शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

वीज, पाणी, रस्त्यांची प्रतिक्षा कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : काथर्दे, ता.शहादा येथील २७ प्रकल्प बाधित कुटुंबांचे गेल्या तीन वर्षांपासून संबंधीत नर्मदा विकास विभागाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : काथर्दे, ता.शहादा येथील २७ प्रकल्प बाधित कुटुंबांचे गेल्या तीन वर्षांपासून संबंधीत नर्मदा विकास विभागाने येथे पुनर्वसन करूनही आजतागायत त्यांना वीज, पाणी, रस्ते अशा मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. अशाच स्थितीत ही कुटुंबे त्या ठिकाणी राहत आहे. सुविधांबाबत संबंधीत यंत्रणेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र त्यांनी कानावर हात ठेवल्याचा आरोप विस्थापितांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाने तरी दाद द्यावी, अशी मागणी बाधितांनी केली आहे.शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर या नवीन पुनर्वसन वसाहतीत धडगाव तालुक्यातील १०७ विस्थापीत कुटुंबांचे शासनाने पुनर्वसन केले आहे. त्यातील २७ कुटुंबांना २०१७ मध्ये तेथे आणले आहे. नर्मदा विकास विभागाने त्यांना तात्पुरते शेड उभारून दिले आहेत. परंतु तीन वर्षे झालीत अजूनही नर्मदा विकास विभागाने जमीन सपाटीकरण करून दिलेली नाही. एवढेच नव्हे तर या कुटुंबांना साध्या पिण्याचे पाणी, गटारी व रस्ते या प्राथमिक सुविधादेखील उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. पाण्यासाठी इकडे-तिकडे भटकंती करावी लागत असते असे प्रकल्पग्रस्त म्हणतात.वास्तविक कुटुंबांचे पुनर्वसन करण्याआधी तेथे संपूर्ण नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय पुनर्वसन करू नये, असे नर्मदा अवार्डमध्ये स्पष्ट असतांना संबंधीत प्रासन शासनाचा नियम धाब्यावर बसवत मनमानीपणे आणून सोडत असते, असा आरोप ही विस्थापितांनी केला आहे. याप्रकरणी प्रशासनाशीदेखील असेच ठरले असतांना त्यांनीही याकडे साफदुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. संबंधितांचा वचक नर्मदा विकास विभागावर नसल्यामुळे या अधिकाऱ्यांचे फावत असल्याचे विस्थापित सांगतात.दरवर्षी पावसाळा जवळ आला की, विस्थापितांच्या प्रश्नांवरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्याचाी दिखाऊपणा केला जातो. त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. पावसाळ्या पूर्वी आम्हाला आमच्या वसाहतीत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाा विस्थापितांनी दिला आहे.दरम्यान या ठिकाणी पुन्हा ५० विस्थापितांना आणण्याचे संबंधित नर्मदा विकास विभागाचे नियोजन आहे. मात्र यांनाच नागरी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. त्यांचा प्रश्न कसा सोडविणार, असा सवालही बाधितांनी उपस्थित केला आहे.गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी विस्थपीतांच्या गावठाणात शिरले होते. या पाड्यात त्यांचा संपूर्ण संसार उघड्यार आला होता. नाल्याच्या पुढे झालेल्या अतिक्रमणामुळे नदीतील पाणी वसाहतीत शिरले होते. याबाबत संबंधीत यंत्रणेने अजूनही कुठल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत, असे विस्थापितांचे म्हणणे आहे. वास्तविक शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढून नाल्याचे खोलीकरण करण्याचले ठरले होते. परंतु उदासीन यंत्रणेने पावसाळा जवल आलेला असतांना अजून पावेतो कुठलीच कार्यवाही केली नसल्याचे विस्थापीत सांगतात. जसे बाधितांची मुळगावातून घरे शिफ्ट करण्याची कार्यवाही तत्परतेने केली जाते, तशी त्यांचा जमीन खरेदी, सीमांकण, संपादन, सिंचन सुविधा, नागरी सुविधा, नाला खोलीकरणच्या कामाबाबत अशी तत्परता का दाखविली जात नाही, असा उदिग्न सवाल बाधितांनी उपस्थित केला आहे. अधिकाºयांनी प्रकल्पग्रस्तांच्या संयमाचा अंत न पाहता विकासाबाबत ठोस प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.माझ्या मुळ गावातून मला काथर्दे दिगर वसाहतीत गेल्या तीन वर्षांपूर्वी शिफ्ट केले आहे. तथापि येथे अजून पावेतो रस्ते, पाणी, लाईट, गटारी या सारख्या प्राथमिक सुविधादेखील संबंधीतांनी उपलब्ध करून दिलेलञया नाहीत. ठोस प्रयत्नांऐवजी पोकळ आश्वासन दिले जाते. आता पश्चाताप होत आहे.-लालसिंग वसावे, प्रकल्प बाधित, काथर्दे पुनर्वसन.