शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९ टक्के; निकाला मुलींची १०० टक्के आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:24 IST

नंदुरबार : राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळाकडून शुक्रवारी दहावीच्या वर्गाचा निकाल जाहीर झाला. ...

नंदुरबार : राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळाकडून शुक्रवारी दहावीच्या वर्गाचा निकाल जाहीर झाला. यात नंदुरबार जिल्ह्याने नाशिक विभागातून प्रथम येण्याचा मान पटकावला असून जिल्ह्याचा निकाल हा ९९.९९ टक्के लागला आहे. परंतु जाहीर झालेला निकाल दुपारपर्यंत ऑनलाइन दिसतच नसल्याने विद्यार्थी आणि पालक यांच्या आनंदावर विरजण पडले होते.

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा न घेत मूल्यमापन पद्धतीने विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २१ हजार ७५ विद्यार्थ्यांच्या नववीच्या वर्गातील गुणांची मापन करत सराव परीक्षा, चाचण्या तसेच प्रात्यक्षिक परीक्षा यांची माहिती बोर्डाकडे पाठवण्यात आली होती. यानुसार शुक्रवारी निकाल जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्याने धुळे व जळगावला मागे टाकत विभागातून प्रथम येण्याचा मान मिळवला होता. जिल्ह्यातील ३६२ शाळांमधील विद्यार्थ्यांचा हा निकाल असून गेल्या चार वर्षातील सर्वोच्च निकाल असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. बोर्डाने ऑनलाइन आकडेवारी जाहीर केल्यानंतर येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निकाल हाती देण्यात येणार आहे.

मुलींची बाजी

यंदाच्या निकालात मुलींनी १०० टक्केे यश मिळवले आहे. परीक्षेत ९ हजार ७४८ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. या सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

तर दुसरीकडे प्रविष्ट असलेल्या ११ हजार ३२७ पैकी ११ हजार ३२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नोंदणी केलेले केवळ दोन विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत.

दुपारी निकाल जाहीर करणाऱ्या बोर्डाकडून देण्यात आलेल्या संकेतस्थळांवर एकाचवेळी असंख्य हिट्स मिळत असल्याने वेबसाईट क्रॅश झाली. यातून सायंकाळपर्यंत अनेकांना निकालच पाहता आला नव्हता. मोबाइल ॲपमध्ये क्रमांक टाकल्यानंतरही बराचवेळ निकाल येत नसल्याने अनेकांनी प्रयत्न करणे सोडून दिले होते.

ग्रामीण भागात निकालाची सर्वाधिक उत्सुकता होती. परंतु विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासच मिळत नसल्याने त्यांचा हिरमोड झाला होता.

यंदाच्या निकालात जिल्ह्याची बऱ्यापैकी प्रगती झाली आहे. यात यंदा विशेष प्रावीण्यासह ६ हजार ३२९, प्रथम श्रेणीत १३ हजार १२१, द्वितीय श्रेणीत ९ हजार ५८२ तर पास श्रेणीत यंदा केवळ २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळांकडून दुसरी लाट येण्यापूर्वी घेण्यात आलेले सराव पेपर व चाचण्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. यानुसार शाळांनी बोर्डाकडे माहिती दिली होती. शिक्षक शाळा बंद असताना ऑनलाइन माध्यमातून वर्ग घेत होते.

जिल्ह्यात २०१७ या वर्षात जिल्ह्याचा निकाल हा ८६.३८ टक्केे लागला होता. २०१८ या वर्षात जिल्ह्याचा निकाल हा ८० टक्के होता. २०१९ या वर्षात निकालाची टक्केवारी ०खालावून ७७ टक्के झाली होती.

२०२० या वर्षात कोरोनाने शिरकाव केल्याने परीक्षा आटोपत्या घ्याव्या लागल्या होत्या. यातून १८ हजार ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ८८.१४ टक्के होता.