शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

19 विभागांच्या उदासिनतेमुळे वृक्षारोपणात जिल्ह्याची पिछाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातून नंदुरबार जिल्ह्याने राज्यात पहिल्या 10 जिल्ह्यात स्थान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातून नंदुरबार जिल्ह्याने राज्यात पहिल्या 10 जिल्ह्यात स्थान मिळण्याचे नंदुरबार जिल्ह्याचे स्वपA 19 विभागांच्या उदासनितेमुळे भंग पावले आह़े 57 पैकी 19 विभागांनी वृक्षारोपणच केलेले नसल्याने त्यांच्यासाठी तयार झालेल्या खड्डय़ांचा खर्चही वाया जाण्याची चिन्हे आहेत़        1 जुलैपासून राज्यासह जिल्ह्यात वृक्षारोपणाचा वाजागाजा सुरु झाला होता़ गत दीड महिन्यात जिल्ह्यात 78 लाख झाडे लावत राज्यातील पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये स्थान पटकावले होत़े परंतू गत 15 दिवसात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मागे पडला असून 19 शासकीय विभागांना दिलेले ‘टारगेट’ पूर्ण करणेच जमलेले नसल्याने जिल्ह्याची दोन क्रमांकांनी घसरण झाली आह़े विशेष म्हणजे शेजारील धुळे जिल्ह्याने राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यात स्थान मिळवले आह़े जिल्ह्यासाठी यंदा शासनाने 94 लाख 98 हजार झाडांच्या लागवडीचे उद्दीष्टय़ दिले होत़े यासाठी 94 लाख 75 हजार खड्डे खोदण्यात आले होत़े वनविभागाच्या रोपवाटिकांमधून विविध 57 शासकीय विभागांना ही रोपे देण्याचे निर्धारीत केले होत़े यानुसार दीड महिन्यार्पयत सुरळीत कामकाज सुरु होत़े परंतू काही विभागांनी खातेही न उघडल्याचे स्पष्ट झाले आह़े गेल्या दीड महिन्यात तब्बल 1 लाख 15 हजार 8 शासकीय अधिकारी, कर्मचारी, निमशासकीय संस्थांचे अधिकारी कर्मचारी, बँकांचे अधिकारी कर्मचारी, एसटीचे कर्मचारी, शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांच्या सहभागातून 85 टक्के वृक्षलागवड पूर्ण झाली होती़ परंतू गत 15 दिवसात हा सहभाग कमी होऊन जिल्ह्यातील वृक्ष लागवड 1 टक्क्यानेच वाढल्याचे चित्र दिसून आले आह़े 

जिल्ह्यात आजअखेरीस 81 लाख 76 हजार 894 झाडांची आजअखेरीस लागवड पूर्ण झाली आह़े यात वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांनी 100 टक्के उद्दीष्टय़पूर्ती केल्याचे सांगण्यात आले आह़े परंतू सोबतच्या कृषी विभागाने मात्र आजअखेरीस केवळ 1 लाख 74 हजार 648 झाडेच लावल्याचे स्पष्ट झाले आह़े या विभागाला तीन लाख झाडे लावण्याचे उद्दीष्टय़ देण्यात आले होत़े एकीकडे कृषी विभाग 50 टक्के कामात अडखळल्यानंतर काही विभागांनी खातेही उघडलेले नाही़ यात जलस्त्रोत विभाग, कामगार विभाग, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, गृहनिर्माण विभाग, मध्यरेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगरपालिका, दुग्धोत्पादन विभाग, व्हीजेएनटी आणि ओबीसी कल्याण, पर्यटन, सांस्कृतिक कार्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग आणि  वस्त्र, रेशीम उद्योग महामंडळ आणि अल्पसंख्याक विकास विभाग यांचा समावेश आह़े सहका आणि पणन विभागाला यंदा 13 हजार झाडांचे उद्दीष्टय़ होत़े त्यांच्याकडून 10 दिवसांपूर्वी 1 हजार 852 झाडे लावल्याचा अहवाल दिला गेला होता़ परंतू नुकत्याच प्राप्त आकडेवारीनुसार त्यांनी 10 हजार झाडे पूर्णपणे लावल्याचे सांगण्यात आले आह़े दुसरीकडे क्रीडा विभागाला 3 हजार 950 झाडांचे उद्दीष्टय़ देण्यात आले होत़े पैकी त्यांनी केवळ 95 झाडेच लावली असल्याचे समोर आले आह़े 

जिल्ह्यातील 952 गावांसाठी निर्माण करण्यात आलेल्या 586 ग्रामपंचायतींमध्ये 19 लाख 4 हजार 600 झाडे लावण्याची अपेक्षा होती़ परंतू गेल्या दोन महिन्यात ग्रामपंचायतींमच्या हद्दीत केवळ 10 लाख 2 हजार 20 झाडेच लागली आहेत़ विशेष म्हणजे ग्रामपंचायतींसाठी 19 लाख 50 हजार 800 खड्डे खोदले गेले आहेत़ केवळ एक झाडे लागल्याने उर्वरित खड्डय़ांचे काय असाही प्रश्न आह़े काही गावांमध्ये खड्डे खोदले किंवा कसे, याचीही माहिती घेण्याची गरज आह़े या खड्डय़ांचे जिओ टॅगिंग झाले किंवा कसे याचीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही़ येत्या महिनाभरानंतर वृक्षारोपण कार्यक्रमांचा समारोप होणार आह़े जिल्ह्यात सध्या महामार्ग विस्तारीकरणाची कामे सुरु आहेत़ यात महामार्ग प्राधिकरणने एकही झाड न लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़े