शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
4
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
5
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
6
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
7
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
8
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
9
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
10
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
11
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
12
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
13
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
14
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
15
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
16
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
17
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
18
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
19
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
20
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!

लक्कडकोट वसाहती शेजारीच धरण असूनही रहिवाशांचा घसा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST

तळोदा तालुक्यातील लक्कडकोट गावातील काही रहिवाशांनी गावात जागे अभावी काही वर्षांपूर्वी शेतातच घरे बांधली होती. मात्र कालांतराने तेथून त्यांनी ...

तळोदा तालुक्यातील लक्कडकोट गावातील काही रहिवाशांनी गावात जागे अभावी काही वर्षांपूर्वी शेतातच घरे बांधली होती. मात्र कालांतराने तेथून त्यांनी जवळच असलेल्या धरणा जवळील सपाटीवर असलेल्या जागेवर कच्ची घरे बांधली. जवळपास सात ते आठ वर्षे झालीत. सदर वसाहत खर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीत येते. त्यामुळे पंचायतीत त्यांना ठिक ठिकाणी चार हात पंप बसवून दिले आहेत. तथापि तेथील पाण्याची पातळी २०० फुटांपेक्षा अधिक खोलवर गेल्याने त्यातील दोन हातपंप निकामी ठरले आहेत. साहजिकच रहिवाशांना दोन हात पंपांचा सहारा घ्यावा लागत आहे. त्यातही एक जेमतेमच चालत असतो. त्यामुळे एकावरच भार चालू आहे. तोही वसाहती पासून ८०० मिटर लांब अंतरावर आहे. तेथूनच गावकऱ्यांना पायपीट करत पाणी आणावे लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखवली आहे.

याशिवाय शेत शिवारातील कृषी पंपावर पाणी आणण्यासाठी जावे लागत असल्याचे गावकरी सांगतात. संपूर्ण दिवस पाणी आणण्यासाठी जात असल्याने मोल मजुरीस देखील जाता येत नाही. आधीच गावात विजेची सुविधा नाही. त्यामुळे गावात नळ पाणीपुरवठ्याची सुविधा नाही. साहजिकच हात पंपाशिवाय आम्हाला पर्याय नाही. ग्राम पंचायतीने तातडीने निदान एक-दोन हातपंप बसवून पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

गावठाणचा प्रस्तावही प्रलंबितच

या नवीन वसाहतीच्या ठिकाणी गावठाण व्हावे यासाठी ग्रामस्थांनी शासनास प्रस्ताव दाखल केला आहे. परंतु त्यावर अजूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी गावकऱ्यांना वीज, रस्ते, पाणी, शिक्षण या सारख्या मूलभूत सुविधांपासून स्वातंत्र्याचा ७३ वर्षानंतरही वंचितच राहावे लागत आहे. वसाहतीत ३०० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. तरीही महसूल गाव तर सोडा साधे गावठाण देखील मंजूर केले जात नाही. याबाबत गावकऱ्यांनी खेद व्यक्त केला आहे. अगदी लोकप्रतिनिधीही निवडणुकीच्या वेळी येवून गेले होते. त्यांनी तातडीने नागरी सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते अद्याप हवेतच विरले आहे. त्यांनीही साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या वसाहतीत चार हातपंप बसविले असून, त्यातील दोघांची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने बंद आहेत. इतर दोघांना चांगले पाणी आहे. तरीही एक हातपंप बसविण्याचे नियोजन आहे. लवकरच त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. - बी.के. नाईक, ग्रामसेवक, खर्डी बुद्रुक ग्रामपंचायत.

३०० लोकवस्तीसाठी केवळ चार हातपंप आहेत. यातील दोन्ही हात पंप पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे निकामी झाली आहेत. जेमतेम दोन सुरू आहेत. त्यातील एक वसाहती पासून ७०० मिटर लांब आहे. त्यावरच गर्दी होत असते. हंडाभर पाणी आणण्यासाठी अर्धा तास लागतो. त्यामुळे पाण्याचा अतोनात त्रास असून, पाण्याची सोय करून मिळावी. - सुनीता लालासिंग पाडवी, ग्रामस्थ, नवीन वसाहत, लक्कडकोट