शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विरचक धरणाचे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक प्रकल्प पहिल्यांदाच पुर्ण क्षमतेने भरला आहे. 239 मिटरपैकी 236.10 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक प्रकल्प पहिल्यांदाच पुर्ण क्षमतेने भरला आहे. 239 मिटरपैकी 236.10 मीटर्पयत पाणी पातळी आल्याने पाटबंधारे विभागाने 650 क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठय़ासाठी विरचक प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु हे धरण झाल्यापासून अद्याप एकदाही पुर्ण क्षमतेने भरलेले नाही. जास्तीत जास्त 72 टक्केर्पयत पाणीसाठा गेलेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. विरचक धरणाची पाणी पातळी क्षमता ही 239 मिटर्पयत आहे. त्यापैकी 236.10 मिटर पातळी सोमवारी दुपारी तीन वाजेर्पयत झाली होती. त्यामुळे पाटबंधारे विभागाने संभाव्य परिस्थिती लक्षात घेता धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. धरणातून टप्प्याटप्प्याने 650 क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा सायंकाळी सहा वाजता सुरू होणार होता. यामुळे शिवण नदीची पाणी पातळी वाढणार होती. नदी काठावरील विरचक, बिलाडी, खामगाव, सुंदर्दे, करणखेडा, बद्रीङिारा, नवातांडा, भवाली, धुळवद, व्याहूर या गावांच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दवंडी देखील दिली जात आहे.विरचक प्रकल्पाची निर्मिती साधारणत: 20 वर्षापूर्वी झाली आहे. तेंव्हापासून हे धरण पुर्ण क्षमतेने कधीच भरलेले नाही. एका वर्षी केवळ 72 टक्केर्पयत पाणीसाठा गेला होता. त्यानंतर कायम 55 टक्केच्या आतच पाणीसाठा राहिला आहे. गेल्यावर्षी केवळ 29 टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे पाण्याचे नियोजन करून यंदाच्या पावसाळ्यार्पयत पाणी पुरवावे लागले होते. दरम्यान, प्रकल्पातील तब्बल 650 क्यूसेक पाणी सोडण्यास नगरपालिकेने अर्थात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आक्षेप घेतला आहे. चार वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारे पाणी सोडून देण्यात आले होते. त्यानंतर पाऊस झाला नाही. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे  जावे लागले होते. त्यामुळे परिस्थिती पाहून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घ्यावा अशी अपेक्षा आमदार रघुवंशी यांनी केली आहे. दरम्यान, आंबेबारा धरण व खोलघर धरण पुर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ते पाणी शिवण नदीत येत असून या नदीला मिळणारे इतरही अनेक नाले वाहत असल्याने शिवणचा प्रवाह कायम आहे. त्यामुळे विरचक मधील पाणी पातळीत सतत वाढच होत राहणार आहे.  

नंदुरबार तालुक्यातील वसलाई सिंचन प्रकल्पातून दोन ठिकाणी झरे सुरू असल्यामुळे भिती व्यक्त करण्यात आली होती.परंतु प्रकल्पाचे जुने मातीकाम असल्याने पुर्ण क्षमतेने भरल्यावर असे झरे सुरू होतात. त्यामुळे भितीचे कारण नाही असे सूत्रांनी सांगितले. प्रकल्पाची पहाणी करून धोकेदायक स्थिती नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.