शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलअभावी गाळ काढणी रखडतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:28 IST

गाळमुक्त धरण उपक्रम : कामाला गती देण्याची ग्रामस्थांची मागणी

शनिमांडळ : गाळमुक्त धरण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध धरणांतील गाळ काढणीची कामे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे़ शासनाच्या खर्चातून हे काम करण्यात येणार असल्याने पोकलॅण्ड, डिझेल आदींची जिल्हा प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती़ परंतु आता डिझेल उपलब्ध होत नसल्याने गाळ काढण्याच्या कामाची गती मंदावली असल्याची माहिती आहे़गाळमुक्त धरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील साधारणत: २५ ते ३० तलावांमधून गाळ काढणीच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली होती़ त्यानुसार कामेही सुरु झालेली आहेत़ परंतु आता डिझेलअभावी कामे संथ गतीने होत असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत कामाची गती वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे़ट्रॉलीमागे शंभर रुपयेदरम्यान, पोकलॅण्डतर्फे गाळ काढण्यात येत असल्याने यासाठी डिझेलची आवश्यकता भासत असते़ परंतु जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकींच्या धामधुमीमध्ये याकडे लक्ष दिले जात नसल्याने साहजिकच बऱ्याच वेळा गाळ काढणीची कामे मंदावत असतात़ दरम्यान, तलावातील गाळ शेतीसाठी उत्तम असल्याने शेतकऱ्यांकडून आपआपल्या शेतात गाळ टाकण्यास पसंती देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे गाळाच्या एका ट्रॉलीमागे शंभर रुपये शेतकरी मोजत असून यातूनच डिझेलचा खर्च भागवण्यात येत असल्याची माहिती आहे़ गाळ काढण्याचा उपक्रम शासनाच्या खर्चातून हाती घेण्यात आला असला तरी आता शेतकऱ्यांच्या पैशातूनच डिझेलचा खर्च काढण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे़ त्यामुळे शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे़उर्वरीत ठिकाणीही गाळ काढावाजिल्ह्यातील उर्वरीत गाव तलावांचाही लवकरात लवकर गाळ काढण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे़ जिल्ह्यात ६८ पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम करण्यात आले आहे़ अक्कलकुवा तालुक्यात ५, धडगाव ३, नंदुरबार २५, नवापूर १२, शहादा १८ तर तळोद तालुक्यातील ५ पाझर तलावातून गाळ काढणीची कामे पूर्ण करण्यात आली आहे़ या ६८ तलावांमधून साधारणत: १ लाख ८९ हजार ९ घमी इतका गाळ काढण्यात आलेला आहे़ यासाठी २० लाख ७९ हजार रुपयांचा खर्च लागला असल्याची माहिती सांगण्यात आली़दरम्यान, खोक्राळे, निंभेलख वडबारे, वावद, श्रीरामपूर, लोणखेडा, जुनमोहिदे, कंढरे, उमर्दे बु, भालेर, तिसी, शिंदगव्हाण, वडवद, अक्राळे, आसाणे, नांदखर्डे, चाकळे, घोटाणे, भिलाईपाडा, वाघाळे, बलवंड, रजाळे, खर्दे तलवाडे आदी पाझर तलावांमधून गाळ काढण्याची कामे करण्यात येत असून त्यांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त केले जात आहे़ गाळ काढणीच्या कामांसाठी स्वयंसेवी संस्थांकडून देण्यात येणार आहे़१५ ते २० फुटांपर्यंत गाळअनेक ठिकाणच्या ब्रिटीश कालीन गाव तलावांमध्ये सुमारे १५ ते २० फूट जाडी असलेला गाळाचे संचयन झाले आहे़ त्यामुळे पावसाळ्यात गाव तलाव पूर्ण क्षमतेने भरत नसून पावसाचे पाणी वाहून जात आहे़ पहिल्यापासून नंदुरबार तालुक्यातील पुर्वेकडील भागात पाण्याची वानवा आहे़ भौगोलिक कारणांमुळे या ठिकाणी सरासरीच्या तुलनेत निम्यापेक्षाही कमी पाऊस पडत असल्याने या ठिकाणी पाण्याचे नेहमीच दुर्भिष्य जाणवत असते़ त्यामुळे ब्रिटीश सरकारणे विविध ठिकाणी तलाव बांधून त्यावेळी पाण्याचे नियोजन केले होते़ परंतु बरीच वर्षे होऊनदेखील अद्यापर्यंत या तलावातून गाळ काढण्यात आलेला नव्हता़ दरम्यान, शनिमांडळ येथील तलाव तसेच आंबेबारा येथील तलावाच्या माध्यमातून शनिमांडळसह, तिलाली, तलवाडे, रजाळे, बलवंड या गावांची तहान भागवली जात असते़ आता सध्या हा गावतलाव पूर्णपणे कोरडा झाला असून या तलावाचा गाळ काढणेही प्रशासनाला सोयीस्कर ठरत आहे़ यंदा जिल्ह्यात केवळ ६७ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असल्याने साहजिकच तलावदेखील कोरडा पडलेला आहे़ त्यामुळे तलावाचा गाळ काढण्यात यावा यासाठी गावातील ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला होता़ दरम्यान, उपक्रमाबाबत रोजगार हमी योजनेच्या तत्कालीन उपजिल्हाधिकारी डॉ़ अर्चना पठारे यांनी पाठपुरावा करुन सुरुवात केली होती़ त्यानंतर नवीन अधिकारी बदलून आल्याने उपक्रमाची कामेदेखील रखडली आहेत़