शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नवापुरात चिकन व अंडी विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश , २२ पोल्ट्री केल्या सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST

नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यू संकट गडद झाल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन भोपाल येथुन रिपोर्ट आल्यानंतरच बर्ड फ्ल्यू ...

नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यू संकट गडद झाल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन भोपाल येथुन रिपोर्ट आल्यानंतरच बर्ड फ्ल्यू आहे की नाही हे स्पष्ट करणार आहे. शहरात चिकन व अंडी विक्रीवर बंदी केल्याने व्यावसायिकांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली रिपोर्ट आला नाही तर बंदी कशी असा सवाल उपस्थित केला.

नवापूर शहरातील २६ पोल्ट्रीमध्ये दररोज कोंबड्याच्या मरण्याचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. त्या अनुषंगाने आज नवापूर शहरातील डायमंड, परवेज पठाण, व्होरा पोल्ट्री फॉर्म मध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रांत अधिकारी वसुमना पंत, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यादरम्यान व्यवसायिकांना काही उपाय योजना संदर्भात सूचना केल्या आहेत. शहरातील सर्व पोल्ट्री फार्म सील करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्या अनुषंगाने महसूल, पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. यादरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी व्होरा पोल्ट्री फार्म येथे सर्व कागदपत्रांची पाहणी केली व पोल्ट्री व्यवसायिकांना काही उपयोजनात्मक सूचना केल्या आहेत. नवापुर तालुक्यातील ११ पक्ष्यांचे नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. त्यानंतर तेथून भोपाल येथे अहवाल पाठवण्यात येईल. बर्ड फ्लू आहे की नाही हे भोपालचा अहवाल आल्यानंतरच जाहीर करण्यात येणार आहे. तोपर्यंत शहरातील पोल्ट्री फार्म, पोल्ट्री व्यावसायिक, स्थानिक अधिकारी, पशुसंवर्धन, महसूल, पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कशा पद्धतीने उपाययोजना करण्यात येईल यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली.

नाशिक विभागातील पशुसंवर्धन विभागाचे पथक नवापूर शहरात दाखल झाले आहे. त्यांची निवासाची व्यवस्था नवापूर सीमा तपासणी नाक्यावर करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात प्रशासनाची हालचल सुरू झाल्याने पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

नवापूर तालुक्यातील एकूण २८ पोल्ट्री फार्म असून २६ पोल्ट्री मध्ये एकूण ९ लाख ४ हजार ४९८ कुकुट पक्षी आहेत. आज दिवसभरात ३६६४ पक्षी मेली आहे