शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही नयामाळ रस्त्यापासून लांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:55 IST

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील नयामाळ येथे दळणवळणासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना आजही रुग्णाला उपचारासाठी ‘बाबूलन्स’ने ...

वसंत मराठे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील नयामाळ येथे दळणवळणासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना आजही रुग्णाला उपचारासाठी ‘बाबूलन्स’ने (बांबूची झोळी करून) डोंगरावरून पायपीट करत आणावे लागत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही सातपुड्यातील आदिवासींच्या नशीबी साधी रस्त्याची सुविधा उपलब्ध केली जात नसल्याने आदिवासींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.तळोदा तालुक्यातील सातपुड्यात जवळपास ३० ते ४० पाडे वसलेले आहेत. या सर्व पाड्यांमध्ये साधारण एक हजाराहून अधिक आदिवासी कुटुंब राहत आहेत. परंतु या कुटुंबांना आजही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. एकीकडे देशाने यंदा स्वातंत्र्याची पंचात्तरही साजरी केली असताना दुसरीकडे दुर्गम भागातील आदिवासी जनतेला रस्त्यांसाठी झुजावे लागत आहे. कारण या पाड्यांमध्ये दळणवळणासाठी रस्ते नसल्याने कुटुंबातील कोणी व्यक्ती आजारी पडला तर त्याला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचा प्रश्न पडतो. कारण पायपीट करत त्यास दवाखान्यात न्यावे लागते. असेच चित्र तालुक्यातील नयामाळ या आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांबाबतही दिसून आला.नयामाळ पाड्यावरील एका कुटुंबातील निर्मलाबाई फोत्या वळवी ही ४५ वर्षाची महिला आजारी असल्यामुळे तिला उपचारासाठी तिच्या कुटुंबाने शनिवारी सकाळी अक्कलकुवा येथील दवाखान्यात झोळीतून डोंगरावरून पायपीट करत आणले होते. सध्या पावसाळी वातावरणामुळे मलेरिया, टायफाईड आदी आजारांची साथ सुरू आहे. या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामस्थांना रुग्णाला उपचारासाठी दवाखाना अथवा आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी न्यावेच लागते. परंतु त्यांना रस्त्याचा प्रश्न भेडसावतो. वास्तविक या पाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांसाठी प्रशासनाने ठोस प्रयत्न करावे, अशी तेथील आदिवासींची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. एवढेच नव्हे तर या परिसरातील ग्रामपंचायतींनीही रस्त्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी दोन-तीन वर्षापासून पाठविला आहे. मात्र त्यावर आजतागायात कार्यवाही झालेली नाही, असे सांगितले जात आहे. प्रभावी आरोग्य यंत्रणेअभावी पुरेसा उपचार मिळत नाही. कुठे इमारतींची दूरवस्था तर कुठे कर्मचाऱ्यांची वानवा असे चित्र आहे. या पाड्यांच्या महसुली गावांचा प्रश्नही शासनस्तरावर तसाच प्रलंबित पडला आहे. जवळपास ६० ते ६५ पाड्यांचा यात समावेश आहे. याबाबत प्रशासनाकडून पाठपुरावाही सुरू आहे. मात्र वरिष्ठ स्तरावरुन दुर्लक्ष असल्याने महसुली गावांचा प्रश्न रखडला आहे. महसुली दर्जाअभावी त्यांना पायाभूत सुविधांसाठी आजपावेतो झगडावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सातपुड्यातील पाड्यांमधील रस्त्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, निशांत मगरे, दिवरसिंग वसावे, देविसिंग पाडवी यांनी केली आहे.नयामाळ पाड्यापर्यंत रस्ता नसल्यामुळे तेथील ग्रामस्थ नेहमी आजारी रुग्णाला उपचारासाठी आणताना ‘बांबूलन्स’ने डोंगरावरून १५ किलोमीटर पायपीट करीत तळोदा तालुक्यातील इच्छगव्हाण गावापर्यंत आणतात. तेथून खासगी वाहनाने अक्कलकुवा जवळ पडत असल्यामुळे तेथे नेतात. अशावेळी खासगी वाहन चालक अव्वाचा सव्वा पैसे मागतात. नाईलाजाने तेवढी रक्कमही द्यावी लागत असल्याचे नातेवाईक सांगतात. सध्या साथीचे आजार व कोरोनाची महामारी लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा अधिक सजग व पुरेशी ठेवण्याची मागणी आदिवासींनी केली आहे.सातपुड्यातील आदिवासी पाड्यांमध्ये रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे. रस्त्यांअभावी आजारी रुग्णाला नेहमीच ‘बांबूलन्स’ने झोलीतून पायपीट करीत न्यावे लागते. या भागात रस्ते करण्याबाबत सातत्याने मागणी करीत आहोत. मात्र कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे आरोग्यासारख्या अत्यंत गरजेच्या सुविधेपासून वंचित राहावे लागते.-फोज्या वळवी,ग्रामस्थ, नयामाळ, ता.तळोदा.