शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

जिल्ह्यातील ९ हजार स्त्रोतांचे पाणी पिण्यायोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:11 IST

पाणी प्रयोगशाळा : ३०० ठिकाणी होणार उपाययोजना

नंदुरबार : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या जिल्हा प्रयोगशाळेत संकलित केलले १० हजारपैकी साडेनऊ हजार पाणीनमुने तपासण्यात आले होते़ यातून जिल्ह्यातील ९७ टक्के स्त्रोतांचे पाणी हे पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे़ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी नमुने तपासणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे़जिल्ह्यातील पालिका आणि ग्रामपंचायतींच्या पाणी योजना, हातपंप, विहिरी, अधिग्रहीत विहिरी आणि कूपनलिका यांचे पिण्यायोग्य आहे किंवा कसे, याबाबतची चाचपणी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभागाकडून करण्यात येते़ यांतर्गत नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर आणि तळोदा येथील प्रयोगशाळेत मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर अशा दोन टप्प्यात पाणी नमुने संकलित करुन करुन त्यांची तपासणी केली होती़ तब्बल १० हजार अशा या नमुन्यांची चाचणी करुन त्यातील २९२ नमुने हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे दिला होता़ यानुसार जिल्हा परिषदेने उपाययोजना सुरु केल्याची माहिती आहे़पाणी तपासणीचा हा उपक्रम केवळ शासनापुरताच मर्यादित न ठेवता त्यात नागरिकांना सामावून घेण्यात आले आहे़ खाजगी कूपनलिका, पाणी व्यावसायिक, हॉटेल्स यासह इतर व्यावसायिक उपक्रमासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची तपासणी जिल्हा प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे़ यासाठी माफक असे शुल्क भरुन जलनमुन्याची पडताळणी होणार असल्याने पाण्याची स्थिती समजून येण्यास मदत होणार असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विभागाने दिले आहे़ भूजल सर्वेक्षण विभागाकडून २०१८-१९ या वर्षात मान्सूनपूर्व हंगामात एकूण ४ हजार ८६२ पाणी नमुन्यांची तपासणी केली होती़ यापैकी ४ हजार ७७१ नमुने हे योग्य तर ९१ नमुने हे पिण्यासाठी अयोग्य होते़ अक्कलकुवा तालुक्यातील १ हजार १४८, धडगाव १ हजार ७४, नंदुरबार ४११, नवापूर १ हजार ९५, शहादा ५७७ तर तळोदा तालुक्यातून ५५७ नमुने तपासण्यात आले होते़ यात अक्कलकुवा ७, नंदुरबार ४, नवापूर १२, शहादा ४४ तर तळोदा तालुक्यातील २४ जलस्त्रोतांचे पाणी पिण्यासाठी अयोग्य होते़ विशेष म्हणजे धडगाव तालुक्यातील सर्वच नमुने सकारात्मक होते़मान्सूननंतर प्रयोगशाळेत प्राप्त झालेल्या ५ हजार १३८ जलस्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती़ यात अक्कलकुवा १ हजार ९६, धडगाव १ हजार १, नंदुरबार ४९२, नवापूर १ हजार ३३३, शहादा ५४१ तर तळोदा तालुक्यातून ५६५ स्त्रोत पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले होते़ यात अक्कलकुवा १३, नंदुरबार ४९, नवापूर ३२, शहादा ७ तर तळोदा तालुक्यात सर्वाधिक ११० नमुने हे पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले होते़ पहिल्या हंगामात ९१ तर दुसऱ्या हंगामात २०१ असे एकूण २९२ जलस्त्रोत धोकेदायक आहेत़ विशेष म्हणजे धडगाव तालुक्यात एकही जलस्त्रोत दूषित नसल्याची माहिती देण्यात आली आहे़