शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

मंदाणे परिसरात दुबार पेरणीची पिकेही धोक्यात, दुष्काळाचे सावट; शेतकरी चिंतेत, नदीनाल्यांसह विहिरी कोरड्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST

सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील पूर्वेकडील मंदाणे परिसरात जून, जुलै महिना संपला. ऑगस्ट सुरू होऊन दोन आठवडे ...

सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील पूर्वेकडील मंदाणे परिसरात जून, जुलै महिना संपला. ऑगस्ट सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संपूर्ण शहादा तालुक्यासह मंदाणे परिसरात अपेक्षित पाऊस नसताना शेतकऱ्यांनी आशेने पेरण्या केल्या होत्या. मात्र, नंतर वरुण राजाने दडी मारल्याने काही दिवसांपासून तर मे महिन्यासारखे ऊन पडत आहे. बदलत्या हवामानामुळे पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पावसाच्या हुलकावणीने खरीप पिके धोक्यात

शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने शेतात उगवलेली बाजरी, मूग, मकासह खरीप पिके वाचवण्यासाठी बळीराजा मेघराजाला विनवण्या करत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा वारंवार फटका सहन करणारा शेतकरी आता पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तरीही पावसाच्या आशेने बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

शहादा तालुक्यासह मंदाणे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागणार अशी वेळ या परिसरात तर निर्माण होणार नाही ना? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अगोदरच कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबर मोडले असून, दुसरीकडे महागाई आणि दुष्काळी परिस्थिती अशी स्थिती राहिल्यास जगणे कठीण होईल. एकीकडे कोरोनामुळे कामधंदा नाही. मजुरांना रोजगार नाही. मजूर कुठून पोटपाणी भरेल. त्यात महागाईने त्रस्त झालेला आहे. खतांच्या किमती व फवारणीसाठी लागणारे औषध, लागवडीसाठी लागणारे बियाणे आदींचे भाव शिगेला पोहोचले आहेत. यात बळीराजाला सावकारी कर्ज काढावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे सावकारी कर्जदेखील शेतकऱ्यास मिळणे कठीण झाले आहे.

बळीराजावर पुन्हा संकट

सुरुवातीला जून महिन्यात पाऊस पडलाच नाही. जुलै महिन्यात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारली. त्यामुळे पिके उगवलीच नाहीत. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली. दुबार पेरणी करूनही आता परत काही दिवसानंतर पावसाने दडी मारल्याने तालुक्यासह परिसरातील बागायती शेतकऱ्यांसह कोरडवाहू शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली आहे. मात्र, खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता अधिक दिसत आहे.

खतांची केली आहे घरात साठवणूक

सद्यपरिस्थितीत खते महाग होत असून, शेतकऱ्यांना ऐनवेळी पाहिजे तेव्हा खते मिळत नाहीत. दरवर्षीप्रमाणे यंदाही युरिया खताचा तुटवडा सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतकऱ्यांनी खतांच्या गोण्या घरात आणून ठेवल्या आहेत. खते शेतात टाकण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. कर्जबाजारी शेतकऱ्याला आता पुन्हा संकटाला सामोरे जावे लागणार आहे. एकीकडे कोरोना महामारीमुळे उपजीविका भागवणे कठीण झाले आहे. दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण झाली तर जगणे कठीण होईल, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.

गोमाई नदीचे पात्र कोरडेच

पावसाने अचानक दडी मारल्याने मध्यप्रदेशातून महाराष्ट्राकडे येणारी गोमाई नदी पावसाअभावी कोरडीच आहे. ही नदी मध्यप्रदेशातील पानसेमलकडून जावदे, ओझर्टा, भोरटेक, दामळदा, गोगापूर, भागापूर, लोणखेडा, शहादा आदी गावांशेजारी वाहून प्रकाशा येथे तापी नदीला मिळते. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले तरच याठिकाणच्या कूपनलिका व विहिरींना पाणी टिकून राहते अन्यथा भीषण पाणीटंचाई निर्माण होते. मागील कटू अनुभवावरून यावर्षी दमदार पावसाअभावी जमिनीतील पाणी पातळी घटेल, या भीतीने ऊस, केळी, पपई, मिरची, कापूस उत्पादक शेतकरी चिंतातूर झाले आहेत. सर्वत्र नदी-नाले, विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या ठणठणीत असल्याचे चित्र आहे. येत्या दोन-चार दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर भीषण दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे, हे नाकारता येणार नाही.