शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९ टक्के; निकाला मुलींची १०० टक्के आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:24 IST

नंदुरबार : राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळाकडून शुक्रवारी दहावीच्या वर्गाचा निकाल जाहीर झाला. ...

नंदुरबार : राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळाकडून शुक्रवारी दहावीच्या वर्गाचा निकाल जाहीर झाला. यात नंदुरबार जिल्ह्याने नाशिक विभागातून प्रथम येण्याचा मान पटकावला असून जिल्ह्याचा निकाल हा ९९.९९ टक्के लागला आहे. परंतु जाहीर झालेला निकाल दुपारपर्यंत ऑनलाइन दिसतच नसल्याने विद्यार्थी आणि पालक यांच्या आनंदावर विरजण पडले होते.

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा न घेत मूल्यमापन पद्धतीने विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २१ हजार ७५ विद्यार्थ्यांच्या नववीच्या वर्गातील गुणांची मापन करत सराव परीक्षा, चाचण्या तसेच प्रात्यक्षिक परीक्षा यांची माहिती बोर्डाकडे पाठवण्यात आली होती. यानुसार शुक्रवारी निकाल जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्याने धुळे व जळगावला मागे टाकत विभागातून प्रथम येण्याचा मान मिळवला होता. जिल्ह्यातील ३६२ शाळांमधील विद्यार्थ्यांचा हा निकाल असून गेल्या चार वर्षातील सर्वोच्च निकाल असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. बोर्डाने ऑनलाइन आकडेवारी जाहीर केल्यानंतर येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निकाल हाती देण्यात येणार आहे.

मुलींची बाजी

यंदाच्या निकालात मुलींनी १०० टक्केे यश मिळवले आहे. परीक्षेत ९ हजार ७४८ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. या सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

तर दुसरीकडे प्रविष्ट असलेल्या ११ हजार ३२७ पैकी ११ हजार ३२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नोंदणी केलेले केवळ दोन विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत.

दुपारी निकाल जाहीर करणाऱ्या बोर्डाकडून देण्यात आलेल्या संकेतस्थळांवर एकाचवेळी असंख्य हिट्स मिळत असल्याने वेबसाईट क्रॅश झाली. यातून सायंकाळपर्यंत अनेकांना निकालच पाहता आला नव्हता. मोबाइल ॲपमध्ये क्रमांक टाकल्यानंतरही बराचवेळ निकाल येत नसल्याने अनेकांनी प्रयत्न करणे सोडून दिले होते.

ग्रामीण भागात निकालाची सर्वाधिक उत्सुकता होती. परंतु विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासच मिळत नसल्याने त्यांचा हिरमोड झाला होता.

यंदाच्या निकालात जिल्ह्याची बऱ्यापैकी प्रगती झाली आहे. यात यंदा विशेष प्रावीण्यासह ६ हजार ३२९, प्रथम श्रेणीत १३ हजार १२१, द्वितीय श्रेणीत ९ हजार ५८२ तर पास श्रेणीत यंदा केवळ २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळांकडून दुसरी लाट येण्यापूर्वी घेण्यात आलेले सराव पेपर व चाचण्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. यानुसार शाळांनी बोर्डाकडे माहिती दिली होती. शिक्षक शाळा बंद असताना ऑनलाइन माध्यमातून वर्ग घेत होते.

जिल्ह्यात २०१७ या वर्षात जिल्ह्याचा निकाल हा ८६.३८ टक्केे लागला होता. २०१८ या वर्षात जिल्ह्याचा निकाल हा ८० टक्के होता. २०१९ या वर्षात निकालाची टक्केवारी ०खालावून ७७ टक्के झाली होती.

२०२० या वर्षात कोरोनाने शिरकाव केल्याने परीक्षा आटोपत्या घ्याव्या लागल्या होत्या. यातून १८ हजार ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ८८.१४ टक्के होता.