शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

लघुसिंचन प्रकल्पात साचलेला गाळ काढण्याचे काम हाती घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाच्या परवानगीने सिंचन प्रकल्पातील गाळ स्वखर्चाने काढला होता. यंदा अशी परवानगी देण्यात न आल्यामुळे ...

गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाच्या परवानगीने सिंचन प्रकल्पातील गाळ स्वखर्चाने काढला होता. यंदा अशी परवानगी देण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव त्याकडे दुर्लक्ष करावे लागल्याचे काहींनी सांगितले. वास्तविक दरवषी शेतकरी धरण अथवा तलावातील गाळ काढून आपल्या शेतात टाकायचे नियोजन करीत असतात. मात्र याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घातले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजनदेखील कोलमडले. वास्तविक पाचही प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याचा पुरेसा साठा होण्याबाबत शेतकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. कारण गाळामुळे प्रकल्पांची खोलीच कमी झाली आहे. पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही तर आतापासूनच शेतकऱ्यांना रब्बीची चिंता निर्माण झाली आहे. यंदा तर हवामान विभागाने शंभर टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. मात्र यंत्रणांच्या उदासीन भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त केली आहे. निदान पूर्ण क्षमतेने पावसाळा सुरू होण्यास अजून, आठ-१० दिवसांच्या कालावधी शिल्लक आहे. तेव्हा दोन्ही यंत्रणांनी युद्ध पातळीवर प्रकल्पांमधील गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

यंदाही दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष

तालुक्यातील चारही लघुसिंचन प्रकल्प जुने झाले आहेत. त्यामुळे त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. कुठे सांडवे ना मोठमोठे तडे गेले आहेत तर कुठे भराव खचले आहेत. त्यामुळे सर्वांनाच गळती लागली आहे. थेट उन्हाळ्याच्या आधी म्हणजे मार्च महिन्याचा शेवटपर्यंत गळती लागली होती. अक्षरशः प्रचंड पाणी वाया जात होते. पाण्याच्या गळतीमुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले होते, अशी वस्तुस्थिती असताना सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणा नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दरवर्षी यंत्रणा केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीच करत नाही. त्यामुळे यंदाही प्रकल्पांची डागडुजी अथवा दुरुस्ती रखडली आहे.

लघुसिंचन प्रकल्पाचा गाळ काढणे अथवा दुरुस्ती करण्याबाबत संबंधित विभाग गांभीर्याने लक्ष घालत नाही. आम्ही शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यात मागणी करीत असतो. केवळ पोकळ आश्वासन दिले जात असते. गळतीमुळे तर माझे नेहमीच नुकसान होत असते. मात्र मुकाट्याने सहन करावे लागत आहे. - भानुदास मराठे, शेतकरी, रांझणी, ता. तळोदा.