शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

लघुसिंचन प्रकल्पात साचलेला गाळ काढण्याचे काम हाती घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाच्या परवानगीने सिंचन प्रकल्पातील गाळ स्वखर्चाने काढला होता. यंदा अशी परवानगी देण्यात न आल्यामुळे ...

गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाच्या परवानगीने सिंचन प्रकल्पातील गाळ स्वखर्चाने काढला होता. यंदा अशी परवानगी देण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव त्याकडे दुर्लक्ष करावे लागल्याचे काहींनी सांगितले. वास्तविक दरवषी शेतकरी धरण अथवा तलावातील गाळ काढून आपल्या शेतात टाकायचे नियोजन करीत असतात. मात्र याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घातले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजनदेखील कोलमडले. वास्तविक पाचही प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याचा पुरेसा साठा होण्याबाबत शेतकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. कारण गाळामुळे प्रकल्पांची खोलीच कमी झाली आहे. पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही तर आतापासूनच शेतकऱ्यांना रब्बीची चिंता निर्माण झाली आहे. यंदा तर हवामान विभागाने शंभर टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. मात्र यंत्रणांच्या उदासीन भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त केली आहे. निदान पूर्ण क्षमतेने पावसाळा सुरू होण्यास अजून, आठ-१० दिवसांच्या कालावधी शिल्लक आहे. तेव्हा दोन्ही यंत्रणांनी युद्ध पातळीवर प्रकल्पांमधील गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

यंदाही दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष

तालुक्यातील चारही लघुसिंचन प्रकल्प जुने झाले आहेत. त्यामुळे त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. कुठे सांडवे ना मोठमोठे तडे गेले आहेत तर कुठे भराव खचले आहेत. त्यामुळे सर्वांनाच गळती लागली आहे. थेट उन्हाळ्याच्या आधी म्हणजे मार्च महिन्याचा शेवटपर्यंत गळती लागली होती. अक्षरशः प्रचंड पाणी वाया जात होते. पाण्याच्या गळतीमुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले होते, अशी वस्तुस्थिती असताना सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणा नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दरवर्षी यंत्रणा केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीच करत नाही. त्यामुळे यंदाही प्रकल्पांची डागडुजी अथवा दुरुस्ती रखडली आहे.

लघुसिंचन प्रकल्पाचा गाळ काढणे अथवा दुरुस्ती करण्याबाबत संबंधित विभाग गांभीर्याने लक्ष घालत नाही. आम्ही शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यात मागणी करीत असतो. केवळ पोकळ आश्वासन दिले जात असते. गळतीमुळे तर माझे नेहमीच नुकसान होत असते. मात्र मुकाट्याने सहन करावे लागत आहे. - भानुदास मराठे, शेतकरी, रांझणी, ता. तळोदा.