शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

रेमडेसिविरबाबत जनतेच्या मनातील गैरसमज दूर करा : ॲड. के. सी. पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील डॉक्टरांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा शल्य ...

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील डॉक्टरांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये आणि जिल्ह्यातील वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते.

ॲड. पाडवी म्हणाले, रुग्णालयांनी रेमडेसिविर औषधासाठी जिल्हा प्रशासनाकडे मागणी करावी. रुग्णाचा जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. रुग्णांच्या मनातील भीती घालविताना त्यांना उपचाराबाबत मार्गदर्शन करावे. शासनाने निश्चित केलेल्या दराचा फलक रुग्णालयाबाहेर लावावा.

कोरोनाचे संकट अधिक गंभीर होत असल्याने एमडी मेडिसिन डॉक्टरांनी आठवड्यातील एक दिवस आपली सेवा जिल्हा प्रशासनास द्यावी. जिल्ह्यातील डॉक्टरांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. आदिवासी भागात डॉक्टरांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे माणुसकीच्या भावनेने स्वयंस्फूर्तीने आपली सेवा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी द्यावी. डॉक्टरांचे काम हे देवाप्रमाणे आहे. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांचे कार्य महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. भारुड म्हणाले, डॉक्टरांनी रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी सहकार्य करावे. रेमडेसिविर औषधाचा उपयोग मार्गदर्शक सूचनेनुसार करावा. आवश्यक नसताना सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णासाठी ऑक्सिजन बेडचा उपयोग करू नये. संकटाच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे. काही दिवसांतच आरटीपीसीआरची दुसरी प्रयोगशाळा सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.