शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

खेडदिगर येथे लस घेणाऱ्यास ग्रामपंचायतमार्फत आंब्याचे रोप वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST

ग्रामीण भागात लसीकरण खूप कमी प्रमाणात होत आहे. मात्र आपल्याला कोरोनाला हरवायचे असेल तर लसीकरण हा महत्त्वाचा घटक आहे. ...

ग्रामीण भागात लसीकरण खूप कमी प्रमाणात होत आहे. मात्र आपल्याला कोरोनाला हरवायचे असेल तर लसीकरण हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण ग्रामीण भागात झाले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून. मात्र ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरविण्यात आल्याने लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ग्रामीण भागात १०० टक्के लसीकरण व्हावे व आदिवासी नागरिकांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे. यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी विशेष उपक्रम राबविला आहे लसीकरण करून घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला दोन किलो तांदूळ, दोन किलो साखर स्वखर्चातून वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच खेडदिगर मंजुळाबाई मुसळदे, उपसरपंच गणेश बागुल, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण, गोविंद पटले, प्रवीण वळवी, भाजपा मोर्चा उपाध्यक्ष दंगल सोनवणे, प्रियांक पाटील, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष योगेश पाटील, बालू पाटील, रमाशंकर माळी, गुड्डू वळवी, दिलवर पवार, संतोष चित्ते, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पवार, गोपाळ गांगुर्डे, स्वीय सहायक हेमराज पवार, नवनाथ वाघ, गणेश पवार, दुर्गेश पाटील, सुकलाल रावताळे, ग्रामसेवक अरुण गवळे, जिल्हा परिषद मराठी शाळाचे मुख्याध्यपक महेंद्र निकुम, विकार अहमद शेख, तुकाराम धनगर, शकील पठाण, रेहमल पावरा उपस्थित होते.

आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदकुमार सुरसे, औषध निर्माण अधिकारी राजेंद्र पाटील, आरोग्य सेवक प्रमोद सूर्यवंशी, सीमा पाठक रवींद्र पावरा, संगीता ठाकरे, आशा कार्यकर्ती पार्वती बागले, मनीषा चौधरी यांनी लसीकरण केले.

ग्रामपंचायतमार्फत आंब्याचे रोप वाटप

ऑक्सिजनचे महत्त्व समोर ठेवून जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण झाले पाहिजे. या अनुषंगाने खेड दिगर येथे झालेल्या कोविड लसीकरण शिबिरात उपस्थित लस घेणाऱ्यांना ग्रामपंचायतमार्फत आंब्याचे रोप वाटप करण्यात आले.