शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

विरचक धरणाचे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक प्रकल्प पहिल्यांदाच पुर्ण क्षमतेने भरला आहे. 239 मिटरपैकी 236.10 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक प्रकल्प पहिल्यांदाच पुर्ण क्षमतेने भरला आहे. 239 मिटरपैकी 236.10 मीटर्पयत पाणी पातळी आल्याने पाटबंधारे विभागाने 650 क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठय़ासाठी विरचक प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु हे धरण झाल्यापासून अद्याप एकदाही पुर्ण क्षमतेने भरलेले नाही. जास्तीत जास्त 72 टक्केर्पयत पाणीसाठा गेलेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. विरचक धरणाची पाणी पातळी क्षमता ही 239 मिटर्पयत आहे. त्यापैकी 236.10 मिटर पातळी सोमवारी दुपारी तीन वाजेर्पयत झाली होती. त्यामुळे पाटबंधारे विभागाने संभाव्य परिस्थिती लक्षात घेता धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. धरणातून टप्प्याटप्प्याने 650 क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा सायंकाळी सहा वाजता सुरू होणार होता. यामुळे शिवण नदीची पाणी पातळी वाढणार होती. नदी काठावरील विरचक, बिलाडी, खामगाव, सुंदर्दे, करणखेडा, बद्रीङिारा, नवातांडा, भवाली, धुळवद, व्याहूर या गावांच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दवंडी देखील दिली जात आहे.विरचक प्रकल्पाची निर्मिती साधारणत: 20 वर्षापूर्वी झाली आहे. तेंव्हापासून हे धरण पुर्ण क्षमतेने कधीच भरलेले नाही. एका वर्षी केवळ 72 टक्केर्पयत पाणीसाठा गेला होता. त्यानंतर कायम 55 टक्केच्या आतच पाणीसाठा राहिला आहे. गेल्यावर्षी केवळ 29 टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे पाण्याचे नियोजन करून यंदाच्या पावसाळ्यार्पयत पाणी पुरवावे लागले होते. दरम्यान, प्रकल्पातील तब्बल 650 क्यूसेक पाणी सोडण्यास नगरपालिकेने अर्थात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आक्षेप घेतला आहे. चार वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारे पाणी सोडून देण्यात आले होते. त्यानंतर पाऊस झाला नाही. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे  जावे लागले होते. त्यामुळे परिस्थिती पाहून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घ्यावा अशी अपेक्षा आमदार रघुवंशी यांनी केली आहे. दरम्यान, आंबेबारा धरण व खोलघर धरण पुर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ते पाणी शिवण नदीत येत असून या नदीला मिळणारे इतरही अनेक नाले वाहत असल्याने शिवणचा प्रवाह कायम आहे. त्यामुळे विरचक मधील पाणी पातळीत सतत वाढच होत राहणार आहे.  

नंदुरबार तालुक्यातील वसलाई सिंचन प्रकल्पातून दोन ठिकाणी झरे सुरू असल्यामुळे भिती व्यक्त करण्यात आली होती.परंतु प्रकल्पाचे जुने मातीकाम असल्याने पुर्ण क्षमतेने भरल्यावर असे झरे सुरू होतात. त्यामुळे भितीचे कारण नाही असे सूत्रांनी सांगितले. प्रकल्पाची पहाणी करून धोकेदायक स्थिती नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.