शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही नयामाळ रस्त्यापासून लांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:55 IST

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील नयामाळ येथे दळणवळणासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना आजही रुग्णाला उपचारासाठी ‘बाबूलन्स’ने ...

वसंत मराठे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील नयामाळ येथे दळणवळणासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना आजही रुग्णाला उपचारासाठी ‘बाबूलन्स’ने (बांबूची झोळी करून) डोंगरावरून पायपीट करत आणावे लागत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही सातपुड्यातील आदिवासींच्या नशीबी साधी रस्त्याची सुविधा उपलब्ध केली जात नसल्याने आदिवासींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.तळोदा तालुक्यातील सातपुड्यात जवळपास ३० ते ४० पाडे वसलेले आहेत. या सर्व पाड्यांमध्ये साधारण एक हजाराहून अधिक आदिवासी कुटुंब राहत आहेत. परंतु या कुटुंबांना आजही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. एकीकडे देशाने यंदा स्वातंत्र्याची पंचात्तरही साजरी केली असताना दुसरीकडे दुर्गम भागातील आदिवासी जनतेला रस्त्यांसाठी झुजावे लागत आहे. कारण या पाड्यांमध्ये दळणवळणासाठी रस्ते नसल्याने कुटुंबातील कोणी व्यक्ती आजारी पडला तर त्याला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचा प्रश्न पडतो. कारण पायपीट करत त्यास दवाखान्यात न्यावे लागते. असेच चित्र तालुक्यातील नयामाळ या आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांबाबतही दिसून आला.नयामाळ पाड्यावरील एका कुटुंबातील निर्मलाबाई फोत्या वळवी ही ४५ वर्षाची महिला आजारी असल्यामुळे तिला उपचारासाठी तिच्या कुटुंबाने शनिवारी सकाळी अक्कलकुवा येथील दवाखान्यात झोळीतून डोंगरावरून पायपीट करत आणले होते. सध्या पावसाळी वातावरणामुळे मलेरिया, टायफाईड आदी आजारांची साथ सुरू आहे. या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामस्थांना रुग्णाला उपचारासाठी दवाखाना अथवा आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी न्यावेच लागते. परंतु त्यांना रस्त्याचा प्रश्न भेडसावतो. वास्तविक या पाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांसाठी प्रशासनाने ठोस प्रयत्न करावे, अशी तेथील आदिवासींची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. एवढेच नव्हे तर या परिसरातील ग्रामपंचायतींनीही रस्त्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी दोन-तीन वर्षापासून पाठविला आहे. मात्र त्यावर आजतागायात कार्यवाही झालेली नाही, असे सांगितले जात आहे. प्रभावी आरोग्य यंत्रणेअभावी पुरेसा उपचार मिळत नाही. कुठे इमारतींची दूरवस्था तर कुठे कर्मचाऱ्यांची वानवा असे चित्र आहे. या पाड्यांच्या महसुली गावांचा प्रश्नही शासनस्तरावर तसाच प्रलंबित पडला आहे. जवळपास ६० ते ६५ पाड्यांचा यात समावेश आहे. याबाबत प्रशासनाकडून पाठपुरावाही सुरू आहे. मात्र वरिष्ठ स्तरावरुन दुर्लक्ष असल्याने महसुली गावांचा प्रश्न रखडला आहे. महसुली दर्जाअभावी त्यांना पायाभूत सुविधांसाठी आजपावेतो झगडावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सातपुड्यातील पाड्यांमधील रस्त्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, निशांत मगरे, दिवरसिंग वसावे, देविसिंग पाडवी यांनी केली आहे.नयामाळ पाड्यापर्यंत रस्ता नसल्यामुळे तेथील ग्रामस्थ नेहमी आजारी रुग्णाला उपचारासाठी आणताना ‘बांबूलन्स’ने डोंगरावरून १५ किलोमीटर पायपीट करीत तळोदा तालुक्यातील इच्छगव्हाण गावापर्यंत आणतात. तेथून खासगी वाहनाने अक्कलकुवा जवळ पडत असल्यामुळे तेथे नेतात. अशावेळी खासगी वाहन चालक अव्वाचा सव्वा पैसे मागतात. नाईलाजाने तेवढी रक्कमही द्यावी लागत असल्याचे नातेवाईक सांगतात. सध्या साथीचे आजार व कोरोनाची महामारी लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा अधिक सजग व पुरेशी ठेवण्याची मागणी आदिवासींनी केली आहे.सातपुड्यातील आदिवासी पाड्यांमध्ये रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे. रस्त्यांअभावी आजारी रुग्णाला नेहमीच ‘बांबूलन्स’ने झोलीतून पायपीट करीत न्यावे लागते. या भागात रस्ते करण्याबाबत सातत्याने मागणी करीत आहोत. मात्र कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे आरोग्यासारख्या अत्यंत गरजेच्या सुविधेपासून वंचित राहावे लागते.-फोज्या वळवी,ग्रामस्थ, नयामाळ, ता.तळोदा.