शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

विरचक धरणाचे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक प्रकल्प पहिल्यांदाच पुर्ण क्षमतेने भरला आहे. 239 मिटरपैकी 236.10 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक प्रकल्प पहिल्यांदाच पुर्ण क्षमतेने भरला आहे. 239 मिटरपैकी 236.10 मीटर्पयत पाणी पातळी आल्याने पाटबंधारे विभागाने 650 क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठय़ासाठी विरचक प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु हे धरण झाल्यापासून अद्याप एकदाही पुर्ण क्षमतेने भरलेले नाही. जास्तीत जास्त 72 टक्केर्पयत पाणीसाठा गेलेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. विरचक धरणाची पाणी पातळी क्षमता ही 239 मिटर्पयत आहे. त्यापैकी 236.10 मिटर पातळी सोमवारी दुपारी तीन वाजेर्पयत झाली होती. त्यामुळे पाटबंधारे विभागाने संभाव्य परिस्थिती लक्षात घेता धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. धरणातून टप्प्याटप्प्याने 650 क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा सायंकाळी सहा वाजता सुरू होणार होता. यामुळे शिवण नदीची पाणी पातळी वाढणार होती. नदी काठावरील विरचक, बिलाडी, खामगाव, सुंदर्दे, करणखेडा, बद्रीङिारा, नवातांडा, भवाली, धुळवद, व्याहूर या गावांच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दवंडी देखील दिली जात आहे.विरचक प्रकल्पाची निर्मिती साधारणत: 20 वर्षापूर्वी झाली आहे. तेंव्हापासून हे धरण पुर्ण क्षमतेने कधीच भरलेले नाही. एका वर्षी केवळ 72 टक्केर्पयत पाणीसाठा गेला होता. त्यानंतर कायम 55 टक्केच्या आतच पाणीसाठा राहिला आहे. गेल्यावर्षी केवळ 29 टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे पाण्याचे नियोजन करून यंदाच्या पावसाळ्यार्पयत पाणी पुरवावे लागले होते. दरम्यान, प्रकल्पातील तब्बल 650 क्यूसेक पाणी सोडण्यास नगरपालिकेने अर्थात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आक्षेप घेतला आहे. चार वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारे पाणी सोडून देण्यात आले होते. त्यानंतर पाऊस झाला नाही. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे  जावे लागले होते. त्यामुळे परिस्थिती पाहून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घ्यावा अशी अपेक्षा आमदार रघुवंशी यांनी केली आहे. दरम्यान, आंबेबारा धरण व खोलघर धरण पुर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ते पाणी शिवण नदीत येत असून या नदीला मिळणारे इतरही अनेक नाले वाहत असल्याने शिवणचा प्रवाह कायम आहे. त्यामुळे विरचक मधील पाणी पातळीत सतत वाढच होत राहणार आहे.  

नंदुरबार तालुक्यातील वसलाई सिंचन प्रकल्पातून दोन ठिकाणी झरे सुरू असल्यामुळे भिती व्यक्त करण्यात आली होती.परंतु प्रकल्पाचे जुने मातीकाम असल्याने पुर्ण क्षमतेने भरल्यावर असे झरे सुरू होतात. त्यामुळे भितीचे कारण नाही असे सूत्रांनी सांगितले. प्रकल्पाची पहाणी करून धोकेदायक स्थिती नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.