शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

‘विजयरथ’ची डबल हॅटट्रीक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 11:02 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बदललेल्या राजकीय समिकरणात ‘विजयरथ’ची घौडदौड कायम राखण्यात डॉ.विजयकुमार गावीत यांना यश ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बदललेल्या राजकीय समिकरणात ‘विजयरथ’ची घौडदौड कायम राखण्यात डॉ.विजयकुमार गावीत यांना यश आले. मतदारसंघात दुस:यांदा हॅटट्रीक करण्याचा मान त्यांना मिळाला. प्रचंड जनसंपर्क, केलेली विकास कामे आणि यंदा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मिळालेली साथ यामुळे उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान डॉ.गावीत यांना मिळाला. योगायोग म्हणजे लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ.हिना गावीत यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघात घेतलेला 70 हजारापेक्षा अधीकच लीड कायम राखला.  नंदुरबारची लढत तशी एकतर्फीच होती. परंतु उदेसिंग पाडवी यांनी ऐनवेळी केलेली एन्ट्री लढतीत टि¦स्ट निर्माण करून गेली. पाडवींना काहीतरी ‘करिश्मा’ होण्याची मोठी अपेक्षा होती. परंतु डॉ.विजयकुमार गावीत यांनी केलेली विकास कामे, जोडलेले कार्यकर्ते, कन्या खासदार डॉ.हिना गावीत यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे आणि कट्टर विरोधक असलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी युतीधर्माचे केलेले पालन यामुळे त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.  प्रबळ विरोधक नसल्याने..आमदार डॉ.गावीत हे जिल्ह्यातील प्रस्थापीत नेते आहेत. नंदुरबार मतदारसंघच नव्हे तर जिल्ह्यातील राजकारणावर त्यांची पकड आहे. असे असतांना त्यांना विधानसभा निवडणुकीत प्रबळ विरोधकच उरला नसल्याने त्यांचा विजय एकतर्फी राहिला. जर उदेसिंग पाडवी यांनी उमेदवारी केली नसती तर लाखाच्या फरकाने डॉ.गावीत यांचा विजय झाला असता यात कुणाचे दुमत होणार नाही.उदेसिंग पाडवींची चाचपणीउदेसिंग पाडवी यांना भाजपमध्ये स्थान राहिले नव्हते. अपक्ष लढण्यापेक्षा काँग्रेसमध्ये रघुवंशी यांची निर्माण झालेली पोकळी भरून निघावी आणि प्रस्थापीत पक्षात आपले असित्व राहावे या दुहेरी उद्दीष्टाने त्यांनी ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूकही लढविली. विशेष म्हणजे मतदारसंघात नवखे उमेदवार असतांना, मतदारसंघात कार्यकत्र्याची फळी नसतांना आणि प्रभावी प्रचार नसतांनाही त्यांनी 51 हजारापेक्षा अधीक मते घेणे ही बाब राजकीय दृष्टय़ा महत्त्वाची मानली जात आहे. डॉ.गावीत गटाला विरोधात गेलेली ही मते देखील दुर्लक्ष करून चालणार नाही हे देखील तेवढेच महत्त्वाचे. तापी पट्टय़ाची साथ कायमडॉ.विजयकुमार गावीत यांना यंदाही शहादा तालुका आणि नंदुरबार तालुक्यातील तापी पट्टय़ाने पुरेपूर साथ दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्या भागात त्यांचे वर्चस्व कायम आहे. नंदुरबार तालुक्यात रघुवंशी व त्यांच्यात विभागली गेलेली ताकद आता एकसंध राहणार असल्याने त्याचाही फायदा या दोन्ही नेत्यांना भविष्यातील राजकारणात होणार आहे. अर्थात यापूर्वीही या दोन नेत्यांचे ‘वेल्डींग’ झाले होते. परंतु ते फार काळ टिकले नाही. आता हे वेल्डींग कसे आणि किती पक्के राहते हे पहाणेही महत्त्वाचे ठरणार आहे.  अशी असेल राजकारणाची दिशानंदुरबार मतदारसंघातील विशेषत: नंदुरबार तालुक्यातील राजकारण आता बदलले दिसणार आहे. ज्यांना डॉ.गावीत व रघुवंशी यांची जवळीकता पसंत पडली नव्हती त्यांनाही आता जुळवून घ्यावे लागणार आहे. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सहमतीचे राजकारण होऊन त्यांचे उमेदवार निवडून येणार आहेत. गावागावातील राजकारण देखील यामुळे बदलले असणार आहे. परंतु ज्यांना दोन दुकाने पाहिजे, त्याशिवाय त्यांची किंमत राहत नाही अशा नेत्यांची मात्र आता गोची ठरणार आहे.