शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जयनगरसह परिसरात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST

दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट महिन्यात नदी-नाल्यांना पाणी येत असते. मात्र, ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात अति ...

दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट महिन्यात नदी-नाल्यांना पाणी येत असते. मात्र, ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस झालेला नाही. आतापर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसावर पिके तग धरून ठेवत होती. मात्र, आता तीन आठवडे होऊन चालले तरी जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिके कोमेजू लागली आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीपासून ते बी-बियाणे खते, कोळपणी, औषध फवारणीसाठी हजारो रूपये शेतीत टाकले आहेत. परंतु पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना शेतातील पिकांवर रोटाव्हेटर फिरविण्याशिवाय पर्याय नाही. असे झाले तर शेतकरी राजा खूपच आर्थिक विवंचनेत सापडणार आहे.

एकतर सुरूवातीपासूनच यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार लागवड व पेरणीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पिकांची उगवण तर कमी झाली. मात्र, कमी-अधिक प्रमाणात उगवण झाली आहे. जुलै महिना अर्धा झाल्यावर बऱ्यापैकी पाऊस झाला तेव्हा शेतकऱ्यांनी रासायनिक खते तसेच कीटकनाशकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी केली होती. त्यामुळे पिके बऱ्यापैकी दिसत होती. मात्र आता बऱ्याच दिवसापासून पाऊस नसल्याने पिके कोमेजू लागली आहेत.

पावसाने अशीच दडी मारली तर शेतकऱ्यांचे हजारो रूपयांचे नुकसान होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे विहिरी तसेच कूपनलिकांना पाणी आहे, ते शेतकरी पिके वाचविण्यावर भर देत असले तरी समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पाणी पातळी खालावलेली दिसून येत आहे. एकंदरीत संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येणाऱ्या दिवसात पाऊस झाला नाही तर काय होईल? या विवंचनेत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण शेती ही भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस कमी झाला तर सुरू असलेल्या विहिरी तसेच कूपनलिका ही बंद पडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. एकंदरीत जमिनीतील पाणीसाठा वाढण्यासाठी तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांचे पीक वाचण्यासाठी जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे.

जून महिन्यात कापूस लागवड केली असून, तेव्हाही बरेच दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे निम्म्या क्षेत्रावर नवीन कापूस लागवड करावी लागली होती. आताही तीन आठवड्यांपासून पाऊस नसल्याने पिके कोमेजू लागली आहेत. लवकरात लवकर पाऊस आला नाही तर कापूस पिकास मोड येण्याची शक्यता आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करायला हवी.

- जगदीश हरी पाटील, शेतकरी, जयनगर.