शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

जिल्ह्यातील ९ हजार स्त्रोतांचे पाणी पिण्यायोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:11 IST

पाणी प्रयोगशाळा : ३०० ठिकाणी होणार उपाययोजना

नंदुरबार : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या जिल्हा प्रयोगशाळेत संकलित केलले १० हजारपैकी साडेनऊ हजार पाणीनमुने तपासण्यात आले होते़ यातून जिल्ह्यातील ९७ टक्के स्त्रोतांचे पाणी हे पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे़ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी नमुने तपासणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे़जिल्ह्यातील पालिका आणि ग्रामपंचायतींच्या पाणी योजना, हातपंप, विहिरी, अधिग्रहीत विहिरी आणि कूपनलिका यांचे पिण्यायोग्य आहे किंवा कसे, याबाबतची चाचपणी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभागाकडून करण्यात येते़ यांतर्गत नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर आणि तळोदा येथील प्रयोगशाळेत मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर अशा दोन टप्प्यात पाणी नमुने संकलित करुन करुन त्यांची तपासणी केली होती़ तब्बल १० हजार अशा या नमुन्यांची चाचणी करुन त्यातील २९२ नमुने हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे दिला होता़ यानुसार जिल्हा परिषदेने उपाययोजना सुरु केल्याची माहिती आहे़पाणी तपासणीचा हा उपक्रम केवळ शासनापुरताच मर्यादित न ठेवता त्यात नागरिकांना सामावून घेण्यात आले आहे़ खाजगी कूपनलिका, पाणी व्यावसायिक, हॉटेल्स यासह इतर व्यावसायिक उपक्रमासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची तपासणी जिल्हा प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे़ यासाठी माफक असे शुल्क भरुन जलनमुन्याची पडताळणी होणार असल्याने पाण्याची स्थिती समजून येण्यास मदत होणार असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विभागाने दिले आहे़ भूजल सर्वेक्षण विभागाकडून २०१८-१९ या वर्षात मान्सूनपूर्व हंगामात एकूण ४ हजार ८६२ पाणी नमुन्यांची तपासणी केली होती़ यापैकी ४ हजार ७७१ नमुने हे योग्य तर ९१ नमुने हे पिण्यासाठी अयोग्य होते़ अक्कलकुवा तालुक्यातील १ हजार १४८, धडगाव १ हजार ७४, नंदुरबार ४११, नवापूर १ हजार ९५, शहादा ५७७ तर तळोदा तालुक्यातून ५५७ नमुने तपासण्यात आले होते़ यात अक्कलकुवा ७, नंदुरबार ४, नवापूर १२, शहादा ४४ तर तळोदा तालुक्यातील २४ जलस्त्रोतांचे पाणी पिण्यासाठी अयोग्य होते़ विशेष म्हणजे धडगाव तालुक्यातील सर्वच नमुने सकारात्मक होते़मान्सूननंतर प्रयोगशाळेत प्राप्त झालेल्या ५ हजार १३८ जलस्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती़ यात अक्कलकुवा १ हजार ९६, धडगाव १ हजार १, नंदुरबार ४९२, नवापूर १ हजार ३३३, शहादा ५४१ तर तळोदा तालुक्यातून ५६५ स्त्रोत पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले होते़ यात अक्कलकुवा १३, नंदुरबार ४९, नवापूर ३२, शहादा ७ तर तळोदा तालुक्यात सर्वाधिक ११० नमुने हे पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले होते़ पहिल्या हंगामात ९१ तर दुसऱ्या हंगामात २०१ असे एकूण २९२ जलस्त्रोत धोकेदायक आहेत़ विशेष म्हणजे धडगाव तालुक्यात एकही जलस्त्रोत दूषित नसल्याची माहिती देण्यात आली आहे़