शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

ग्रामस्वच्छता अभियानाचे उडाले धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:22 IST

ब्राह्मणपुरी : राज्य शासनाकडून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यात स्वच्छता अभियानाचा ...

ब्राह्मणपुरी : राज्य शासनाकडून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यात स्वच्छता अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात १०० टक्के शौचालय बांधकाम करून तालुका हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी गावागावांत जनजागृती करून जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. यामुळे बऱ्याच प्रमाणात हगणदारीमुक्त अभियानाला यश मिळाल्याचे दिसत होते; परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे या अभियानाकडे प्रशासनाने पाठ फिरविल्याने तालुक्यात हगणदारीमुक्तीसह स्वच्छतेचा फज्जा उडाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. शासनाने अनेकवेळा ‘स्वच्छतेकडून सुरक्षितते’कडे असे घोषवाक्य देऊन गावे किती स्वच्छ केली. परंतु जी गावे स्वच्छ व हगणदारीमुक्त झालेली आहेत त्या गावांतील परिस्थिती सध्या विदारक असून, हीच का ती स्वच्छ व हगणदारीमुक्त गावे, असाही प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अनेक गावांत शौचालय निर्माण झाले खरे, परंतु त्याचा वापरही योग्य पद्धतीने होत नसून, नागरिक उघड्यावर शौचास जाण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

अनेक गावांत अभियान नावापुरतेच

अनेक गावांमध्ये हे अभियान केवळ नावापुरतेच राबविले जात असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागात गावामध्ये प्रवेश करताक्षणीच अस्वच्छतेचे दर्शन होते. ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही माहिती आहे, असे असताना तेसुद्धा याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. स्वच्छता अभियानात प्रशासनासह नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी प्रशासनाकडून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. यावेळी ग्रामपंचायत प्रशासन, पदाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामस्थांनीही आपल्या जबाबदारीचे भान ठेवून वागल्यास गावात स्वच्छता राहून विविध आजारांना दूर ठेवता येऊ शकते.