शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थात भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST

कोरोना कालावधी कोरोना संक्रमणाच्या दीड वर्षाच्या कालावधीपैकी बराचसा कालावधी संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती होती. या कालावधीत तेव्हाच जीवनावश्यक ...

कोरोना कालावधी

कोरोना संक्रमणाच्या दीड वर्षाच्या कालावधीपैकी बराचसा कालावधी संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती होती. या कालावधीत तेव्हाच जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची परवानगी शासनाने दिली होती. याच कालावधीत खुल्या बाजारात विविध खाद्य पदार्थांसाठी नागरिकांची मागणी मोठ्या प्रमाणात होती तर त्या वस्तुंचा पुरवठा कमी प्रमाणात होता. अशा परिस्थितीत काही ठिकाणी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी भेसळखोरांवर कारवाई करण्यासाठी शासनाचा अन्न प्रशासन विभाग देखरेख ठेवतो. या विभागामार्फत वेळोवेळी बाजारातील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. तपासणी अहवाल आल्यानंतर भेसळखोरांवर कारवाई केली जाते; मात्र नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती होऊन २४ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी अन्न प्रशासन विभागाचे स्वतंत्र कार्यालय अस्तित्वात नाही. पूर्णवेळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती नाही. परिणामी, भेसळखोरांवर कायद्याचा कुठलाही धाक नसल्याने जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्य पदार्थांची विक्री खुलेआम होत आहे.

खरेदी करताना घ्यावयाची काळजी

सर्वांनी आय.एस.आय. मार्क किंवा एगमार्क असलेले पदार्थ खरेदी करावेत. अन्न भेसळ ओळखण्याच्या विविध पद्धतीचे ज्ञान अवगत करणे व अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याची माहिती करून त्यावर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. खाद्यपदार्थांमधील भेसळीचा परिणाम आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने खरेदी करताना सर्व नागरिकांमध्ये अन्नभेसळीबद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे. अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा प्रत्येक व्यक्तीपर्यंत व महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यासाठी लोकचळवळ निर्माण करणे काळाची गरज आहे. कायदा व कायद्याच्या पळवाटा यामुळे अन्नभेसळ करणाऱ्यास सोडून देण्याची प्रवृत्ती यामुळे भेसळखोरांना मोकळे रान मिळते. परिणामी, कायदा असतानाही त्याचा धाक त्यांच्यावर राहत नाही.

सणासुदीच्या काळात

सण- उत्सवांच्या काळात बाजारात विविध खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने भेसळीची शक्यता सर्वाधिक असते. भेसळयुक्त खाद्य पदार्थांमुळे तसेच अन्न भेसळीचा मानवी आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होत असल्याने दृष्टी कमजोर होणे, दात तुटणे, त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे, हाडे कमजोर होणे, लिव्हर, किडणी खराब होणे, आतड्यावर सुज येणे अशा सारखे आजार होऊन मानवी आयुष्याची हानी होते. अखाद्य रंगाच्या वापरामुळे जुलाब, उलट्या होऊ शकते, पचनसंस्थेचे विकार होणे, खनिज पदार्थाच्या सेवनाने आतड्यांचे रोग होणे, अशा विविध व्याधी होत असल्याने सणासुदीच्या काळात विशेष खबरदारी बाळगली पाहिजे.