरायत आणि बागायत शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. एकीकडे कोरोनाचे सावट त्यात उद्योग व्यवसायांना चालना मिळाली नाही. त्यात बँकेचे व सावकारी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याची आर्थिक कुचंबणा होत आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील लघु-मध्यम प्रकल्प, कोल्हापुरी केटीवेअरमध्ये अत्यल्प पाणीसाठा तर काही कोरडेठाक आहेत. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने भरडला जात आहे. मागील तीन आठवड्यांपासून सोसाट्याचा वारा वाहत असून, आकाशी ढगांची गर्दी होत आहे. मात्र, जिल्ह्यात पिकांना पोषक असा पाऊस नाही. गेल्या आठवड्यात कडक उन्हामुळे पिके अधिक कोमेजू लागली आहेत. पिकांची अवस्था अत्यंत नाजूक झाली आहे. जिरायत आणि बागायत शेतीत जी काही पिके उभी आहेत. अपुऱ्या पावसाअभावी जेमतेम तग धरत उभी असलेली पिके रोगराईच्या विळख्यात अडकलेली आहेत. त्यामुळे शेतकरी-शेतमजूर त्याचबरोबर सर्वच पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. एकीकडे पावसामुळे हैराण झालेला शेतकरी तर दुसरीकडे काही ठिकाणी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे हाल होत असताना दिसते आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता, आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आपल्यामार्फत दखल घेऊन नंदुरबार जिल्हा दुष्काळ ग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर सरचिटणीस प्रवीणसिंह राजपूत, शरद जाधव, राजेंद्र राजपूत, तळोदा तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या सह्या आहेत.