शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

जयनगरसह परिसरात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST

दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट महिन्यात नदी-नाल्यांना पाणी येत असते. मात्र, ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात अति ...

दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट महिन्यात नदी-नाल्यांना पाणी येत असते. मात्र, ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस झालेला नाही. आतापर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसावर पिके तग धरून ठेवत होती. मात्र, आता तीन आठवडे होऊन चालले तरी जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिके कोमेजू लागली आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीपासून ते बी-बियाणे खते, कोळपणी, औषध फवारणीसाठी हजारो रूपये शेतीत टाकले आहेत. परंतु पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना शेतातील पिकांवर रोटाव्हेटर फिरविण्याशिवाय पर्याय नाही. असे झाले तर शेतकरी राजा खूपच आर्थिक विवंचनेत सापडणार आहे.

एकतर सुरूवातीपासूनच यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार लागवड व पेरणीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पिकांची उगवण तर कमी झाली. मात्र, कमी-अधिक प्रमाणात उगवण झाली आहे. जुलै महिना अर्धा झाल्यावर बऱ्यापैकी पाऊस झाला तेव्हा शेतकऱ्यांनी रासायनिक खते तसेच कीटकनाशकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी केली होती. त्यामुळे पिके बऱ्यापैकी दिसत होती. मात्र आता बऱ्याच दिवसापासून पाऊस नसल्याने पिके कोमेजू लागली आहेत.

पावसाने अशीच दडी मारली तर शेतकऱ्यांचे हजारो रूपयांचे नुकसान होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे विहिरी तसेच कूपनलिकांना पाणी आहे, ते शेतकरी पिके वाचविण्यावर भर देत असले तरी समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पाणी पातळी खालावलेली दिसून येत आहे. एकंदरीत संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येणाऱ्या दिवसात पाऊस झाला नाही तर काय होईल? या विवंचनेत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण शेती ही भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस कमी झाला तर सुरू असलेल्या विहिरी तसेच कूपनलिका ही बंद पडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. एकंदरीत जमिनीतील पाणीसाठा वाढण्यासाठी तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांचे पीक वाचण्यासाठी जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे.

जून महिन्यात कापूस लागवड केली असून, तेव्हाही बरेच दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे निम्म्या क्षेत्रावर नवीन कापूस लागवड करावी लागली होती. आताही तीन आठवड्यांपासून पाऊस नसल्याने पिके कोमेजू लागली आहेत. लवकरात लवकर पाऊस आला नाही तर कापूस पिकास मोड येण्याची शक्यता आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करायला हवी.

- जगदीश हरी पाटील, शेतकरी, जयनगर.