शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
5
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
6
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
7
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
8
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
9
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
10
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
11
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
12
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
13
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
14
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
15
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
16
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
17
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
18
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
19
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
20
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका

जयनगरसह परिसरात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST

दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट महिन्यात नदी-नाल्यांना पाणी येत असते. मात्र, ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात अति ...

दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट महिन्यात नदी-नाल्यांना पाणी येत असते. मात्र, ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस झालेला नाही. आतापर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसावर पिके तग धरून ठेवत होती. मात्र, आता तीन आठवडे होऊन चालले तरी जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिके कोमेजू लागली आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीपासून ते बी-बियाणे खते, कोळपणी, औषध फवारणीसाठी हजारो रूपये शेतीत टाकले आहेत. परंतु पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना शेतातील पिकांवर रोटाव्हेटर फिरविण्याशिवाय पर्याय नाही. असे झाले तर शेतकरी राजा खूपच आर्थिक विवंचनेत सापडणार आहे.

एकतर सुरूवातीपासूनच यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार लागवड व पेरणीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पिकांची उगवण तर कमी झाली. मात्र, कमी-अधिक प्रमाणात उगवण झाली आहे. जुलै महिना अर्धा झाल्यावर बऱ्यापैकी पाऊस झाला तेव्हा शेतकऱ्यांनी रासायनिक खते तसेच कीटकनाशकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी केली होती. त्यामुळे पिके बऱ्यापैकी दिसत होती. मात्र आता बऱ्याच दिवसापासून पाऊस नसल्याने पिके कोमेजू लागली आहेत.

पावसाने अशीच दडी मारली तर शेतकऱ्यांचे हजारो रूपयांचे नुकसान होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे विहिरी तसेच कूपनलिकांना पाणी आहे, ते शेतकरी पिके वाचविण्यावर भर देत असले तरी समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पाणी पातळी खालावलेली दिसून येत आहे. एकंदरीत संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येणाऱ्या दिवसात पाऊस झाला नाही तर काय होईल? या विवंचनेत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण शेती ही भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस कमी झाला तर सुरू असलेल्या विहिरी तसेच कूपनलिका ही बंद पडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. एकंदरीत जमिनीतील पाणीसाठा वाढण्यासाठी तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांचे पीक वाचण्यासाठी जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे.

जून महिन्यात कापूस लागवड केली असून, तेव्हाही बरेच दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे निम्म्या क्षेत्रावर नवीन कापूस लागवड करावी लागली होती. आताही तीन आठवड्यांपासून पाऊस नसल्याने पिके कोमेजू लागली आहेत. लवकरात लवकर पाऊस आला नाही तर कापूस पिकास मोड येण्याची शक्यता आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करायला हवी.

- जगदीश हरी पाटील, शेतकरी, जयनगर.