शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

३० वर्षांच्या विकासाच्या स्वप्नांना आकार देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:28 IST

रमांकात पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आमदार म्हणून गेल्या ३० वर्षांपासून आपण या भागाचे प्रतिनिधित्त्व करीत असून ...

रमांकात पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आमदार म्हणून गेल्या ३० वर्षांपासून आपण या भागाचे प्रतिनिधित्त्व करीत असून या काळात विकासाच्या योजनांचा पाठपुरावा करुन आपल्या कामाला प्रामाणिकपणे न्याय दिला आहे़ आता मंत्रीपद मिळाल्याने कामाची कक्षा रुंंदावली असून त्याचा जनसेवेसाठी पूरेपूर प्रयत्न करु अशी ग्वाही मंत्री अ‍ॅडक़े़सी़पाडवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़अ‍ॅड़ के़सी़पाडवी हे १९९० पासून आमदार म्हणून सातपुड्याचे प्रतिनिधित्त्व करीत आहेत़ या काळात त्यांना मंत्रीपदाचीही संधी चालून आल्या़ १९९५ मध्ये तत्त्कालीन युती शासनात त्यांना मंत्रीपदाची आॅफर होती़ परंतू तत्त्व आणि विचारधारेची सबब पुढे करुन त्यांनी त्यावेळी मंत्रीपद नाकारले होते़ पुढे आघाडी शासनाच्या काळातही ज्येष्ठतेला योग्य न्याय मिळाला नसल्याने त्यांनी राज्यमंत्रीपद नाकारले होते़ या पार्श्वभूमीवर नुकतेच सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या शासनात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे़अद्याप खातेवाटप झाले नसले तरी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी प्रथमच ते जिल्ह्यात आले़ यावेळी त्यांची भेट घेतली असता, ते विविध प्रश्नांवर बोलताना म्हणाले की, विधीमंडळाच्या आपल्याला ३० वर्षाचा अनुभव आहे़ त्यामुळे केवळ सातपुडा आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांची आपणाला जाण आहे़ विशेषत: आदिवासींचे विविध प्रश्न आपण जाणून आहेत़ हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने विधीमंडळात पाठपुरावा करीत आलो, काही प्रश्नांबाबत थेट दिल्लीतही आंदोलने केली़ त्यातून काही प्रश्न मार्गी लागले़ काही सुटू शकले नाहीत, काहींच्या बाबतीत मनासारखा न्याय मिळाला नाही ही खंत निश्चितच आमदार असताना आपल्या मनात होती़ आणि आजही आहे़ आता मंत्रीपद मिळाल्याने त्यांच्या व्यापकतेने विचार करता येईल व विकासाचे प्रश्नही मार्गी लावण्यास मदत मिळेल़जिल्ह्यातील प्रश्नांसदर्भात ते म्हणाले सातपुड्यातील वनगावे, वनजमीनीचा प्रश्न, स्थलांतराचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, उद्योग संदर्भातील प्रश्न आपण नेहमी मांडले आहेत़ त्यासदंर्भात काय झाले पाहिजे त्याचीही मनात एक संकल्पना तयार केली आहे़ ही संकल्पना साकारण्यासाठी आपले निश्चितच प्राधान्य राहिल़ मतदारासंघातील दरा आणि आंबाबारी या मध्यप्रकल्पांचे रखडलेले काम, रहाट्यावड धरणाचे काम मार्गी लावणे, तापीवरील उपसा योजना, जिल्ह्यातील दळणवळणाचा प्रश्न, पर्यावरणाचा प्रश्न या कामांनाही प्राधान्य राहिल़खातेवाटप अद्याप झालेले नाही़ आपल्याला कुठले खाते द्यावे हे मुख्यमंत्री ठरवतील, पण ज्याही खात्याचे काम मिळेल त्याला पुरेपूर न्याय देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील़ आपल्याला मिळालेली ही संधी लोकसेवेसाठीच पणाला लावू असेही त्यांनी सांगितले़