शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

खाद्यपदार्थात भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST

कोरोना कालावधी कोरोना संक्रमणाच्या दीड वर्षाच्या कालावधीपैकी बराचसा कालावधी संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती होती. या कालावधीत तेव्हाच जीवनावश्यक ...

कोरोना कालावधी

कोरोना संक्रमणाच्या दीड वर्षाच्या कालावधीपैकी बराचसा कालावधी संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती होती. या कालावधीत तेव्हाच जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची परवानगी शासनाने दिली होती. याच कालावधीत खुल्या बाजारात विविध खाद्य पदार्थांसाठी नागरिकांची मागणी मोठ्या प्रमाणात होती तर त्या वस्तुंचा पुरवठा कमी प्रमाणात होता. अशा परिस्थितीत काही ठिकाणी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी भेसळखोरांवर कारवाई करण्यासाठी शासनाचा अन्न प्रशासन विभाग देखरेख ठेवतो. या विभागामार्फत वेळोवेळी बाजारातील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. तपासणी अहवाल आल्यानंतर भेसळखोरांवर कारवाई केली जाते; मात्र नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती होऊन २४ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी अन्न प्रशासन विभागाचे स्वतंत्र कार्यालय अस्तित्वात नाही. पूर्णवेळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती नाही. परिणामी, भेसळखोरांवर कायद्याचा कुठलाही धाक नसल्याने जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्य पदार्थांची विक्री खुलेआम होत आहे.

खरेदी करताना घ्यावयाची काळजी

सर्वांनी आय.एस.आय. मार्क किंवा एगमार्क असलेले पदार्थ खरेदी करावेत. अन्न भेसळ ओळखण्याच्या विविध पद्धतीचे ज्ञान अवगत करणे व अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याची माहिती करून त्यावर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. खाद्यपदार्थांमधील भेसळीचा परिणाम आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने खरेदी करताना सर्व नागरिकांमध्ये अन्नभेसळीबद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे. अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा प्रत्येक व्यक्तीपर्यंत व महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यासाठी लोकचळवळ निर्माण करणे काळाची गरज आहे. कायदा व कायद्याच्या पळवाटा यामुळे अन्नभेसळ करणाऱ्यास सोडून देण्याची प्रवृत्ती यामुळे भेसळखोरांना मोकळे रान मिळते. परिणामी, कायदा असतानाही त्याचा धाक त्यांच्यावर राहत नाही.

सणासुदीच्या काळात

सण- उत्सवांच्या काळात बाजारात विविध खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने भेसळीची शक्यता सर्वाधिक असते. भेसळयुक्त खाद्य पदार्थांमुळे तसेच अन्न भेसळीचा मानवी आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होत असल्याने दृष्टी कमजोर होणे, दात तुटणे, त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे, हाडे कमजोर होणे, लिव्हर, किडणी खराब होणे, आतड्यावर सुज येणे अशा सारखे आजार होऊन मानवी आयुष्याची हानी होते. अखाद्य रंगाच्या वापरामुळे जुलाब, उलट्या होऊ शकते, पचनसंस्थेचे विकार होणे, खनिज पदार्थाच्या सेवनाने आतड्यांचे रोग होणे, अशा विविध व्याधी होत असल्याने सणासुदीच्या काळात विशेष खबरदारी बाळगली पाहिजे.