शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

पक्षापेक्षा कुणीही स्वत:ला मोठे समजू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परिवार संवाद यात्रेनिमित्त जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघाचा आढावा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परिवार संवाद यात्रेनिमित्त जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. तयारी कशी करून यायची याचेही कानमंत्र त्यांनी दिले. दरम्यान, परिवार संवाद मेळाव्यात बोलतांना त्यांनी पक्षापेक्षा कुणी स्वत:ला मोठा समजत असेल तर त्याला पक्षाचा रामराम राहील असे सुनवत गटबाजी करणाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला मारला. राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील हे सोमवारी नंदुरबारात आले होते. दुपारी तीन वाजता त्यांनी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेत मार्गदर्शन केले. त्याआधी त्यांनी नंदुरबार, तळोदा-शहादा, नवापूर व अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांना विविध बाबींची माहिती विचारली, काही पदाधिकारी यांना त्याची माहिती होती तर काही जण सांगतांना अडखळले. त्यामुळे त्यांनी पदाधिकारी यांना विविध टिप्स दिल्या. पक्षाचे संघटनात्मक काम करतांना कुठले मुद्दे आणि कशावर काम केले पाहिजे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा. पक्ष सत्तेत असल्यामुळे सर्वसामान्यांची जास्तीत जास्त कामे करा. पद मिळाले म्हणजे आपण मोठे झालो असे समजू नका? नेहमीच कार्यकर्ता म्हणूनच काम केले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केेले. शिवसेना, कॅांग्रेस सोबत आपण सत्तेत आहोत हे देखील नेहमीच लक्षात असू द्या असे त्यांनी सांगितले. सर्वच मतदार संघात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वत:ला मोठे समजू नका...विधानसभानिहाय आढावा घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुरज चव्हाण, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत वरपे, सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॅा.अभिजीत मोरे,    महिला आघाडीच्या हेमलता शितोळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे म्हणने ऐकुण घेतले. सहा जणांनी आपले म्हणने मांडले. त्यानंतर बोलतांना जयंत पाटील यांनी पक्षात गटबाजीला थारा नको, प्रत्येकाने आपला पक्ष म्हणून काम करावे. पक्षापेक्षा कुणी मोठे होत असेल, तसे समजत असेल तर त्यांना पक्षात जास्त दिवस थांबता येणार नाही. त्यांनी राम राम घेतला तरी चालेल असेही त्यांनी सांगितले. पक्ष वाढीसाठी प्रत्येकाने वेळ द्यावा. प्रत्येक सेलची कार्यकारिणी गठीत करतांना सर्वसामावेशक अशी करावी. मेळावे, बैठका यांना प्रत्येकाने उपस्थित राहावे. वरिष्ठांच्या सुचनांचे पालन करावे असे सांगून बूथ लेव्हलला काम करावे. संघटनात्मक काम करतांना सुक्ष्म नियोजन करूनच काम करावे असे आवाहन त्यांनी केले. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही मार्गदर्शन केेले. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष डॅा.अभिजीत मोरे यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या संघटनात्मक कामाची माहिती सादर केली व पक्ष वाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 

प्रदेशाध्यक्षांनी साधला आदिवासी भाषेत संवाद... परिवार संवाद यात्रेनिमित्त सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यातून कार्यकर्ते आले होते. त्यातील काहींना भाषेची अडचण येत होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भिलोरी भाषेत त्यांच्याशी काही काळ संवाद साधला. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनाही हायसे वाटले. जिल्हाभरातील पुरुष व महिला कार्यकर्तींसह युवक वर्गही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता. दुपारी १ वाजेपासून कार्यकर्ते येथे दाखल झाले होते. प्रत्यक्षात तीन वाजता कार्यक्रम सुरू झाला.