शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

३० वर्षांच्या विकासाच्या स्वप्नांना आकार देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:28 IST

रमांकात पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आमदार म्हणून गेल्या ३० वर्षांपासून आपण या भागाचे प्रतिनिधित्त्व करीत असून ...

रमांकात पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आमदार म्हणून गेल्या ३० वर्षांपासून आपण या भागाचे प्रतिनिधित्त्व करीत असून या काळात विकासाच्या योजनांचा पाठपुरावा करुन आपल्या कामाला प्रामाणिकपणे न्याय दिला आहे़ आता मंत्रीपद मिळाल्याने कामाची कक्षा रुंंदावली असून त्याचा जनसेवेसाठी पूरेपूर प्रयत्न करु अशी ग्वाही मंत्री अ‍ॅडक़े़सी़पाडवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़अ‍ॅड़ के़सी़पाडवी हे १९९० पासून आमदार म्हणून सातपुड्याचे प्रतिनिधित्त्व करीत आहेत़ या काळात त्यांना मंत्रीपदाचीही संधी चालून आल्या़ १९९५ मध्ये तत्त्कालीन युती शासनात त्यांना मंत्रीपदाची आॅफर होती़ परंतू तत्त्व आणि विचारधारेची सबब पुढे करुन त्यांनी त्यावेळी मंत्रीपद नाकारले होते़ पुढे आघाडी शासनाच्या काळातही ज्येष्ठतेला योग्य न्याय मिळाला नसल्याने त्यांनी राज्यमंत्रीपद नाकारले होते़ या पार्श्वभूमीवर नुकतेच सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या शासनात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे़अद्याप खातेवाटप झाले नसले तरी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी प्रथमच ते जिल्ह्यात आले़ यावेळी त्यांची भेट घेतली असता, ते विविध प्रश्नांवर बोलताना म्हणाले की, विधीमंडळाच्या आपल्याला ३० वर्षाचा अनुभव आहे़ त्यामुळे केवळ सातपुडा आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांची आपणाला जाण आहे़ विशेषत: आदिवासींचे विविध प्रश्न आपण जाणून आहेत़ हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने विधीमंडळात पाठपुरावा करीत आलो, काही प्रश्नांबाबत थेट दिल्लीतही आंदोलने केली़ त्यातून काही प्रश्न मार्गी लागले़ काही सुटू शकले नाहीत, काहींच्या बाबतीत मनासारखा न्याय मिळाला नाही ही खंत निश्चितच आमदार असताना आपल्या मनात होती़ आणि आजही आहे़ आता मंत्रीपद मिळाल्याने त्यांच्या व्यापकतेने विचार करता येईल व विकासाचे प्रश्नही मार्गी लावण्यास मदत मिळेल़जिल्ह्यातील प्रश्नांसदर्भात ते म्हणाले सातपुड्यातील वनगावे, वनजमीनीचा प्रश्न, स्थलांतराचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, उद्योग संदर्भातील प्रश्न आपण नेहमी मांडले आहेत़ त्यासदंर्भात काय झाले पाहिजे त्याचीही मनात एक संकल्पना तयार केली आहे़ ही संकल्पना साकारण्यासाठी आपले निश्चितच प्राधान्य राहिल़ मतदारासंघातील दरा आणि आंबाबारी या मध्यप्रकल्पांचे रखडलेले काम, रहाट्यावड धरणाचे काम मार्गी लावणे, तापीवरील उपसा योजना, जिल्ह्यातील दळणवळणाचा प्रश्न, पर्यावरणाचा प्रश्न या कामांनाही प्राधान्य राहिल़खातेवाटप अद्याप झालेले नाही़ आपल्याला कुठले खाते द्यावे हे मुख्यमंत्री ठरवतील, पण ज्याही खात्याचे काम मिळेल त्याला पुरेपूर न्याय देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील़ आपल्याला मिळालेली ही संधी लोकसेवेसाठीच पणाला लावू असेही त्यांनी सांगितले़